शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

मालमत्ताधारक आगीतून फुपाट्यात

By admin | Updated: August 21, 2016 23:52 IST

इस्लामपूर नगरपालिका : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, विकास आराखड्याबाबत आज निर्णय

ंंअशोक पाटील ल्ल इस्लामपूर १९८0 नंतरच्या नियोजित विकास आराखड्याला अंतिम मुहूर्त लागणार नाही. त्यामुळे हजारो बाधित मालमत्ताधारक चिंतेत आहेत. त्यातच सत्ताधारी राष्ट्रवादीने स्वबळावर आराखडा मंजूर केला आहे. यावर भाजप युवा मोर्चाचे विक्रमभाऊ पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे आराखडा रद्दची तक्रार दाखल केली आहे. यावर सोमवारी, २१ आॅगस्ट रोजी निकाल दिला जाणार आहे. तसेच ए. पी. ९६ बाधित मालमत्ता धारकांनी पुणे आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विकास आराखड्यात गोलमाल असून शहरातील सर्वसामान्य मालमत्ता धारकांची अवस्था आगीतून फुपाट्यात पडल्यासारखी झाली आहे. सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्काचे कायदेशीर घर असावे, म्हणून नागरिक इस्लामपूर पालिकेत आणि महसूल विभागात हेलपाटे मारुन बेजार झाले आहेत, तर सत्ताधाऱ्यांतील काही नेत्यांनी स्वत:च्या मालमत्ता वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या हातावर वजन ठेवून आपले हात वर केले आहेत. काही नेत्यांनी तर आरक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे भूखंड हडप केले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांकडून सर्वसामान्य बाधित मालमत्ता धारकांना न्याय देण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या सुचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नियोजित विकास आराखड्यावर पालिकेने लाखो रुपये खर्ची टाकले आहेत. राष्ट्रवादीने सभागृहात विकास आराखड्याला मंजुरी देऊन तो अंतिम मंजुरीसाठी शासनदरबारी पाठवला होता. परंतु हा आराखडा अन्यायी असल्याने खासदार राजू शेट्टी, भाजपचे विक्रमभाऊ पाटील, काँग्रेसचे वैभव पवार आणि विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, हा आराखडा रद्द करावा अशी मागणी वेळोवेळी केली आहे. याची दखलही राष्ट्रवादीने घेतली नाही. आराखड्याच्या निर्णयाला शासनाकडून विलंब होत असल्याचे पाहून पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी २२ जून २0१६ रोजी बहुमताच्या जोरावर हा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यानंतर या आराखड्यात बाधित असलेल्या ९६ मालमत्ता धारकांना पुणे येथील आयुक्तांकडे अपील दाखल करण्यास नगरविकास खात्याने सांगितले आहे. त्यामुळे शहरातील हे मालमत्ताधारक आपल्या नेत्यांना गाठून पुण्याच्या वाऱ्या करु लागले आहेत. हा विकास आराखडा रद्द व्हावा म्हणून भाजयुमोचे विक्रमभाऊ पाटील यांनी कोणताही गाजावाजा न करता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी रविवारची सुट्टी असतानाही पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना कामावर बोलावल्याचे समजते. याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बहुमताच्या जोरावर विकास आराखडा मंजूर केला नगरपालिकेने सादर केलेल्या आराखड्यास विलंब होत असल्याचे पाहून पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर हा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यानंतर या आराखड्यात बाधित मालमत्ता धारकांना पुणे आयुक्तांकडे अपील दाखल केले.