शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानापेक्षा लेखनाला मिळणारी दाद महत्त्वाची

By admin | Updated: January 4, 2016 00:31 IST

बाबा भांड : कर्नाळमध्ये तिसरे विद्यार्थी साहित्य संमेलन उत्साहात

सांगली : लेखकांनी फक्त बोलण्यापेक्षा पुस्तकातले आपले लेखन आणि अनुभव बोलले पाहिजेत. लेखकाची ओळख ही त्याच्या लिखाणातून होणे गरजेचे आहे. कोणत्याही पुरस्कारापेक्षा आणि सन्मानापेक्षा लेखकाच्या लेखनाला वाचकांकडून मिळत असलेली दाद लाखमोलाची असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी रविवारी केले.मिरज पंचायत समिती (शिक्षण विभाग) आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळ (ता. मिरज) येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनात भांड बोलत होते. भांड म्हणाले की, लेखन समृध्द होण्यासाठी, लेखन सर्वसमावेशक होण्यासाठी गरिबीचा अनुभव महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच लेखन बहरत गेले. जीवन जगत असताना कोणतीही खोटी गोष्ट करुन नव्हे, तर माझ्याबरोबर माझ्या शेजाऱ्याचीही प्रगती व्हावी, या भावनेने काम करीत राहिल्यास आनंद मिळतो. यातूनच मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यालयाची सुरुवात केली. विद्यार्थीदशेत ‘मी कसा घडलो’ हे पुस्तक वाचले आणि तेव्हापासून लिखाणाची उर्मी निर्माण झाली. त्यामुळे लहानपणापासून वाचन वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तेजश्री पाटील, भूषण सुतार, किशोरी पाटील यांनी बाबा भांड यांची घेतलेली मुलाखत चांगलीच रंगतदार झाली. ओंकार सिध्द याच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनात ४२ कवी सहभागी झाले होते. दिवसभर विविध उपक्रमांनी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून सुमरन जमादार होती, तर स्वागताध्यक्ष म्हणून आदेश देशमाने, कविसंमेलनाध्यक्ष म्हणून ओंकार सिध्द याची निवड केली होती. संमेलनाचे संयोजन गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, एस. एस. बस्तवडे, नजीर चौगुले, दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, रघुनाथ हेगणावर, विजय पाटील, विश्वास आठवले, राजेंद्र राऊत, बाळू गायकवाड, अमोल सातपुते, संतोष गुरव, शशिकांत नागरगोजे यांनी केले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, साहित्यिका तारा भवाळकर, अविनाश सप्रे, एकनाथ पाटील, भीमराव धुळूबुळू, वर्षा चौगुले, गोविंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)मुलांचा उत्स्फूर्त सहभागसुबोध पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘किलबिल गोष्टी’ हे कथाकथन झाले. यात हर्षवर्धन कांबळे, पूजा सारावरे, जोया शेख, पवन पवार, नेहा वायंगणकर यांनी बहारदार कथा सादर केल्या. त्यानंतर पाठ्यपुस्तकातील लेखक शशिकांत शिंदे, प्रदीप पाटील आणि विमल मोरे यांच्याशी उपस्थित मुलांनी मनातील शंका आणि उत्सुकतेला वाट करुन दिली.