शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताधारक आगीतून फुपाट्यात

By admin | Updated: August 21, 2016 23:52 IST

इस्लामपूर नगरपालिका : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, विकास आराखड्याबाबत आज निर्णय

ंंअशोक पाटील ल्ल इस्लामपूर १९८0 नंतरच्या नियोजित विकास आराखड्याला अंतिम मुहूर्त लागणार नाही. त्यामुळे हजारो बाधित मालमत्ताधारक चिंतेत आहेत. त्यातच सत्ताधारी राष्ट्रवादीने स्वबळावर आराखडा मंजूर केला आहे. यावर भाजप युवा मोर्चाचे विक्रमभाऊ पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे आराखडा रद्दची तक्रार दाखल केली आहे. यावर सोमवारी, २१ आॅगस्ट रोजी निकाल दिला जाणार आहे. तसेच ए. पी. ९६ बाधित मालमत्ता धारकांनी पुणे आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विकास आराखड्यात गोलमाल असून शहरातील सर्वसामान्य मालमत्ता धारकांची अवस्था आगीतून फुपाट्यात पडल्यासारखी झाली आहे. सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्काचे कायदेशीर घर असावे, म्हणून नागरिक इस्लामपूर पालिकेत आणि महसूल विभागात हेलपाटे मारुन बेजार झाले आहेत, तर सत्ताधाऱ्यांतील काही नेत्यांनी स्वत:च्या मालमत्ता वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या हातावर वजन ठेवून आपले हात वर केले आहेत. काही नेत्यांनी तर आरक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे भूखंड हडप केले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांकडून सर्वसामान्य बाधित मालमत्ता धारकांना न्याय देण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या सुचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नियोजित विकास आराखड्यावर पालिकेने लाखो रुपये खर्ची टाकले आहेत. राष्ट्रवादीने सभागृहात विकास आराखड्याला मंजुरी देऊन तो अंतिम मंजुरीसाठी शासनदरबारी पाठवला होता. परंतु हा आराखडा अन्यायी असल्याने खासदार राजू शेट्टी, भाजपचे विक्रमभाऊ पाटील, काँग्रेसचे वैभव पवार आणि विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, हा आराखडा रद्द करावा अशी मागणी वेळोवेळी केली आहे. याची दखलही राष्ट्रवादीने घेतली नाही. आराखड्याच्या निर्णयाला शासनाकडून विलंब होत असल्याचे पाहून पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी २२ जून २0१६ रोजी बहुमताच्या जोरावर हा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यानंतर या आराखड्यात बाधित असलेल्या ९६ मालमत्ता धारकांना पुणे येथील आयुक्तांकडे अपील दाखल करण्यास नगरविकास खात्याने सांगितले आहे. त्यामुळे शहरातील हे मालमत्ताधारक आपल्या नेत्यांना गाठून पुण्याच्या वाऱ्या करु लागले आहेत. हा विकास आराखडा रद्द व्हावा म्हणून भाजयुमोचे विक्रमभाऊ पाटील यांनी कोणताही गाजावाजा न करता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी रविवारची सुट्टी असतानाही पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना कामावर बोलावल्याचे समजते. याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बहुमताच्या जोरावर विकास आराखडा मंजूर केला नगरपालिकेने सादर केलेल्या आराखड्यास विलंब होत असल्याचे पाहून पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर हा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यानंतर या आराखड्यात बाधित मालमत्ता धारकांना पुणे आयुक्तांकडे अपील दाखल केले.