शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

सन्मानापेक्षा लेखनाला मिळणारी दाद महत्त्वाची

By admin | Updated: January 4, 2016 00:31 IST

बाबा भांड : कर्नाळमध्ये तिसरे विद्यार्थी साहित्य संमेलन उत्साहात

सांगली : लेखकांनी फक्त बोलण्यापेक्षा पुस्तकातले आपले लेखन आणि अनुभव बोलले पाहिजेत. लेखकाची ओळख ही त्याच्या लिखाणातून होणे गरजेचे आहे. कोणत्याही पुरस्कारापेक्षा आणि सन्मानापेक्षा लेखकाच्या लेखनाला वाचकांकडून मिळत असलेली दाद लाखमोलाची असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी रविवारी केले.मिरज पंचायत समिती (शिक्षण विभाग) आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळ (ता. मिरज) येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनात भांड बोलत होते. भांड म्हणाले की, लेखन समृध्द होण्यासाठी, लेखन सर्वसमावेशक होण्यासाठी गरिबीचा अनुभव महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच लेखन बहरत गेले. जीवन जगत असताना कोणतीही खोटी गोष्ट करुन नव्हे, तर माझ्याबरोबर माझ्या शेजाऱ्याचीही प्रगती व्हावी, या भावनेने काम करीत राहिल्यास आनंद मिळतो. यातूनच मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यालयाची सुरुवात केली. विद्यार्थीदशेत ‘मी कसा घडलो’ हे पुस्तक वाचले आणि तेव्हापासून लिखाणाची उर्मी निर्माण झाली. त्यामुळे लहानपणापासून वाचन वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तेजश्री पाटील, भूषण सुतार, किशोरी पाटील यांनी बाबा भांड यांची घेतलेली मुलाखत चांगलीच रंगतदार झाली. ओंकार सिध्द याच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनात ४२ कवी सहभागी झाले होते. दिवसभर विविध उपक्रमांनी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून सुमरन जमादार होती, तर स्वागताध्यक्ष म्हणून आदेश देशमाने, कविसंमेलनाध्यक्ष म्हणून ओंकार सिध्द याची निवड केली होती. संमेलनाचे संयोजन गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, एस. एस. बस्तवडे, नजीर चौगुले, दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, रघुनाथ हेगणावर, विजय पाटील, विश्वास आठवले, राजेंद्र राऊत, बाळू गायकवाड, अमोल सातपुते, संतोष गुरव, शशिकांत नागरगोजे यांनी केले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, साहित्यिका तारा भवाळकर, अविनाश सप्रे, एकनाथ पाटील, भीमराव धुळूबुळू, वर्षा चौगुले, गोविंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)मुलांचा उत्स्फूर्त सहभागसुबोध पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘किलबिल गोष्टी’ हे कथाकथन झाले. यात हर्षवर्धन कांबळे, पूजा सारावरे, जोया शेख, पवन पवार, नेहा वायंगणकर यांनी बहारदार कथा सादर केल्या. त्यानंतर पाठ्यपुस्तकातील लेखक शशिकांत शिंदे, प्रदीप पाटील आणि विमल मोरे यांच्याशी उपस्थित मुलांनी मनातील शंका आणि उत्सुकतेला वाट करुन दिली.