शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘आकाडी’च्या मैदानात विधानसभेच्या बैठका

By admin | Updated: July 17, 2014 23:41 IST

खानापूर विधानसभा : इच्छुकांची मोर्चेबांधणी

दिलीप मोहिते - विटाखानापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचा धुरळा पावसाने झालेल्या चिखलातही उडू लागला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, ‘आकाडी’निमित्त आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या मैदानात कॉँग्रेस, राष्ट्रवादी, महायुतीसह अपक्षांनीही फिल्डिंग लावत विधानसभेच्या बैठका पार पाडल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम सुरू झाली आहे.सध्या आषाढ महिना सुरू झाला असून, विटा शहरासह खानापूर मतदारसंघातील ग्रामीण भागात ‘आकाडी’च्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. पंचायत समिती गणनिहाय आकाडीच्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्याचा धडाका सुरू झाला आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, महायुती, मनसेसह अन्य अपक्ष इच्छुकांनीही आकाडीला महत्त्व देत मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खानापूर तालुक्यातील करंजे, खानापूर, लेंगरे, गार्डी, भाळवणी, आळसंद यासह अन्य पंचायत समिती गणनिहाय आकाडी यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.या आकाडी यात्रेत मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षाच्या विधानसभा इच्छुकांनी हजेरी लावत मतदारांच्या बैठका घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व तयारीच्या बैठकासाठी ‘आकाडी’ इच्छुकांना वरदान ठरू लागली आहे. पंचायत समिती गणातील मोठ्या गावात ‘आकाडी’चे आयोजन करून परिसरात असणाऱ्या गावातील मतदारांना ‘आकाडी’चे निमंत्रण देऊन विधानसभा निवडणुकीची बैठक घेतली जाते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील संभाव्य स्थितीवर सविस्तर चर्चा करून आगामी व्यूहरचनाही ठरविली जात आहे. त्यात आकाडी भोजनाच्या निमित्तााने आलेल्या लोकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत लोकांच्या अडी-अडचणी व नाराजीचा अंदाजही इच्छुकांना येत आहे. त्यामुळे ‘आकाडी’ ही इच्छुकांना पर्वणीच ठरत आहे. परिणामी, विधानसभा निवडणुकीपूर्वी थेट मतदारांशी संपर्क होऊ लागल्याने कॉँग्रेस, राष्ट्रवादी, महायुतीसह मनसे व अन्य इच्छुकांना जनतेशी थेट संवाद साधता येऊ लागला आहे. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती गण नहाय ‘आकाडी’चे आयोजन होऊ लागले असून, या ‘आकाडी’च्या मैदानात विधानसभा निवडणुकीच्या बैठका होऊ लागल्या आहेत. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनाही ‘आकाडी’चा चांगलाच आधार मिळाला आहे.खानापूर विधानसभा मतदारसंघात आषाढ महिन्यात ‘आकाडी’ने चांगलाच वेग घेतला आहे. आकाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या इच्छुकांचा मतदार व कार्यकर्त्यांशी थेट संपर्क होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय आकाडीचे आयोजन केले जात आहे.