शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा होणार पहिले झोपडपट्टीमुक्त शहर

By admin | Updated: December 8, 2015 00:45 IST

शेखर गायकवाड : नगरपालिकेचा शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्धापन दिन उत्साहात

आष्टा : आष्टा नगरपरिषदेने केंद्राच्या व राज्याच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. येत्या काळात आष्टा हे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर होईल. शहरातील सर्व गोरगरिबांना घरकुले देण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी रविवारी केले.आष्टा नगरपरिषदेच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्धापनदिन सांगता समारंभाच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, माजी आमदार विलासराव शिंदे, नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे, लीलाताई जाधव, माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे, पं. स. उपसभापती सौ. भाग्यश्री शिंदे, वैभव शिंदे, विशाल शिंदे, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, ‘पीपल्स’चे अध्यक्ष दिलीप वग्याणी, विराज शिंदे, मोहनराव शिंदे, संग्राम फडतरे, झुंझारराव पाटील, झिनत आत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, गरिबांना घरे देण्यासाठी सध्या विविध ठिकाणी बहुमजली इमारतीच्या वर आणखी एक ते दोन मजले उभारण्यात येतील. आष्टा शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात येतील. ३१ डिसेंबरअखेर आष्टा १00 टक्के शौचालययुक्त शहर होणार आहे. पालिकेने सेंद्रीय खत प्रकल्प राबवित देशात आदर्शवत कामगिरी केली आहे.विलासराव शिंदे म्हणाले, आष्टा शहर हे शेतीप्रधान आहे. याठिकाणी औद्योगिक विकास झाला नाही. पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवित शहराचा विकास केला आहे. स्वागत कमानी, प्रमुख रस्ते, चौक यांना नावे देऊन, चौक सुशोभिकरणातून शहरातील गुणवंतांच्या त्यागाचा गौरव केला आहे.नगराध्यक्षा सौ. शिंदे म्हणाल्या, पालिकेच्या विकास कामांना शासनाने सहकार्य केले आहे. मर्दवाडी येथील महादेव मंदिराचा जीर्णोध्दार व्हावा, घरकुलांच्या अपूर्ण कामास निधी मिळावा, पालिकेला पाण्याचे वीज बिल शेतीप्रमाणे कमी दरात आकारण्यात यावे.वर्धापन दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या वारसांचा, आजी व माजी कर्मचारी, उत्कृष्ट गणेश मंडळ, स्मशानभूमी सुशोभित करणाऱ्या शिवनेरी, एकवीरा संस्थांसह हुतात्मा स्मारक बगीचा विकसित करणाऱ्या इंजिनिअर असोसिएशनचा, विविध सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय मोरे, प्रकाश मिरजकर, नितीन झंवर, नंदकुमार बसुगडे, तानाजी सूर्यवंशी, शैलेश सावंत, प्रकाश रुकडे, समीर गायकवाड, प्रणव चौगुले, मयूर धनवडे, बाळासाहेब वाडकर, जोतिराम भंडारे, नियाजूल नायकवडी, दादा शेळके, शेरनवाब देवळे, चंद्रकांत पाटील, उदय कुशिरे, प्रभाकर जाधव, सतीश माळी, अभिजित वग्याणी, के. टी. वग्याणी, बबन थोटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)जागांची खरेदी-विक्री : महिन्यात प्रश्न सुटेलआष्टा येथील दत्त वसाहत, गांधीनगरातील गट क्र. ४, ६ व ९ येथील जागांचे खरेदी-वक्रीचे व्यवहार बंद असल्याने मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे, नगरसेवक मुकुंद इंगळे, दिगंबर पन्हाळकर यांनी वारंवार प्रयत्न केले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी महिन्याभरात येथील जागेचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.शहराचा विकास झालाआष्टा शहर हे शेतीप्रधान आहे. यामुळे याठिकाणी औद्योगिक विकास झाला नाही. पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवित शहराचा विकास केला आहे. स्वागत कमानी, प्रमुख रस्ते आदी विकास कामाच्या माध्यमातून शहराचा विकास केला आहे, असे मत माजी आमदार विलासराव शिंदे यांनी व्यक्त केले.