शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘वाकुर्डे बुद्रुक ’ श्रेयवादावरून वातावरण पेटले

By admin | Updated: November 20, 2015 00:06 IST

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी : शिराळा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी मात्र अधांतरीच

शिवाजी पाटील -- येळापूर--दुष्काळ आणि वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या श्रेयावरून शिराळा तालुक्यातील वातावरण पेटले आहे. प्रत्येकाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना किती फायदा-तोटा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजप-सेना युती सरकार सत्तेवर येऊन एक वर्षाचा कार्यकाल लोटला आहे. आघाडी सरकार उलथवणाऱ्या मतदारांना या सरकारकडून विशेष अपेक्षा आहेत. यात शेतकरी, उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार, महिला यांचा समावेश आहे.युती सरकारने नुकतेच राज्यातील अनेक जिल्हे, तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. यात शिराळा तालुक्याचा समावेश नसल्याने संपूर्ण तालुक्यात नाराजी पसरली होती. शिराळा तालुका हा भरपूर पाऊस पडणारा तालुका म्हणून परिचित आहे. परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. खरीप हंगामातील पिके वाया गेलीच आहेत, आता रब्बी हंगाम घ्यायचा का नाही, या विचारात शेतकरी आहेत. यामुळे शिराळा तालुक्यातील नेत्यांनी दुष्काळाचा मुद्दा उचलून याचे राजकारण केले.माजी आमदार मानसिंगराव नाईक व जि. प.चे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मोर्चे, आंदोलनाबरोबरच शासनाला निवेदन दिले; तर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी, युती सरकारला प्रशासनाने चुकीचा अहवाल दिल्यामुळे शिराळा तालुका दुष्काळग्रस्त यादीत आला नसल्याचे दाखवून दिले व सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.वारणा धरणात यावर्षी पाण्याचा साठा कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी, ऊस लागण करू नका, असे आदेश दिले आहेत. शिराळा तालुक्यातील बहुतांशी पाझर तलावांतील पाण्याची पातळी संपुष्टात आली असून, मोरणा, टाकवे, वारणा धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे.गेल्या वर्षापासून वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या निधीवर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, याच योजनेचे पाणी लवकर सोडावे, यासाठी सध्या सभा, पत्रकार बैठकांतून आरोप होऊ लागले आहेत. तालुक्यातील तीनही नेते एकमेकांवर टीका-टिपणी करू लागले आहेत. यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.आघाडी सरकारच्या विरोधात निवडून आलेल्या युती सरकारला पळताभुई करून सोडण्यासाठी दोन्ही काँग्रेस पक्ष कामाला लागले आहेत; तर सरकारची बाजू सांभाळत सर्वांना न्याय देण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून, याला यश कधी मिळणार? दुष्काळाच्या सवलती मिळणार की नाहीत? वाकुर्डे योजनेचा प्रश्न कधी मार्गी लागणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.पाण्याची बचत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनवारणा धरणात यावर्षी पाण्याचा साठा कमी असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागण करू नये, असे आदेश काढले आहेत.शिराळा तालुक्यातील बहुतांशी पाझर तलावांतील पाण्याची पातळी संपुष्टात आली असून, मोरणा, टाकवे, वारणा धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे.