शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-फडणवीस सरकारकडून एकतेवर हल्ले

By admin | Updated: October 30, 2015 23:45 IST

जयंत पाटील : भाजप-सेनेच्या भांडणात जनता महागाईच्या दुष्टचक्रात; इस्लामपूरमध्ये मोर्चा

इस्लामपूर : भाजपला सरकारमध्ये शिवसेना नको आहे, तर शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. त्यांच्यामधील भांडणात राज्यातील शेतकरी जनता महागाईच्या दुष्टचक्रात होरपळून निघत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मदत करण्याची या शासनाची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे, असा हल्लाबोल आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केला. तसेच केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एकतेवर हल्ले चढवून सामाजिक अस्वस्थता निर्माण करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वाढती महागाई व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनाचा निषेध करण्यासाठी तहसील कचेरीवर ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चास मार्गदर्शन करताना आमदार पाटील बोलत होते. मोर्च्यात इस्लामपूर, आष्टा शहरासह वाळवा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते, शेतकरी, पदाधिकारी सहभागी झाले होते़ तरूण व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती़ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार रुपाली सरनोबत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आ. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी सामान्य जनतेच्या मनातील असंतोष मोर्चाच्या माध्यमातून सरकारपुढे मांडत आहे़ सामान्य माणसांचे प्रश्न मांडत, शासनाच्या चुका वेशीवर टांगण्यात येतील. सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणाऱ्या आपल्या देशात अल्पसंख्याक, दलित, आदिवासी भीतीच्या वातावरणात असून अनेक विचारवंत, साहित्यिक पुरस्कार परत करीत आहेत. कल्याण—डोंबिवली महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डाळींच्या गोदामावर छापे टाकण्याचे नाटक केले आहे़ यावेळी माणिकराव पाटील, दिलीप पाटील, पी़ आऱ पाटील, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड़ चिमण डांगे, डॉ़ प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, संजय पाटील, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस वैभव शिंदे, सुस्मिता जाधव, छाया पाटील, शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव, अर्चना कदम यांनी शासनावर हल्लाबोल केला़ सकाळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जुन्या कचेरीपासून मोर्चाची सुरुवात झाली़ भर उन्हातच हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरुन तहसील कचेरीवर आला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी ‘दिवाळी दसरा - अच्छे दिन विसरा’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. विजयभाऊ पाटील, जनार्दनकाका पाटील, विष्णुपंत शिंदे, प्रा़ शामराव पाटील, पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे, उपसभापती भाग्यश्री शिंदे, विनायक पाटील, बाळासाहेब पाटील, सभापती आनंदराव पाटील, नेताजीराव पाटील, जगन्नाथ पाटील, प्रकाश रूकडे, अनिल पाटील, रोझा किणीकर, कमल पाटील, भगवान पाटील, अ‍ॅड़ विश्वास पाटील, बाळासाहेब लाड, विजयबापू पाटील, शंकरराव भोसले, सुनीता देशमाने, मीना मलगुंडे आदी मोर्च्यात सहभागी होते़ शैलेश पाटील यांनी स्वागत केले, नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी यांनी आभार मानले़ (वार्ताहर) डान्स बारमधील महिलांना अच्छे दिन..! ‘अरे कुठे गेले कुठे गेले, अच्छे दिन कुठे गेले?’ अशी घोषणा मोर्च्यात दिली जात होती़ तोच धागा पकडत आ़ पाटील म्हणाले, अरे बाबा, डान्स बारमधील महिलांना तरी अच्छे दिन आले, तुझी काय तक्रार आहे का? असे ते म्हणताच सभास्थळी एकच हशा पिकला. आम्ही डान्स बार, मटका बंद केला, यांनी तो सुरू केला. आता आपल्याच जिल्ह्यात मटका सुरू झाला आहे़ तो कोण चालविते, हे आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे़ शासनाच्या चुकीमुळेच कांद्याने डोळ्यात पाणी आणले पेट्रोल व डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होऊनही हे शासन जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करू शकले नाही़ कांद्याने डोळ्यात पाणी आणले असून डाळींचे दर गगनाला भिडले आहेत़ शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीमालास १0-२0 टक्के जरी दर वाढवून दिले असते, तरी कांदा, डाळी आयात कराव्या लागल्या नसत्या, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.