शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

राजापूर येथे विजेच्या तीव्र धक्क््याने मदतनीसाचा मृत्य

By admin | Updated: December 14, 2014 23:50 IST

ग्रामस्थ आक्रमक : तासगावात अडीच तास रास्ता रोकोू

तासगाव : राजापूर (ता. तासगाव) येथे आज विजेच्या खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या एकाचा शॉक लागल्याने खाली पडून मृत्यू झाला. अशोक बबन सुतार (वय ३५, रा. राजापूर) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या राजापूर ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तासगाव-सांगली रस्ता दत्तमाळावर सुमारे अडीच तास रोखून धरला. या आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर वीज कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. राजापूर येथे अशोक सुतार हे वीज कार्यालयाकडे मदतनीस म्हणून काम करीत होते. ते अधिकृतरित्या कंपनीकडे कामाला नव्हते. लाडमळा परिसरातील डीपी दुरुस्तीकामी गेलेल्या अशोक सुतार यांना विजेचा शॉक बसल्याचा प्रकार दुपारी १२.४५ वाजता घडला. सुतार यांचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेनंतर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करत येथील ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ग्रामस्थ ग्रामीण रुग्णालयात ठाण मांडून होते.निमणी उपविभागांतर्गत राजापूर गाव येत असल्याने शाखा अभियंता पांढरे व अन्य एक अधिकारी पोलीस ठाण्यात होते. याबाबतीत निर्णय होत नसल्याने जमलेल्या ग्रामस्थांनी दत्तमाळावरील वसंतदादा महाविद्यालयासमोरच्या चौकात ‘रास्ता रोको’ करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण रुग्णालयात बसलेले ग्रामस्थ मुख्य रस्त्यावरील चौकात येऊन बसल्याने वाहतूक थांबली. तासगाव, विटा, सांगली, मणेराजुरी व बाह्य वळण रस्ता या मार्गावर वाहतूक ठप्प झाली. तासगाव पोलिसांसह सांगलीतून कमांडोची तुकडी व अन्य पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. राजापूर ग्रामस्थ त्यांच्या मुद्द्यावर ठाम असल्याने या प्रकरणात मार्ग निघत नव्हता. चर्चेसाठी कनिष्ठ स्तरावरील अधिकारी आल्याने ग्रामस्थांनी वरिष्ठ स्तरावरील अधिकारी आले पाहिजे, अशी मागणी केली. अखेर कनिष्ठ अभियंता पांढरे व वायरमन पोतदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाल्याने आंदोलन स्थगित झाले. दोघांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी सांगितले. (वार्ताहर)प्रवासी अडकले !रास्ता रोको सुमारे अडीच तास सुरू राहिल्याने एसटीमधील प्रवासी चांगलेच अडकले. यात विशेष करून वृद्धांना त्रास झाला. आंदोलन अचानक झाल्याने कुणालाच काही माहिती नव्हती. तासगाव शहरात याची चर्चा जोरदार होती. नागरिक आंदोलनस्थळी बघण्यासाठी जात असल्याने गर्दीही वाढत होती. त्यात रात्र झाल्याने अंधारात आंदोलन सुरू राहिले. हळूहळू आंदोलनस्थळी बघ्यांची गर्दी वाढतच होती, तर दुसरीकडे मुख्य रस्त्यावर मालवाहतूक ट्रक, एस. टी. यासह चारचाकी, दुचाकी वाहनांची वाहतूक ठप्प झाल्याने रांगा वाढतच चालल्या होत्या. आंदोलन स्थळापासून लांबपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. एकीकडे चर्चा सुरू होती. पण निर्णय होत नसल्यामुळे आंदोलनाची वेळ वाढत गेली. अडीच तासानंतर आंदोलन स्थगित झाले.