शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

आटपाडी उपाशी, सांगोला तुपाशी

By admin | Updated: October 9, 2015 00:37 IST

परतीच्या पावसाने बंधारे भरले : ‘माणगंगा’तून पाणी थेट सांगोला तालुक्यास

अविनाश बाड- आटपाडी परिसरात पडलेल्या दमदार पावसामुळे रविवार, दि. ४ रोजी आटपाडी तलाव भरला. सांडव्यातून शुक ओढ्याद्वारे पांढरेवाडीचा आणि काळे खडी येथील वसंत बंधारे भरुन मागील दोन दिवसांपासून पाणी माणगंगा नदीतून थेट सांगोला तालुक्यात जात आहे. तसेच माडगुळे परिसरावर पावसाने अवकृपा केल्याने तेथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील शेतकरी उपाशी आणि सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील शेतकरी तुपाशी, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.आटपाडी तलावाचे पाणलोट क्षेत्र तालुक्यातील सर्व तलावांपेक्षा चांगले आहे. त्यामुळे तालुक्यात आटपाडी तलाव सर्वात आधी भरतो. या तलावात ‘टेंभू’चे पाणीही आधी सोडले होते. त्यात दि. १ ते ५ आॅक्टोबरदरम्यान परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे ३०८.९७ द.ल.घ.फूट क्षमता असलेला हा तलाव भरुन रविवारी सायंकाळपासून सांडव्यावरून पाणी वाहू लागले.आटपाडीच्या शुक ओढ्यावर माणगंगा नदीला ओढा मिळेपर्यंत पांढरेवाडी आणि काळीखडी येथे दोन वसंत बंधारे आहेत. हे बंधारे दोन दिवसांपासून पाण्याने भरुन पाणी माणगंगा नदीतून थेट पुढे सांगोला तालुक्यात जात आहे. तसेच माडगुळे परिसराला यंदा पावसाने दगा दिल्याने या गावातील ओढा आणि सिमेंट बंधारे पूर्णपणे कोरडे आहेत. या गावाचा परिसर सखल असल्याने इथे जलसंधारणाची ओढा वगळता कसलीही कामे होऊ शकत नाहीत. २०१३ च्या दुष्काळी परिस्थितीत माडगुळेच्या ओढ्यावर साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे ओढाकाठावरील शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे फायद्याचे ठरले आहेत. पण पाऊसच नसल्याने बंधाऱ्याजवळील विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. ओढाकाठावर दोन्हीही बाजूला शेतकऱ्यांनी सुमारे २५० एकर डाळिंबाच्या बागा लावल्या आहेत. आता या बागांना डाळिंबे लागली आहेत. विहिरीतील पाणी संपल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यासाठी आटपाडी तलावाच्या कालव्यातून मासाळवाडीच्या ओढ्यातून सध्या सांडव्यातून वाया जाणारे पाणी सोडले, तर माडगुळेचा गावतलाव भरुन घेता येईल. या तलावाखाली गावाची पाणी पुरवठा विहीर आहे. त्यामुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. त्यानंतर गावाच्या पश्चिमेस कुलकर्णी वस्तीवरील सिमेंट बंधारा, गावाजवळील बंधारा, खडकी वस्तीवरील दोन बंधारे आणि बलवडी हद्दीवरील चावरातील वसंत बंधारा पाण्याने भरुन घेण्याची गरज आहे.एवढे बंधारे भरुन घेतले, तर या परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम आणि डाळिंबाच्या बागा यशस्वी होणार आहेत. त्यामुळे सुमारे साडेपाचशेहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. मासाळवाडीतील ओढ्याकाठच्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे. हे व्हायला हवे! : पाच आॅक्टोबरनंतर पावसाची उघडीपआटपाडी तालुक्यात दि. ५ आॅक्टोबरनंतर पावसाने उघडीप दिली आहे. सध्या तालुक्यात पावसाचे वातावरणही नाही. त्यामुळे आटपाडी तलाव पश्चिम भागातून ओढ्याने येणारे पाणी सध्या सांगोला तालुक्यात वाहून जाणारे पाणी जास्त दिवस जाऊ देण्यापेक्षा सध्या कालव्यातून कमी क्षमतेने पाणी सोडून काही बंधारे भरून घेतले जात आहेत. त्यापेक्षा पूर्ण क्षमतेने पाणी सोडून या पाण्याने तलावापासून माडगुळेच्या बलवडी हद्दीपर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना लाभ होईल, असे तात्काळ नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.