शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

अपहाराच्या रकमेवर ऐश...

By admin | Updated: December 3, 2015 23:55 IST

वसुलीकडे दुर्लक्ष : दीड कोटी रुपये वसूल कधी होणार--घोटाळे करा बिनधास्त राहा-३

अशोक डोंबाळे -- सांगलीरिकामे डांबरी बॅरेल, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, तसेच जिल्हा परिषद भांडार विभाग यामध्ये अपहार करून दीड कोटीचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हडप केला आहे. हा अपहार १९८९ ते २०१३ या आर्थिक वर्षातील असून, २७ वर्षांमध्ये अपहाराची रक्कम वसूल झाली नाही. या अपहाराशी संबंधित काही कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त, तर काही मृत झाले आहेत. अनेकजण सेवेत असून, शासकीय निधीवर डल्ला मारूनही निश्चिंत आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणात अपहाराच्या रकमेकडे गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनीही कधी गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे, ते अपहार करूनही उजळमाथ्याने वावरत आहेत.कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी तसलमात निधीतून १९६६ मध्ये २५ हजार ८६९ रुपयांचा अपहार केला आहे. या अपहारास ४९ वर्षे झाली असून, ती रक्कम आजअखेर वसूल झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या भांडार विभागामध्ये वस्तूंच्या स्वरूपात अपहार केला असून, त्याची ९९ हजार ७३० रुपये किंमत आहे. हा अपहार १९७०-७१ या वर्षात झाला आहे.बांधकाम विभागाने १९८९-९० मध्ये कोट्यवधी रुपयांचे डांबर खरेदी केले होते. डांबराच्या रिकाम्या बॅरेलची किंमत ४३ हजार ७८० रुपये अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून वसूल केली नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने शासकीय निधीतील शिल्लक रक्कम कमी दाखवून शासकीय निधीतील एक लाख पाच हजारावर डल्ला मारला आहे. हा अपहार २००३ ते २००५ या कालावधितील असून, वसुली काहीच झाली नाही. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील शेती अवजारे ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिली जात आहेत. शेतकऱ्यांच्या हिश्श््याचे त्यांनी ३ लाख ३५ हजार ७६ रुपये भरले होते. या हिश्श्यावरच लाभार्थी कर्मचाऱ्याने डल्ला मारला आहे. हा घोटाळा उघडकीस येऊन पाच वर्षे झाली तरीही ती रक्कम वसूल झाली नाही. कवठेमहांकाळ पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक अमोल शिंदे यांनी ३ लाख ७३ हजारांचा गैरव्यवहार केला असून, त्यांच्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे. त्यांच्याकडूनही गैरव्यवहाराची रक्कम वसूल झाली नाही. कवठेमहांकाळ पंचायत समितीमधीलच तत्कालीन रोखपाल सन्नीकर यांनी १९६९ मध्ये १२ हजार २३६ रुपयांचा अपहार केला आहे. गेल्या ४५ वर्षांत यातील एक रुपयाही वसूल झाला नाही. संबंधित कर्मचारी सेवानिवृत्तही झाले आहेत.समाजकल्याण विभागामार्फत पाचवी ते सातवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जातीतील मुलींना सावित्रीबाई फुले उपस्थिती भत्ता दिला जातो. या भत्त्याच्या रकमेतील ८८ लाख ९८ हजार ६०० रुपयांच्या निधीवर २०१२-१३ या वर्षात येथील कर्मचाऱ्याने डल्ला मारला होता. हा घोटाळा पचल्यानंतर पुन्हा याच आर्थिक वर्षाच्या शेवटी ९ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा अपहार केला. यावेळी वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना शासकीय निधीतील अपहार होत असल्याचे उघडकीस आले आणि त्या कर्मचाऱ्याचा गैरव्यवहार उजेडात आला. त्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषी कर्मचाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून वीस लाख रुपये वसूल झाले. पण, त्यानंतर एक रुपयाही वसूल झाला नाही. सध्या हा कर्मचारी बिनधास्त फिरत आहे.घोटाळे करणाऱ्यांवर कारवाईसाठी शासनाने कायद्यातच बदल करून कठोर शिक्षेची तरतूद केली पाहिजे. अपहाराची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांची मालमत्ता विक्री करून तात्काळ वसूल झाली, तरच घोटाळ्यांना चाप बसू शकतो. विभागनिहाय अपहारविभागअपहारवर्षबांधकाम४३७८०१९८९छोटे पाटबंधारे ८१८७८१९८२सामान्य प्रशासन ५६८९९२१९९६आरोग्य३८४७७१९८६आ. केंद्र, आटपाडी२६१५९१९८१ग्रा. पाणी पुरवठा१०५०००२००३कृषी८७०३०२०१०क.महांकाळ पंचायत समिती३८५१३६२०१२समाजकल्याण ९८८५०००२०१३एकूण ११२२१४५२