शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

आटपाडीचा शिक्षण विभाग वादात

By admin | Updated: July 15, 2017 23:54 IST

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या : बदलीसाठी ‘दर’?, शिक्षकांची पंचाईत

अविनाश बाड।  लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांमुळे आटपाडी पंचायत समितीचा शिक्षण विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बदली झालेल्या २० शिक्षकांना सोडले, मात्र आणखी ४९ शिक्षकांना न सोडल्याने ५ ते १० हजार रुपये असा प्रत्येक शिक्षकामागे बदलीचा दर सुरू झाला आहे, अशी चर्चा पंचायत समितीच्या आवारात शिक्षकांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे.दि. ५ जुलै रोजी आंतरजिल्हा बदलीचे आदेश जिल्हा परिषदेतून देण्यात आले. या आदेशामुळे आप-आपल्या जिल्ह्यात किंवा सोयीच्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी इच्छुक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आटपाडी पंचायत समितीमधून शिक्षकांना सोडण्यास नकार दिल्याने शिक्षकांची मोठी पंचाईत झाली आहे. लवकर तिथे हजर झाले नाही, तर तिथे हवी ती शाळा मिळण्यासाठी मोठा खर्च करावा लागेल, असे काहींनी सांगितले. बदलीचा आदेश झालेले शिक्षक-शिक्षिका शाळेत न जाता थेट पंचायत समितीच्या कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत. त्यात आता शिक्षक संघटना आणि त्यांचे नेते आघाडीवर आहेत.आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १९० शाळा आहेत. ४७५ शिक्षक कार्यरत आहेत. या बदल्यांपूर्वी एकूण ४९ मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. ३७ उपशिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. आता बदलून गेलेले आणि जाणारे अशी एकूण ८६ उपशिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक शाळा शिक्षकांविना ओस पडण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या सिध्दनाथनगर (गोमेवाडी), घनचक्रीमळा (दिघंची) आणि काळामळा (राजेवाडी) या तीन प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. तालुक्यात बाहेरुन इथे येण्यास शिक्षक इच्छुक नसतात. त्यामुळे जि. प. च्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.शनिवारी दिवसभर पंचायत समितीच्या आवारात बदली झालेली शिक्षक आणि शिक्षक संघटनांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. बदली झालेल्या शिक्षिका मात्र रडकुंडीस आल्या होत्या.अशा परिस्थितीत सध्या अहमदनगर जिल्ह्यासाठी-१०, सोलापूर-२, बीड-१, नाशिक-१, नांदेड-१, वाशिम-१, उस्मानाबाद-४ आणि सातारा जिल्ह्यातील ४ शिक्षकांना सोडले आहे. त्यामुळे रिक्त पदांच्या ठिकाणी शिक्षक आले नाहीत, तर तालुक्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार, ही वस्तुस्थिती आहे.पुरव्याशिवाय खोटे आरोप : मोरे याबाबत आटपाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे म्हणाले की, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना टप्प्याटप्प्याने सोडायचे, हा सभागृहाचा निर्णय आहे. त्यानुसार रितसर प्रक्रिया सुरु आहे. माझ्या कार्यालयाकडून कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. पुराव्याशिवाय खोटे आरोप करणाऱ्यांना काय म्हणणार?