शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी तालुक्यावर पाऊस रुसलेलाच

By admin | Updated: August 5, 2016 01:57 IST

नदी, तलाव कोरडे : ६ गावे, १४८ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा; शेतकरी आर्थिक चिंतेत

अविनाश बाड -- आटपाडी -आटपाडी तालुक्यातील पावसाची आकडेवारी फुगत चालली असली तरी, प्रत्यक्षात तलावातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत नाही. तालुक्याच्या डोक्यावरून कायम ढग पळताना दिसत आहेत. या विचित्र परिस्थितीत तालुक्यात आतापर्यंत सरासरी २००.६६ मि.मी. एवढा पाऊस झाला असला तरी, तालुक्यातील नदी आणि सर्व ओढे कोरडे आहेत. ६ गावे आणि १४८ वाड्या-वस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आटपाडी तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३५५ मि.मी. एवढे आहे. तालुक्यात सप्टेंबरनंतरच परतीचा मान्सून हमखास बरसतो. यंदा मात्र पावसाने तालुक्यावर जून महिन्यापासूनच कृपा केली आहे. तालुक्यात आतापर्यंत आटपाडीत २६५ मि.मी., दिघंचीत १८६ मि.मी., तर खरसुंडीत १५५ मि.मी. एवढा पाऊस झाला आहे. म्हणजे वर्षाच्या सरासरीएवढा पाऊस होत आला असला तरी, तालुक्यातील तापमान थंड झाल्याचे वगळता, दुष्काळी परिस्थितीत बदल झालेला नाही. सध्या तालुक्यातील ३०,४९९ लोकांना २० टॅँकरने ५०.५ खेपांनी पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात बाळेवाडी गावाला दि. १२ फेब्रुवारी रोजी पहिला टॅँकर सुरू करण्यात आला. तेव्हापासून टॅँकरची मागणी वाढत गेली. तालुक्यात एकमेव असलेल्या माणगंगा नदीसह तालुक्यातील सर्व ओढे कोरडे आहेत, तर तालुक्यातील तलावामध्ये टेंभूचे सोडलेले पाणी वगळता पाणी साठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे सध्या झालेल्या पावसाचा शेतीला तर फारसा उपयोग नाहीच, उलट ढगाळ हवामानामुळे डाळिंबावर कीड रोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंबावरील कीटकनाशकांच्या फवारण्या वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. ओढे-नाले न राहिल्याने भूजल पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाच्या आकडेवारीने कागदावर दुष्काळ हटल्याचे चित्र निर्माण होत आहे. प्रत्यक्षात मात्र तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. याकडे राज्यकर्त्यांसह जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.