शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

आटपाडी उपाशी, सांगोला तुपाशी

By admin | Updated: October 9, 2015 00:37 IST

परतीच्या पावसाने बंधारे भरले : ‘माणगंगा’तून पाणी थेट सांगोला तालुक्यास

अविनाश बाड- आटपाडी परिसरात पडलेल्या दमदार पावसामुळे रविवार, दि. ४ रोजी आटपाडी तलाव भरला. सांडव्यातून शुक ओढ्याद्वारे पांढरेवाडीचा आणि काळे खडी येथील वसंत बंधारे भरुन मागील दोन दिवसांपासून पाणी माणगंगा नदीतून थेट सांगोला तालुक्यात जात आहे. तसेच माडगुळे परिसरावर पावसाने अवकृपा केल्याने तेथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील शेतकरी उपाशी आणि सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील शेतकरी तुपाशी, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.आटपाडी तलावाचे पाणलोट क्षेत्र तालुक्यातील सर्व तलावांपेक्षा चांगले आहे. त्यामुळे तालुक्यात आटपाडी तलाव सर्वात आधी भरतो. या तलावात ‘टेंभू’चे पाणीही आधी सोडले होते. त्यात दि. १ ते ५ आॅक्टोबरदरम्यान परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे ३०८.९७ द.ल.घ.फूट क्षमता असलेला हा तलाव भरुन रविवारी सायंकाळपासून सांडव्यावरून पाणी वाहू लागले.आटपाडीच्या शुक ओढ्यावर माणगंगा नदीला ओढा मिळेपर्यंत पांढरेवाडी आणि काळीखडी येथे दोन वसंत बंधारे आहेत. हे बंधारे दोन दिवसांपासून पाण्याने भरुन पाणी माणगंगा नदीतून थेट पुढे सांगोला तालुक्यात जात आहे. तसेच माडगुळे परिसराला यंदा पावसाने दगा दिल्याने या गावातील ओढा आणि सिमेंट बंधारे पूर्णपणे कोरडे आहेत. या गावाचा परिसर सखल असल्याने इथे जलसंधारणाची ओढा वगळता कसलीही कामे होऊ शकत नाहीत. २०१३ च्या दुष्काळी परिस्थितीत माडगुळेच्या ओढ्यावर साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे ओढाकाठावरील शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे फायद्याचे ठरले आहेत. पण पाऊसच नसल्याने बंधाऱ्याजवळील विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. ओढाकाठावर दोन्हीही बाजूला शेतकऱ्यांनी सुमारे २५० एकर डाळिंबाच्या बागा लावल्या आहेत. आता या बागांना डाळिंबे लागली आहेत. विहिरीतील पाणी संपल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यासाठी आटपाडी तलावाच्या कालव्यातून मासाळवाडीच्या ओढ्यातून सध्या सांडव्यातून वाया जाणारे पाणी सोडले, तर माडगुळेचा गावतलाव भरुन घेता येईल. या तलावाखाली गावाची पाणी पुरवठा विहीर आहे. त्यामुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. त्यानंतर गावाच्या पश्चिमेस कुलकर्णी वस्तीवरील सिमेंट बंधारा, गावाजवळील बंधारा, खडकी वस्तीवरील दोन बंधारे आणि बलवडी हद्दीवरील चावरातील वसंत बंधारा पाण्याने भरुन घेण्याची गरज आहे.एवढे बंधारे भरुन घेतले, तर या परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम आणि डाळिंबाच्या बागा यशस्वी होणार आहेत. त्यामुळे सुमारे साडेपाचशेहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. मासाळवाडीतील ओढ्याकाठच्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे. हे व्हायला हवे! : पाच आॅक्टोबरनंतर पावसाची उघडीपआटपाडी तालुक्यात दि. ५ आॅक्टोबरनंतर पावसाने उघडीप दिली आहे. सध्या तालुक्यात पावसाचे वातावरणही नाही. त्यामुळे आटपाडी तलाव पश्चिम भागातून ओढ्याने येणारे पाणी सध्या सांगोला तालुक्यात वाहून जाणारे पाणी जास्त दिवस जाऊ देण्यापेक्षा सध्या कालव्यातून कमी क्षमतेने पाणी सोडून काही बंधारे भरून घेतले जात आहेत. त्यापेक्षा पूर्ण क्षमतेने पाणी सोडून या पाण्याने तलावापासून माडगुळेच्या बलवडी हद्दीपर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना लाभ होईल, असे तात्काळ नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.