शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘आकाडी’च्या मैदानात विधानसभेच्या बैठका

By admin | Updated: July 17, 2014 23:41 IST

खानापूर विधानसभा : इच्छुकांची मोर्चेबांधणी

दिलीप मोहिते - विटाखानापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचा धुरळा पावसाने झालेल्या चिखलातही उडू लागला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, ‘आकाडी’निमित्त आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या मैदानात कॉँग्रेस, राष्ट्रवादी, महायुतीसह अपक्षांनीही फिल्डिंग लावत विधानसभेच्या बैठका पार पाडल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम सुरू झाली आहे.सध्या आषाढ महिना सुरू झाला असून, विटा शहरासह खानापूर मतदारसंघातील ग्रामीण भागात ‘आकाडी’च्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. पंचायत समिती गणनिहाय आकाडीच्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्याचा धडाका सुरू झाला आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, महायुती, मनसेसह अन्य अपक्ष इच्छुकांनीही आकाडीला महत्त्व देत मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खानापूर तालुक्यातील करंजे, खानापूर, लेंगरे, गार्डी, भाळवणी, आळसंद यासह अन्य पंचायत समिती गणनिहाय आकाडी यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.या आकाडी यात्रेत मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षाच्या विधानसभा इच्छुकांनी हजेरी लावत मतदारांच्या बैठका घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व तयारीच्या बैठकासाठी ‘आकाडी’ इच्छुकांना वरदान ठरू लागली आहे. पंचायत समिती गणातील मोठ्या गावात ‘आकाडी’चे आयोजन करून परिसरात असणाऱ्या गावातील मतदारांना ‘आकाडी’चे निमंत्रण देऊन विधानसभा निवडणुकीची बैठक घेतली जाते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील संभाव्य स्थितीवर सविस्तर चर्चा करून आगामी व्यूहरचनाही ठरविली जात आहे. त्यात आकाडी भोजनाच्या निमित्तााने आलेल्या लोकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत लोकांच्या अडी-अडचणी व नाराजीचा अंदाजही इच्छुकांना येत आहे. त्यामुळे ‘आकाडी’ ही इच्छुकांना पर्वणीच ठरत आहे. परिणामी, विधानसभा निवडणुकीपूर्वी थेट मतदारांशी संपर्क होऊ लागल्याने कॉँग्रेस, राष्ट्रवादी, महायुतीसह मनसे व अन्य इच्छुकांना जनतेशी थेट संवाद साधता येऊ लागला आहे. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती गण नहाय ‘आकाडी’चे आयोजन होऊ लागले असून, या ‘आकाडी’च्या मैदानात विधानसभा निवडणुकीच्या बैठका होऊ लागल्या आहेत. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनाही ‘आकाडी’चा चांगलाच आधार मिळाला आहे.खानापूर विधानसभा मतदारसंघात आषाढ महिन्यात ‘आकाडी’ने चांगलाच वेग घेतला आहे. आकाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या इच्छुकांचा मतदार व कार्यकर्त्यांशी थेट संपर्क होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय आकाडीचे आयोजन केले जात आहे.