शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

आष्टा, इस्लामपुरात आघाडी, अन्यत्र स्वबळावर लढणार

By admin | Updated: October 23, 2016 00:41 IST

पतंगराव कदम : स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय

सांगली : आष्टा आणि इस्लामपूर येथे स्थानिक पातळीवर अन्य पक्षांशी आघाडी करण्यात येणार असून, अन्यत्र कॉँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुकीत परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचविले होते. नगरपालिका व नगरपंचायतींच्या क्षेत्रात झालेल्या प्राथमिक चाचपणीनंतर आष्टा आणि इस्लामपूर वगळता अन्यत्र स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आष्टा आणि इस्लामपूर नगरपालिकेसाठी कोणाशी आघाडी करायची, याबाबत अद्याप निर्णय कोणताही झालेला नाही. परिस्थितीनुसार कॉँग्रेस पक्षाच्या हिताचा जो निर्णय असेल, तो घेतला जाईल. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीबाबत ते म्हणाले की, येत्या २७ आॅक्टोबररोजी सकाळी अकरा वाजता आम्ही काँग्रेसतर्फे मोहनराव कदम यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहोत. ४० वर्षापासून मोहनराव कदम हे कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करीत आले आहेत. जिल्ह्यातील सहकार चळवळीच्या वाटचालीत त्यांचे योगदान मोठे आहे. मोहनराव कदम यांना मानणारा सांगली व सातारा जिल्ह्यात मोठा गट आहे. विविध सहकारी संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे सुरू आहेत. त्यामुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यातून मोहनराव कदम यांच्या नावाचा उठाव झालेला आहे. गतवेळी ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिली होती. आता ती काँग्रेसला द्यायला हवी. दोन्ही पक्षांची आघाडी असल्याने एकवेळ काँग्रेसलाही संधी मिळायला हवी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नाही. लवकरच चर्चा होऊन सकारात्मक निर्णय होईल. (प्रतिनिधी)आता माघार नाही...यावेळी मोहनराव कदम म्हणाले की, पूर्ण विचारांती, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही. राष्ट्रवादीने जर काँग्रेसला ही जागा दिली नाही, तर पक्षीय स्तरावर योग्य निर्णय होईल. काँग्रेस स्वबळावर लढली तरी या जागेवर मी निवडून येऊ शकतो. सर्वच पक्षात माझे मित्र आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांकडूनही मला मदत मिळू शकते.