शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

आबांचे स्मारक सांगलीत होणार

By admin | Updated: April 22, 2016 00:43 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील : महात्मा गांधी वसतिगृहाच्या जागेला पसंती

सांगली : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या स्मारकासाठी सांगलीच्या महात्मा गांधी वसतिगृहाच्या जागेची गुरुवारी आ. सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व अन्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली. येथे दीड एकर जागा उपलब्ध असल्याने याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. त्यांनी या जागेवर स्मारक करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. सांगली-मिरज रस्त्यावर असलेल्या महात्मा गांधी वसतिगृहातच आर. आर. पाटील विद्यार्थी दशेत आणि जिल्हा परिषद सदस्य असताना राहत होते. त्यामुळे येथेच त्यांचे स्मारक होणे उचित असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले होते. गुरुवारी दुपारी या जागेची पाहणी करण्यात आली. वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी या जागेवरील प्राथमिक आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना दाखविला. अडीच एकरमध्ये वसलेल्या या वसतिगृहाची दीड एकर जागा शिल्लक आहे. यामध्ये स्मारक होऊ शकते, असे मत त्यांनी मांडले. जागेबाबत गायकवाड यांनी हिरवा कंदील दर्शविला. तातडीने याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने ज्यापद्धतीने तेथील इमारतीचा आराखडा केला आहे, त्यापद्धतीने काम व्हावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सर्वांनी वसतिगृहाच्या इमारतीची पाहणी केली. आबा ज्या खोलीत राहत होते, त्या खोलीची पाहणीही जिल्हाधिकारी व आ. पाटील यांनी केली. खोलीच्या बाहेर तातडीने आबांच्या नावाचा उल्लेख असणारा फलक लावण्याची सूचना गायकवाड यांनी केली. स्मारक करताना वसतिगृहाच्या इमारतीचे नूतनीकरण व अत्याधुनिक सुविधा देण्याचा निर्णयही घेण्यात आला. पाच कोटी रुपयांचा प्राथमिक प्रस्ताव सादर करून त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या योजना शिंदे, हणमंतराव देसाई, पी. एल. कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)समस्यांचा पाढावसतिगृहातील विद्यार्थ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचला. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी गढूळ पाण्याची बाटली दाखविली. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने याप्रकरणी लक्ष घालून दोन दिवसांत स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची, तसेच याठिकाणी फिल्टर बसविण्याची सूचना केली. वसतिगृहातील अस्वच्छता, विद्युत दिव्यांची गैरसोय, खोल्यांमधील सुविधा, इमारतींची दुरुस्ती अशा सर्व समस्या मांडल्या.यावेळी गायकवाड म्हणाले, वसतिगृहात नव्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.