शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अपहाराच्या रकमेवर ऐश...

By admin | Updated: December 3, 2015 23:55 IST

वसुलीकडे दुर्लक्ष : दीड कोटी रुपये वसूल कधी होणार--घोटाळे करा बिनधास्त राहा-३

अशोक डोंबाळे -- सांगलीरिकामे डांबरी बॅरेल, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, तसेच जिल्हा परिषद भांडार विभाग यामध्ये अपहार करून दीड कोटीचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हडप केला आहे. हा अपहार १९८९ ते २०१३ या आर्थिक वर्षातील असून, २७ वर्षांमध्ये अपहाराची रक्कम वसूल झाली नाही. या अपहाराशी संबंधित काही कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त, तर काही मृत झाले आहेत. अनेकजण सेवेत असून, शासकीय निधीवर डल्ला मारूनही निश्चिंत आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणात अपहाराच्या रकमेकडे गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनीही कधी गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे, ते अपहार करूनही उजळमाथ्याने वावरत आहेत.कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी तसलमात निधीतून १९६६ मध्ये २५ हजार ८६९ रुपयांचा अपहार केला आहे. या अपहारास ४९ वर्षे झाली असून, ती रक्कम आजअखेर वसूल झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या भांडार विभागामध्ये वस्तूंच्या स्वरूपात अपहार केला असून, त्याची ९९ हजार ७३० रुपये किंमत आहे. हा अपहार १९७०-७१ या वर्षात झाला आहे.बांधकाम विभागाने १९८९-९० मध्ये कोट्यवधी रुपयांचे डांबर खरेदी केले होते. डांबराच्या रिकाम्या बॅरेलची किंमत ४३ हजार ७८० रुपये अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून वसूल केली नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने शासकीय निधीतील शिल्लक रक्कम कमी दाखवून शासकीय निधीतील एक लाख पाच हजारावर डल्ला मारला आहे. हा अपहार २००३ ते २००५ या कालावधितील असून, वसुली काहीच झाली नाही. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील शेती अवजारे ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिली जात आहेत. शेतकऱ्यांच्या हिश्श््याचे त्यांनी ३ लाख ३५ हजार ७६ रुपये भरले होते. या हिश्श्यावरच लाभार्थी कर्मचाऱ्याने डल्ला मारला आहे. हा घोटाळा उघडकीस येऊन पाच वर्षे झाली तरीही ती रक्कम वसूल झाली नाही. कवठेमहांकाळ पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक अमोल शिंदे यांनी ३ लाख ७३ हजारांचा गैरव्यवहार केला असून, त्यांच्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे. त्यांच्याकडूनही गैरव्यवहाराची रक्कम वसूल झाली नाही. कवठेमहांकाळ पंचायत समितीमधीलच तत्कालीन रोखपाल सन्नीकर यांनी १९६९ मध्ये १२ हजार २३६ रुपयांचा अपहार केला आहे. गेल्या ४५ वर्षांत यातील एक रुपयाही वसूल झाला नाही. संबंधित कर्मचारी सेवानिवृत्तही झाले आहेत.समाजकल्याण विभागामार्फत पाचवी ते सातवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जातीतील मुलींना सावित्रीबाई फुले उपस्थिती भत्ता दिला जातो. या भत्त्याच्या रकमेतील ८८ लाख ९८ हजार ६०० रुपयांच्या निधीवर २०१२-१३ या वर्षात येथील कर्मचाऱ्याने डल्ला मारला होता. हा घोटाळा पचल्यानंतर पुन्हा याच आर्थिक वर्षाच्या शेवटी ९ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा अपहार केला. यावेळी वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना शासकीय निधीतील अपहार होत असल्याचे उघडकीस आले आणि त्या कर्मचाऱ्याचा गैरव्यवहार उजेडात आला. त्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषी कर्मचाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून वीस लाख रुपये वसूल झाले. पण, त्यानंतर एक रुपयाही वसूल झाला नाही. सध्या हा कर्मचारी बिनधास्त फिरत आहे.घोटाळे करणाऱ्यांवर कारवाईसाठी शासनाने कायद्यातच बदल करून कठोर शिक्षेची तरतूद केली पाहिजे. अपहाराची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांची मालमत्ता विक्री करून तात्काळ वसूल झाली, तरच घोटाळ्यांना चाप बसू शकतो. विभागनिहाय अपहारविभागअपहारवर्षबांधकाम४३७८०१९८९छोटे पाटबंधारे ८१८७८१९८२सामान्य प्रशासन ५६८९९२१९९६आरोग्य३८४७७१९८६आ. केंद्र, आटपाडी२६१५९१९८१ग्रा. पाणी पुरवठा१०५०००२००३कृषी८७०३०२०१०क.महांकाळ पंचायत समिती३८५१३६२०१२समाजकल्याण ९८८५०००२०१३एकूण ११२२१४५२