शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 9, 2016 00:05 IST

सदाभाऊ खोत : इस्लामपृूरचा विकास आराखडा रद्द होणार

अशोक पाटील -- इस्लामपूर -आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात विरोधी आघाडीची मोट बांधण्याच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. इस्लामपूर शहराचा विकास आराखडा रद्द करण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होतील आणि आराखडा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इस्लामपुरात मेळावा घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.पालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष स्वत:चा गट मजबूत करण्याच्या तयारीला लागला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्यासाठी गल्लीबोळातील युवा नेतेही ताकद दाखवत आहेत. विरोधी गटात खमक्या नेता नसल्याने त्यांच्यामध्ये अजूनही ताळमेळ नाही. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. नियोजित विकास आराखड्याबाबत विरोधकांतच एकमत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वत: शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करुन, अन्यायी विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली. त्याला यश येण्याचे स्पष्ट संकेत खोत यांनी दिले.खोत म्हणाले की, पालिका निवडणुकीत विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न करणार आहोत. विरोधी गटात सुशिक्षित युवकांना जास्तीत जास्त संधी देऊन नवी पिढी राजकारणात उतरविण्याची तयारी सुरू आहे. यासाठी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, जयकर पाटील, विजय कुंभार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक, महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडिक, शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्यासह राष्ट्रवादीविरोधात सक्रिय असलेल्या सर्व संघटनांना हाताशी धरुन चांगला पर्याय तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.इस्लामपूर शहरातील गुंडगिरी संपविण्यासाठी खमक्या अधिकाऱ्याची गरज होती. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यारूपाने ती पूर्ण झाली आहे. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादीसह विरोधी गटातील पदाधिकारी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. त्यामुळे त्यांना कारवाई करताना अडचणी येत आहेत. आगामी पालिका निवडणूक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्षाची करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊनच लढा देण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले.ग्रामीण भागातील टॅलेंटवर पुन्हा एकदा मोहोरपालिकेच्या मागील निवडणुकीत विरोधकांना खासदार शेट्टी आणि खोत यांनी मदतीचा हात पुढे केला होता. आता मात्र हे दोघे पुढे येऊन विरोधकांची मोट बांधणार आहेत. त्याला शहरातील विरोधी युवा नेते कितपत सहकार्य करणार, यावरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. ऐन दुष्काळातही खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी स्वत:चा वाढदिवस इस्लामपुरातील मोठ्या हॉटेलमध्ये साजरा केला, शहरात डिजीटल फलक उभे केले. यावरून खोत यांच्या मुलालाही पालिका निवडणुकीचे वेध लागल्याचे स्पष्ट होत आहे.