शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
3
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
4
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
5
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
6
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
7
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
8
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
9
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
10
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
11
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
12
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
13
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
14
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
15
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
16
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
17
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
18
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
19
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
20
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

अपहाराच्या रकमेवर ऐश...

By admin | Updated: December 3, 2015 23:55 IST

वसुलीकडे दुर्लक्ष : दीड कोटी रुपये वसूल कधी होणार--घोटाळे करा बिनधास्त राहा-३

अशोक डोंबाळे -- सांगलीरिकामे डांबरी बॅरेल, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, तसेच जिल्हा परिषद भांडार विभाग यामध्ये अपहार करून दीड कोटीचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हडप केला आहे. हा अपहार १९८९ ते २०१३ या आर्थिक वर्षातील असून, २७ वर्षांमध्ये अपहाराची रक्कम वसूल झाली नाही. या अपहाराशी संबंधित काही कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त, तर काही मृत झाले आहेत. अनेकजण सेवेत असून, शासकीय निधीवर डल्ला मारूनही निश्चिंत आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणात अपहाराच्या रकमेकडे गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनीही कधी गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे, ते अपहार करूनही उजळमाथ्याने वावरत आहेत.कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी तसलमात निधीतून १९६६ मध्ये २५ हजार ८६९ रुपयांचा अपहार केला आहे. या अपहारास ४९ वर्षे झाली असून, ती रक्कम आजअखेर वसूल झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या भांडार विभागामध्ये वस्तूंच्या स्वरूपात अपहार केला असून, त्याची ९९ हजार ७३० रुपये किंमत आहे. हा अपहार १९७०-७१ या वर्षात झाला आहे.बांधकाम विभागाने १९८९-९० मध्ये कोट्यवधी रुपयांचे डांबर खरेदी केले होते. डांबराच्या रिकाम्या बॅरेलची किंमत ४३ हजार ७८० रुपये अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून वसूल केली नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने शासकीय निधीतील शिल्लक रक्कम कमी दाखवून शासकीय निधीतील एक लाख पाच हजारावर डल्ला मारला आहे. हा अपहार २००३ ते २००५ या कालावधितील असून, वसुली काहीच झाली नाही. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील शेती अवजारे ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिली जात आहेत. शेतकऱ्यांच्या हिश्श््याचे त्यांनी ३ लाख ३५ हजार ७६ रुपये भरले होते. या हिश्श्यावरच लाभार्थी कर्मचाऱ्याने डल्ला मारला आहे. हा घोटाळा उघडकीस येऊन पाच वर्षे झाली तरीही ती रक्कम वसूल झाली नाही. कवठेमहांकाळ पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक अमोल शिंदे यांनी ३ लाख ७३ हजारांचा गैरव्यवहार केला असून, त्यांच्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे. त्यांच्याकडूनही गैरव्यवहाराची रक्कम वसूल झाली नाही. कवठेमहांकाळ पंचायत समितीमधीलच तत्कालीन रोखपाल सन्नीकर यांनी १९६९ मध्ये १२ हजार २३६ रुपयांचा अपहार केला आहे. गेल्या ४५ वर्षांत यातील एक रुपयाही वसूल झाला नाही. संबंधित कर्मचारी सेवानिवृत्तही झाले आहेत.समाजकल्याण विभागामार्फत पाचवी ते सातवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जातीतील मुलींना सावित्रीबाई फुले उपस्थिती भत्ता दिला जातो. या भत्त्याच्या रकमेतील ८८ लाख ९८ हजार ६०० रुपयांच्या निधीवर २०१२-१३ या वर्षात येथील कर्मचाऱ्याने डल्ला मारला होता. हा घोटाळा पचल्यानंतर पुन्हा याच आर्थिक वर्षाच्या शेवटी ९ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा अपहार केला. यावेळी वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना शासकीय निधीतील अपहार होत असल्याचे उघडकीस आले आणि त्या कर्मचाऱ्याचा गैरव्यवहार उजेडात आला. त्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषी कर्मचाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून वीस लाख रुपये वसूल झाले. पण, त्यानंतर एक रुपयाही वसूल झाला नाही. सध्या हा कर्मचारी बिनधास्त फिरत आहे.घोटाळे करणाऱ्यांवर कारवाईसाठी शासनाने कायद्यातच बदल करून कठोर शिक्षेची तरतूद केली पाहिजे. अपहाराची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांची मालमत्ता विक्री करून तात्काळ वसूल झाली, तरच घोटाळ्यांना चाप बसू शकतो. विभागनिहाय अपहारविभागअपहारवर्षबांधकाम४३७८०१९८९छोटे पाटबंधारे ८१८७८१९८२सामान्य प्रशासन ५६८९९२१९९६आरोग्य३८४७७१९८६आ. केंद्र, आटपाडी२६१५९१९८१ग्रा. पाणी पुरवठा१०५०००२००३कृषी८७०३०२०१०क.महांकाळ पंचायत समिती३८५१३६२०१२समाजकल्याण ९८८५०००२०१३एकूण ११२२१४५२