शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

‘वाकुर्डे बुद्रुक ’ श्रेयवादावरून वातावरण पेटले

By admin | Updated: November 20, 2015 00:06 IST

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी : शिराळा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी मात्र अधांतरीच

शिवाजी पाटील -- येळापूर--दुष्काळ आणि वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या श्रेयावरून शिराळा तालुक्यातील वातावरण पेटले आहे. प्रत्येकाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना किती फायदा-तोटा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजप-सेना युती सरकार सत्तेवर येऊन एक वर्षाचा कार्यकाल लोटला आहे. आघाडी सरकार उलथवणाऱ्या मतदारांना या सरकारकडून विशेष अपेक्षा आहेत. यात शेतकरी, उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार, महिला यांचा समावेश आहे.युती सरकारने नुकतेच राज्यातील अनेक जिल्हे, तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. यात शिराळा तालुक्याचा समावेश नसल्याने संपूर्ण तालुक्यात नाराजी पसरली होती. शिराळा तालुका हा भरपूर पाऊस पडणारा तालुका म्हणून परिचित आहे. परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. खरीप हंगामातील पिके वाया गेलीच आहेत, आता रब्बी हंगाम घ्यायचा का नाही, या विचारात शेतकरी आहेत. यामुळे शिराळा तालुक्यातील नेत्यांनी दुष्काळाचा मुद्दा उचलून याचे राजकारण केले.माजी आमदार मानसिंगराव नाईक व जि. प.चे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मोर्चे, आंदोलनाबरोबरच शासनाला निवेदन दिले; तर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी, युती सरकारला प्रशासनाने चुकीचा अहवाल दिल्यामुळे शिराळा तालुका दुष्काळग्रस्त यादीत आला नसल्याचे दाखवून दिले व सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.वारणा धरणात यावर्षी पाण्याचा साठा कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी, ऊस लागण करू नका, असे आदेश दिले आहेत. शिराळा तालुक्यातील बहुतांशी पाझर तलावांतील पाण्याची पातळी संपुष्टात आली असून, मोरणा, टाकवे, वारणा धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे.गेल्या वर्षापासून वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या निधीवर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, याच योजनेचे पाणी लवकर सोडावे, यासाठी सध्या सभा, पत्रकार बैठकांतून आरोप होऊ लागले आहेत. तालुक्यातील तीनही नेते एकमेकांवर टीका-टिपणी करू लागले आहेत. यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.आघाडी सरकारच्या विरोधात निवडून आलेल्या युती सरकारला पळताभुई करून सोडण्यासाठी दोन्ही काँग्रेस पक्ष कामाला लागले आहेत; तर सरकारची बाजू सांभाळत सर्वांना न्याय देण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून, याला यश कधी मिळणार? दुष्काळाच्या सवलती मिळणार की नाहीत? वाकुर्डे योजनेचा प्रश्न कधी मार्गी लागणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.पाण्याची बचत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनवारणा धरणात यावर्षी पाण्याचा साठा कमी असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागण करू नये, असे आदेश काढले आहेत.शिराळा तालुक्यातील बहुतांशी पाझर तलावांतील पाण्याची पातळी संपुष्टात आली असून, मोरणा, टाकवे, वारणा धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे.