शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानापेक्षा लेखनाला मिळणारी दाद महत्त्वाची

By admin | Updated: January 4, 2016 00:31 IST

बाबा भांड : कर्नाळमध्ये तिसरे विद्यार्थी साहित्य संमेलन उत्साहात

सांगली : लेखकांनी फक्त बोलण्यापेक्षा पुस्तकातले आपले लेखन आणि अनुभव बोलले पाहिजेत. लेखकाची ओळख ही त्याच्या लिखाणातून होणे गरजेचे आहे. कोणत्याही पुरस्कारापेक्षा आणि सन्मानापेक्षा लेखकाच्या लेखनाला वाचकांकडून मिळत असलेली दाद लाखमोलाची असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी रविवारी केले.मिरज पंचायत समिती (शिक्षण विभाग) आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळ (ता. मिरज) येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनात भांड बोलत होते. भांड म्हणाले की, लेखन समृध्द होण्यासाठी, लेखन सर्वसमावेशक होण्यासाठी गरिबीचा अनुभव महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच लेखन बहरत गेले. जीवन जगत असताना कोणतीही खोटी गोष्ट करुन नव्हे, तर माझ्याबरोबर माझ्या शेजाऱ्याचीही प्रगती व्हावी, या भावनेने काम करीत राहिल्यास आनंद मिळतो. यातूनच मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यालयाची सुरुवात केली. विद्यार्थीदशेत ‘मी कसा घडलो’ हे पुस्तक वाचले आणि तेव्हापासून लिखाणाची उर्मी निर्माण झाली. त्यामुळे लहानपणापासून वाचन वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तेजश्री पाटील, भूषण सुतार, किशोरी पाटील यांनी बाबा भांड यांची घेतलेली मुलाखत चांगलीच रंगतदार झाली. ओंकार सिध्द याच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनात ४२ कवी सहभागी झाले होते. दिवसभर विविध उपक्रमांनी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून सुमरन जमादार होती, तर स्वागताध्यक्ष म्हणून आदेश देशमाने, कविसंमेलनाध्यक्ष म्हणून ओंकार सिध्द याची निवड केली होती. संमेलनाचे संयोजन गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, एस. एस. बस्तवडे, नजीर चौगुले, दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, रघुनाथ हेगणावर, विजय पाटील, विश्वास आठवले, राजेंद्र राऊत, बाळू गायकवाड, अमोल सातपुते, संतोष गुरव, शशिकांत नागरगोजे यांनी केले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, साहित्यिका तारा भवाळकर, अविनाश सप्रे, एकनाथ पाटील, भीमराव धुळूबुळू, वर्षा चौगुले, गोविंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)मुलांचा उत्स्फूर्त सहभागसुबोध पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘किलबिल गोष्टी’ हे कथाकथन झाले. यात हर्षवर्धन कांबळे, पूजा सारावरे, जोया शेख, पवन पवार, नेहा वायंगणकर यांनी बहारदार कथा सादर केल्या. त्यानंतर पाठ्यपुस्तकातील लेखक शशिकांत शिंदे, प्रदीप पाटील आणि विमल मोरे यांच्याशी उपस्थित मुलांनी मनातील शंका आणि उत्सुकतेला वाट करुन दिली.