शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी उपाशी, सांगोला तुपाशी

By admin | Updated: October 9, 2015 00:37 IST

परतीच्या पावसाने बंधारे भरले : ‘माणगंगा’तून पाणी थेट सांगोला तालुक्यास

अविनाश बाड- आटपाडी परिसरात पडलेल्या दमदार पावसामुळे रविवार, दि. ४ रोजी आटपाडी तलाव भरला. सांडव्यातून शुक ओढ्याद्वारे पांढरेवाडीचा आणि काळे खडी येथील वसंत बंधारे भरुन मागील दोन दिवसांपासून पाणी माणगंगा नदीतून थेट सांगोला तालुक्यात जात आहे. तसेच माडगुळे परिसरावर पावसाने अवकृपा केल्याने तेथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील शेतकरी उपाशी आणि सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील शेतकरी तुपाशी, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.आटपाडी तलावाचे पाणलोट क्षेत्र तालुक्यातील सर्व तलावांपेक्षा चांगले आहे. त्यामुळे तालुक्यात आटपाडी तलाव सर्वात आधी भरतो. या तलावात ‘टेंभू’चे पाणीही आधी सोडले होते. त्यात दि. १ ते ५ आॅक्टोबरदरम्यान परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे ३०८.९७ द.ल.घ.फूट क्षमता असलेला हा तलाव भरुन रविवारी सायंकाळपासून सांडव्यावरून पाणी वाहू लागले.आटपाडीच्या शुक ओढ्यावर माणगंगा नदीला ओढा मिळेपर्यंत पांढरेवाडी आणि काळीखडी येथे दोन वसंत बंधारे आहेत. हे बंधारे दोन दिवसांपासून पाण्याने भरुन पाणी माणगंगा नदीतून थेट पुढे सांगोला तालुक्यात जात आहे. तसेच माडगुळे परिसराला यंदा पावसाने दगा दिल्याने या गावातील ओढा आणि सिमेंट बंधारे पूर्णपणे कोरडे आहेत. या गावाचा परिसर सखल असल्याने इथे जलसंधारणाची ओढा वगळता कसलीही कामे होऊ शकत नाहीत. २०१३ च्या दुष्काळी परिस्थितीत माडगुळेच्या ओढ्यावर साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे ओढाकाठावरील शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे फायद्याचे ठरले आहेत. पण पाऊसच नसल्याने बंधाऱ्याजवळील विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. ओढाकाठावर दोन्हीही बाजूला शेतकऱ्यांनी सुमारे २५० एकर डाळिंबाच्या बागा लावल्या आहेत. आता या बागांना डाळिंबे लागली आहेत. विहिरीतील पाणी संपल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यासाठी आटपाडी तलावाच्या कालव्यातून मासाळवाडीच्या ओढ्यातून सध्या सांडव्यातून वाया जाणारे पाणी सोडले, तर माडगुळेचा गावतलाव भरुन घेता येईल. या तलावाखाली गावाची पाणी पुरवठा विहीर आहे. त्यामुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. त्यानंतर गावाच्या पश्चिमेस कुलकर्णी वस्तीवरील सिमेंट बंधारा, गावाजवळील बंधारा, खडकी वस्तीवरील दोन बंधारे आणि बलवडी हद्दीवरील चावरातील वसंत बंधारा पाण्याने भरुन घेण्याची गरज आहे.एवढे बंधारे भरुन घेतले, तर या परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम आणि डाळिंबाच्या बागा यशस्वी होणार आहेत. त्यामुळे सुमारे साडेपाचशेहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. मासाळवाडीतील ओढ्याकाठच्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे. हे व्हायला हवे! : पाच आॅक्टोबरनंतर पावसाची उघडीपआटपाडी तालुक्यात दि. ५ आॅक्टोबरनंतर पावसाने उघडीप दिली आहे. सध्या तालुक्यात पावसाचे वातावरणही नाही. त्यामुळे आटपाडी तलाव पश्चिम भागातून ओढ्याने येणारे पाणी सध्या सांगोला तालुक्यात वाहून जाणारे पाणी जास्त दिवस जाऊ देण्यापेक्षा सध्या कालव्यातून कमी क्षमतेने पाणी सोडून काही बंधारे भरून घेतले जात आहेत. त्यापेक्षा पूर्ण क्षमतेने पाणी सोडून या पाण्याने तलावापासून माडगुळेच्या बलवडी हद्दीपर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना लाभ होईल, असे तात्काळ नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.