शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आटपाडीचा शिक्षण विभाग वादात

By admin | Updated: July 15, 2017 23:54 IST

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या : बदलीसाठी ‘दर’?, शिक्षकांची पंचाईत

अविनाश बाड।  लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांमुळे आटपाडी पंचायत समितीचा शिक्षण विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बदली झालेल्या २० शिक्षकांना सोडले, मात्र आणखी ४९ शिक्षकांना न सोडल्याने ५ ते १० हजार रुपये असा प्रत्येक शिक्षकामागे बदलीचा दर सुरू झाला आहे, अशी चर्चा पंचायत समितीच्या आवारात शिक्षकांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे.दि. ५ जुलै रोजी आंतरजिल्हा बदलीचे आदेश जिल्हा परिषदेतून देण्यात आले. या आदेशामुळे आप-आपल्या जिल्ह्यात किंवा सोयीच्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी इच्छुक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आटपाडी पंचायत समितीमधून शिक्षकांना सोडण्यास नकार दिल्याने शिक्षकांची मोठी पंचाईत झाली आहे. लवकर तिथे हजर झाले नाही, तर तिथे हवी ती शाळा मिळण्यासाठी मोठा खर्च करावा लागेल, असे काहींनी सांगितले. बदलीचा आदेश झालेले शिक्षक-शिक्षिका शाळेत न जाता थेट पंचायत समितीच्या कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत. त्यात आता शिक्षक संघटना आणि त्यांचे नेते आघाडीवर आहेत.आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १९० शाळा आहेत. ४७५ शिक्षक कार्यरत आहेत. या बदल्यांपूर्वी एकूण ४९ मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. ३७ उपशिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. आता बदलून गेलेले आणि जाणारे अशी एकूण ८६ उपशिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक शाळा शिक्षकांविना ओस पडण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या सिध्दनाथनगर (गोमेवाडी), घनचक्रीमळा (दिघंची) आणि काळामळा (राजेवाडी) या तीन प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. तालुक्यात बाहेरुन इथे येण्यास शिक्षक इच्छुक नसतात. त्यामुळे जि. प. च्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.शनिवारी दिवसभर पंचायत समितीच्या आवारात बदली झालेली शिक्षक आणि शिक्षक संघटनांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. बदली झालेल्या शिक्षिका मात्र रडकुंडीस आल्या होत्या.अशा परिस्थितीत सध्या अहमदनगर जिल्ह्यासाठी-१०, सोलापूर-२, बीड-१, नाशिक-१, नांदेड-१, वाशिम-१, उस्मानाबाद-४ आणि सातारा जिल्ह्यातील ४ शिक्षकांना सोडले आहे. त्यामुळे रिक्त पदांच्या ठिकाणी शिक्षक आले नाहीत, तर तालुक्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार, ही वस्तुस्थिती आहे.पुरव्याशिवाय खोटे आरोप : मोरे याबाबत आटपाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे म्हणाले की, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना टप्प्याटप्प्याने सोडायचे, हा सभागृहाचा निर्णय आहे. त्यानुसार रितसर प्रक्रिया सुरु आहे. माझ्या कार्यालयाकडून कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. पुराव्याशिवाय खोटे आरोप करणाऱ्यांना काय म्हणणार?