शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

आटपाडी तालुक्यास अवकाळीचा तडाखा

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

कौठुळीत वीज कोसळून बैल ठार : पंचवीस लाखांचे नुकसान; दहा खोल्यांची चाळ पूर्णपणे उद्ध्वस्त

आटपाडी : रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यात २५ लाखाहून अधिक नुकसान झाले. तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या कार्यालयावरच झाड पडले. तसेच कृष्णा पाटील यांची दहा खोल्यांची चाळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या चाळीतील भाडेकरूंचा संसार उद्ध्वस्त झाला, तर कौठुळी येथे वीज पडून एक बैल ठार झाला.तब्बल साडेचार महिन्यानंतर आटपाडी तालुक्यात आलेल्या पर्जन्यराजाने तालुकावासीयांना चांगलेच झोडपून काढले. आटपाडीत ४० मि.मी., दिघंचीच २० मि.मी., तर खरसुंडी येथे ७ मि.मी. नोंद झालेल्या या पावसाने नुकसान मात्र जादा केले.येथील धांडोर ओढ्याजवळील जय भवानीनगरमधील कृष्णा भाऊ पाटील यांची १० खोल्यांची पत्र्याची चाळ वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त केली. या दहापैकी नऊ खोल्यांत भाडेकरू राहतात. प्रत्येक कुटुंबाला दोन खोल्या आणि पुढे पत्र्याचा व्हरांडा होता. वादळी वाऱ्याने पत्रे लोखंडी अ‍ॅँगलसह उडून गेले. भिंतीलाही तडे गेले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. तहसीलदार अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.या घटनेत भाडेकरूंचे फ्रीज, टीव्ही यासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. आनंदराव कृष्णा पाटील यांचे १ लाख १५ हजार, महादेव सखाराम कदम यांचे १ लाख, राजकुमार शिवराम क्षीरसागर यांचे ७५ हजार, नानासाहेब सर्जेराव कदम यांचे ६५ हजार, मुकेश अर्जुनलाल यादव यांचे ५० हजार, धनाजी कृष्णा मोरूळे यांचे ६० हजार, पतंगराव शंकरराव थोरात यांचे ६५ हजार, रुपाली अरुण देशमुख यांचे ६५ हजार, स्वप्नील अशोक दुधगावकर यांचे २५ हजार, तर जगदीश कमलाकर यांचे ३० हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. दिघंची येथील मुरलीधर हरी मोरे यांच्या जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडून गेले. सुदैवाने त्यावेळी जनावरे गोठ्यात नव्हती. गोठ्याचे खांब मोडून पडले. त्यामुळे त्यांचे १५ हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा गावकामगार तलाठी माणिकराव देशमुख यांनी केला आहे.रात्री नऊ वाजता कौठुळी येथील अंबादास गोविंद कदम यांच्या बैलावर वीज पडल्याने हा बैल ठार झाला. त्यामुळे त्यांचे सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले आहे. हिवतड, गोमेवाडी, नेलकरंजी परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. (वार्ताहर)तहसील कार्यालय नव्या इमारतीत कधी?सध्या कामकाज होत असलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या मागे नवीन भव्य इमारत बांधण्यात आली आहे. तिथे मतमोजणीसह संगणकीकृत सात-बारा उतारे देण्याची सोय करण्यात आली आहे. पण या इमारतीच्या उद्घाटनाअभावी तहसीलदारांचे कार्यालय जुन्या इमारतीत आहे. काल रात्री तहसीलदारांच्या कक्षावर मागील बाजूने झाड पडले. त्यामुळे कौले, लाकडे फुटून कार्यालयाचे नुकसान झाले आहे.पाऊस कमी, नुकसानच जास्ततब्बल साडेचार महिन्यानंतर आटपाडी तालुक्यात आलेल्या पर्जन्यराजाने तालुकावासीयांना चांगलेच झोडपून काढले. आटपाडीत ४० मि.मी., दिघंचीच २० मि.मी., तर खरसुंडी येथे ७ मि.मी. नोंद झालेल्या या पावसाने नुकसान मात्र जादा केले.