शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 9, 2016 00:05 IST

सदाभाऊ खोत : इस्लामपृूरचा विकास आराखडा रद्द होणार

अशोक पाटील -- इस्लामपूर -आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात विरोधी आघाडीची मोट बांधण्याच्या हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. इस्लामपूर शहराचा विकास आराखडा रद्द करण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होतील आणि आराखडा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इस्लामपुरात मेळावा घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.पालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष स्वत:चा गट मजबूत करण्याच्या तयारीला लागला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्यासाठी गल्लीबोळातील युवा नेतेही ताकद दाखवत आहेत. विरोधी गटात खमक्या नेता नसल्याने त्यांच्यामध्ये अजूनही ताळमेळ नाही. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. नियोजित विकास आराखड्याबाबत विरोधकांतच एकमत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वत: शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करुन, अन्यायी विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली. त्याला यश येण्याचे स्पष्ट संकेत खोत यांनी दिले.खोत म्हणाले की, पालिका निवडणुकीत विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न करणार आहोत. विरोधी गटात सुशिक्षित युवकांना जास्तीत जास्त संधी देऊन नवी पिढी राजकारणात उतरविण्याची तयारी सुरू आहे. यासाठी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, जयकर पाटील, विजय कुंभार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक, महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडिक, शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्यासह राष्ट्रवादीविरोधात सक्रिय असलेल्या सर्व संघटनांना हाताशी धरुन चांगला पर्याय तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.इस्लामपूर शहरातील गुंडगिरी संपविण्यासाठी खमक्या अधिकाऱ्याची गरज होती. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यारूपाने ती पूर्ण झाली आहे. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादीसह विरोधी गटातील पदाधिकारी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. त्यामुळे त्यांना कारवाई करताना अडचणी येत आहेत. आगामी पालिका निवडणूक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्षाची करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊनच लढा देण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले.ग्रामीण भागातील टॅलेंटवर पुन्हा एकदा मोहोरपालिकेच्या मागील निवडणुकीत विरोधकांना खासदार शेट्टी आणि खोत यांनी मदतीचा हात पुढे केला होता. आता मात्र हे दोघे पुढे येऊन विरोधकांची मोट बांधणार आहेत. त्याला शहरातील विरोधी युवा नेते कितपत सहकार्य करणार, यावरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. ऐन दुष्काळातही खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी स्वत:चा वाढदिवस इस्लामपुरातील मोठ्या हॉटेलमध्ये साजरा केला, शहरात डिजीटल फलक उभे केले. यावरून खोत यांच्या मुलालाही पालिका निवडणुकीचे वेध लागल्याचे स्पष्ट होत आहे.