शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

सांगली जिल्ह्यात तब्बल २८८ ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात

By अशोक डोंबाळे | Updated: September 22, 2024 14:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तहसीलदारांना चौकशीचे आदेश : नोटिसा देऊनही जात वैधता प्रमाणपत्र सादरच नाही

अशोक डोंबाळे/सांगली, लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : निवडणूक झाल्यानंतरदेखील जातवैधता प्रमाणपत्र सादर करू न शकणाऱ्या २८८ ग्रामपंचायत सदस्यांना पद रद्द का करू नये, अशी नोटीस संबंधितांना दिली आहे. यात तासगाव तालुक्यातील सर्वाधिक ९७ सदस्यांचा समावेश आहे. जात प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना अनेक वेळा देऊनदेखील याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना सदस्यांचे जातवैधता प्रमाणपत्राचा तातडीने अहवाल देण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात २०२१ मध्ये १५२ ग्रामपंचायतींमधील एक हजार ५०७ सदस्यपदासाठी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. यामध्ये ५५२ सदस्य राखीव प्रवर्गातून निवडून आले होते. त्यापैकी प्रशासनाच्या नोटिसीनंतर २६४ सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले होते. पण, २८८ सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्रच सादर केले नव्हते. याप्रकरणी संबंधित सदस्य व सरपंच यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. म्हणून जिल्ह्यातील २८८ ग्रामपंचायत सदस्यांना सदस्यत्व रद्द का करू नये, अशी अंतिम नोटीस जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.चौकटग्रामपंचायत सदस्यांची संख्यातालुका संख्याजत            ७५पलूस ३१खानापूर २६आटपाडी ०४मिरज ३४तासगाव ९७क.महांकाळ १०कडेगाव १०वाळवा ०१एकूण २८८

चौकटसदस्यत्व रद्दची होणार कारवाई-राखीव जागेवर उमेदवारी अर्ज भरून जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांची यादी जातवैधता समितीकडून जिल्हा प्रशासनाला सादर केली होती.- जिल्हा प्रशासनाने एक आदेश काढून जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या २८८ सरपंच अथवा सदस्यांची पदे रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याची तयारीजिल्ह्यातील चक्क २८८ सदस्यांचे जातवैधता प्रमाणपत्र तीन वर्षांत सादर केले नाही. यामुळे या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यास अनेक ग्रामपंचायती अल्प मतात येण्याची शक्यता आहे. यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची तयारी प्रशासनाकडून होऊ शकते. जिल्ह्यातील आरक्षित जागेवर विजय झालेल्या सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र घेण्याची सूचना दिली होती. तरीही त्यांनी वेळेत दाखल केले नाही. तसेच काहींचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. म्हणून जिल्ह्यातील २८८ ग्रामपंचायत सदस्यांचा सुधारित अहवाल देण्याची सूचना तहसीलदारांना दिली आहे.-राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत