शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

आटपाडीत एका दगडात अनेक पक्षी घायाळ

By admin | Updated: August 11, 2014 23:32 IST

विधानसभा निवडणुकीचे वेध : तिरंगी लढतीत बंडखोरीच्या घोषणेने रंगत; मतदारसंघात चर्चा

अविनाश बाड --आटपाडी -- आटपाडीत नुकत्याच झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून यावेळी बंडखोरीची घोषणा केली. गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी आमदार सदाशिवराव पाटील आणि माजी आमदार अनिल बाबर यांच्यावर केलेल्या जोरदार टीकेचा सध्या वेगवेगळा अर्थ लावला जात आहे. त्यामुळे देशमुख यांनी एका दगडात अनेक पक्षी घायाळ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.शनिवारी येथे खरे तर कृष्णा नदीतून आटपाडी तालुक्याच्या ५३ गावांच्या पाणी योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता, पण हा कार्यक्रम योजनेऐवजी विधानसभेच्या निवडणुकीवरच जास्त रंगला. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमोर अमरसिंह देशमुख यांनी, आबा, तुम्ही आम्हाला तिकीट देणार नाही हे माहीत आहे, पण आता आम्ही थांबणार नाही. निवडणूक लढविणारच, असे जाहीर करून, राष्ट्रवादीच्या नेत्यांचेही यावेळी ऐकणार नसल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशीही देशमुख यांची भेट झाल्याचे वृत्त आहे.गृहमंत्री पाटील यांनीही, माझ्यामुळे मागील दोन विधानसभेच्या निवडणुका आटपाडीकरांना थांबावे लागल्याचे मान्य केले. पाटील आणि माजी आमदार अनिल बाबर यांचे बंधुप्रेम सर्वज्ञात आहे. त्यामुळेच आबांनी बाबर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर केलेली टीका बाबर गटाला झोंबणारी ठरली आहे.विद्यमान आमदार सदाशिवराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्याऐवजी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना मदत केल्याचा आरोप आबांनी केल्यानंतर आबांची लोकसभेची जखम अजून ताजी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विसापूर गटातून आबांची मदत कोणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आटपाडी आणि विट्यातील तीन प्रस्थापित नेते प्रथमच एकमेकांसमोर शड्डू ठोकणार आहेत. आतापर्यंतच्या निवडणुकीत आटपाडीतून राजेंद्रअण्णा देशमुख, विट्यातून सदाशिवराव पाटील आणि बाबर या तिघांनी प्रत्येकवेळी दोघे एका बाजूला आणि एकजण दुसऱ्या बाजूला अशाच पध्दतीने विधानसभा निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे या नेत्यांना कोण किती पाण्यात आहे हे प्रथमच कळणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत, पण राष्ट्रवादीचे किती गट कुठल्या नेत्याला पाठिंबा देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.