शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

जत तालुक्यातील डाळिंब बागांवर ‘अटॅक’ रोगाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST

फोटो ओळ : संख (ता. जत) डाळिंब बागांवरील फुलकळीवर अटॅक रोगाचे पांढऱ्या रंगाचे डाग पडले आहेत. लोकमत न्यूज नेटवर्क ...

फोटो ओळ : संख (ता. जत) डाळिंब बागांवरील फुलकळीवर अटॅक रोगाचे पांढऱ्या रंगाचे डाग पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : वातावरणातील बदलाने जत तालुक्यातील डाळिंबावर बिब्या, करपा, मर रोगांपाठोपाठ आता ‘अटॅक’ या नवीन रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. फुलकळीवर पांढऱ्या रंगाचा डाग पडून चार दिवसांत फुलगळती होत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मोठा असल्याने संपूर्ण बागांची गळती झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

तालुक्यामध्ये १२ हजार २२१ एकर डाळिंबाचे क्षेत्र आहे. संख, दरीबडची, उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, आसंगी, दरीकोणूर, वाळेखिंडी, काशीलिंगवाडी, बेवणूर या परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या आहेत. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला असल्याने दुष्काळी पट्ट्यात पाणीसाठा चांगला आहे. चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे. मात्र बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला आहे.

सध्या डाळिंबाचा मृग बहर हंगाम आहे. उन्हाळी पावसानंतर वातावरणात आर्द्रता वाढली. बदलत्या वातावरणाचा परिणाम डाळिंबावर झाला आणि अटॅक या नवीन रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संख, दरीबडची, सोन्याळ, जाडरबोबलाद, जालिहाळ, सिद्धनाथ, दरीकोणूर व शेजारच्या मंगळवेढा, सांगोला तालुक्यांत हा रोग दिसत आहे.

गेल्या वर्षी हा रोग फळांवर आला होता. यावर्षी फूल, फुलकळी, तर बारीक फळांवर पांढरे डाग पडले आहेत. यामुळे चार- पाच दिवसांनी फळ गळून पडते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी महागड्या औषधाचा मारा करत आहेत.

चाैकट

विकास सोसायट्या संकटात

तालुक्यातील विकास सोसायट्यांनी शेतकऱ्यांना बागांवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे. बागा अडचणीत आल्याने उत्पादन घटणार आहे. वसुली थकबाकीने विकास सोसायट्या अडचणीत येणार आहेत.

कोट

यंदा बदलत्या वातावरणाचा फटका डाळिंब पिकाला बसला आहे. अटॅक, बिब्या, कुजवा, मर रोगाने ६० टक्क्यांहून अधिक नुकसान होणार आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना कर्जवसुुुलीत सवलत मिळावी.

-अप्पासाहेब चिकाटी, डाळिंब उत्पादक, दरीबडची