शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अपहाराच्या रकमेवर ऐश...

By admin | Updated: December 3, 2015 23:55 IST

वसुलीकडे दुर्लक्ष : दीड कोटी रुपये वसूल कधी होणार--घोटाळे करा बिनधास्त राहा-३

अशोक डोंबाळे -- सांगलीरिकामे डांबरी बॅरेल, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, तसेच जिल्हा परिषद भांडार विभाग यामध्ये अपहार करून दीड कोटीचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हडप केला आहे. हा अपहार १९८९ ते २०१३ या आर्थिक वर्षातील असून, २७ वर्षांमध्ये अपहाराची रक्कम वसूल झाली नाही. या अपहाराशी संबंधित काही कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त, तर काही मृत झाले आहेत. अनेकजण सेवेत असून, शासकीय निधीवर डल्ला मारूनही निश्चिंत आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणात अपहाराच्या रकमेकडे गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनीही कधी गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे, ते अपहार करूनही उजळमाथ्याने वावरत आहेत.कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी तसलमात निधीतून १९६६ मध्ये २५ हजार ८६९ रुपयांचा अपहार केला आहे. या अपहारास ४९ वर्षे झाली असून, ती रक्कम आजअखेर वसूल झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या भांडार विभागामध्ये वस्तूंच्या स्वरूपात अपहार केला असून, त्याची ९९ हजार ७३० रुपये किंमत आहे. हा अपहार १९७०-७१ या वर्षात झाला आहे.बांधकाम विभागाने १९८९-९० मध्ये कोट्यवधी रुपयांचे डांबर खरेदी केले होते. डांबराच्या रिकाम्या बॅरेलची किंमत ४३ हजार ७८० रुपये अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून वसूल केली नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने शासकीय निधीतील शिल्लक रक्कम कमी दाखवून शासकीय निधीतील एक लाख पाच हजारावर डल्ला मारला आहे. हा अपहार २००३ ते २००५ या कालावधितील असून, वसुली काहीच झाली नाही. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील शेती अवजारे ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिली जात आहेत. शेतकऱ्यांच्या हिश्श््याचे त्यांनी ३ लाख ३५ हजार ७६ रुपये भरले होते. या हिश्श्यावरच लाभार्थी कर्मचाऱ्याने डल्ला मारला आहे. हा घोटाळा उघडकीस येऊन पाच वर्षे झाली तरीही ती रक्कम वसूल झाली नाही. कवठेमहांकाळ पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक अमोल शिंदे यांनी ३ लाख ७३ हजारांचा गैरव्यवहार केला असून, त्यांच्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे. त्यांच्याकडूनही गैरव्यवहाराची रक्कम वसूल झाली नाही. कवठेमहांकाळ पंचायत समितीमधीलच तत्कालीन रोखपाल सन्नीकर यांनी १९६९ मध्ये १२ हजार २३६ रुपयांचा अपहार केला आहे. गेल्या ४५ वर्षांत यातील एक रुपयाही वसूल झाला नाही. संबंधित कर्मचारी सेवानिवृत्तही झाले आहेत.समाजकल्याण विभागामार्फत पाचवी ते सातवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जातीतील मुलींना सावित्रीबाई फुले उपस्थिती भत्ता दिला जातो. या भत्त्याच्या रकमेतील ८८ लाख ९८ हजार ६०० रुपयांच्या निधीवर २०१२-१३ या वर्षात येथील कर्मचाऱ्याने डल्ला मारला होता. हा घोटाळा पचल्यानंतर पुन्हा याच आर्थिक वर्षाच्या शेवटी ९ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा अपहार केला. यावेळी वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना शासकीय निधीतील अपहार होत असल्याचे उघडकीस आले आणि त्या कर्मचाऱ्याचा गैरव्यवहार उजेडात आला. त्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषी कर्मचाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून वीस लाख रुपये वसूल झाले. पण, त्यानंतर एक रुपयाही वसूल झाला नाही. सध्या हा कर्मचारी बिनधास्त फिरत आहे.घोटाळे करणाऱ्यांवर कारवाईसाठी शासनाने कायद्यातच बदल करून कठोर शिक्षेची तरतूद केली पाहिजे. अपहाराची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांची मालमत्ता विक्री करून तात्काळ वसूल झाली, तरच घोटाळ्यांना चाप बसू शकतो. विभागनिहाय अपहारविभागअपहारवर्षबांधकाम४३७८०१९८९छोटे पाटबंधारे ८१८७८१९८२सामान्य प्रशासन ५६८९९२१९९६आरोग्य३८४७७१९८६आ. केंद्र, आटपाडी२६१५९१९८१ग्रा. पाणी पुरवठा१०५०००२००३कृषी८७०३०२०१०क.महांकाळ पंचायत समिती३८५१३६२०१२समाजकल्याण ९८८५०००२०१३एकूण ११२२१४५२