शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

ओबीसी महामेळावा प्रकाश शेंडगेंकडून ‘हायजॅक’चा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST

सांगली : ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सांगलीमध्ये दिनांक २५ फेब्रुवारीला ओबीसी महामेळावा आयोजित केला आहे. ...

सांगली : ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सांगलीमध्ये दिनांक २५ फेब्रुवारीला ओबीसी महामेळावा आयोजित केला आहे. कोणत्याही नेत्याच्या ब्रॅण्डिंगसाठी हा महामेळावा होणार नाही. मात्र, ओबीसी मेळावा २७ फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगत माजी आमदार प्रकाश शेंडगेंकडून ओबीसी महामेळावा ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप मेळाव्याचे स्वागताध्यक्ष अरुण खरमाटे व प्रा. लक्ष्मण हाक्के यांनी सांगलीत बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. सांगलीतील मेळाव्याला ओबीसी नेते व मंत्री विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत.

यावेळी खरमाटे, हाक्के म्हणाले की, ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सांगलीमध्ये २५ फेब्रुवारीला ओबीसी महामेळावा आयोजित केला आहे. ओबीसी नेते शेंडगे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा केला आहे. परंतु, त्यांच्याकडून मेळाव्याच्या तारखेबाबत चुकीची अफवा पसरवली जात आहे. दिनांक २७ फेब्रुवारीला मेळावा होणार असल्याचा संदेश ते सोशल मीडियावरुन देत आहेत. मात्र, ते चुकीचे असून, २५ फेब्रुवारीला ओबीसी नेते, मंत्री वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा महामेळावा होणार आहे. दोन्ही नेत्यांनी २५ रोजी येण्याचे मान्य केले आहे. माजी आमदार शेंडगे यांच्याकडून चुकीचा संदेश देऊन मेळावा ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न होत आहे. ते स्वत:चा फोटो लावून मोर्चा होणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, ओबीसींच्या मागण्यांसाठी मेळावा होणार असून, कोणत्याही नेत्याच्या ब्रॅण्डिंगसाठी तो नसल्याची टीका त्यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसींना एकत्र करुन मेळावा घेतला जात असल्याने शेंडगेंनीही उपस्थित राहावे, अशी मागणी केली. मराठा समाजाला राज्य मागासवर्ग आयोगाने नोव्हेंबर २०१८ला एसईबीसी स्वतंत्र प्रवर्ग देऊन आरक्षण दिले. एसईबीसी म्हणजे ओबीसी, मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आज मराठा समाज आम्हाला ओबीसी प्रवर्गात घालण्याची मागणी करत आहे. आमदारांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी करणारे पत्र शासनाला दिले आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाला सुरुंग लागला आहे.

चौकट

ओबीसी आरक्षणाची वाटणी करण्याचे षड्यंत्र

ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाची वाटणी करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे आरक्षण देता कामा नये, मराठा समाज ३२ टक्के आहे, असे म्हटले जाते. परंतु ते कसे ठरवायचे? त्यासाठी जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना केल्याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण कसे द्यायचे? हा प्रश्न आहे, असे स्वागताध्यक्ष खरमाटे, प्रा. हाके व डॉ. विवेक गुरव म्हणाले.