शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अरब पर्यटकांची मिरजेकडे पाठ...

By admin | Updated: December 25, 2016 23:49 IST

नोटा बंदीचा परिणाम : लॉजसह इतर व्यावसायिकांना फटका

मिरज : नोटा बंदीमुळे आखाती देशांतून मिरजेत येणाऱ्या अरब नागरिकांची संख्या घटली आहे. वैद्यकीय उपचाराच्या कारणासाठी मिरजेत येणारे अरब सध्या नोटा बंदीमुळे येत नसल्याने, लॉजसह रुग्णालये व एजंटांच्या व्यवसायास फटका बसला आहे. मिरजेत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांमुळे आखाती देशातील कतार, मस्कत, ओमान, बहारीन, सौदी, दुबई या देशांतील अरब मिरजेत येतात. तृतीय व चतुर्थश्रेणी कामगार किवा छोटे व्यावसायिक अरब मिरजेत येतात व श्रीमंत अरब मुंबई, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरात जातात. १९८० पासून पर्यटन व उपचाराच्या कारणासाठी अरब मिरजेत येतात. मिरजेत केवळ अरबांसाठी काही लॉजेस सुरू आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हंगामात मिरजेत येणाऱ्या अरबांना सर्व सुविधा पुरविणारे एजंट प्रत्येक लॉजवर आहेत. लॉजवरील वेटरपासून रिक्षावाल्यांपर्यंत सर्वांचीच या अरबांमुळे चांगली कमाई होते. मिरजेत यापूर्वी हजारो अरब येत असल्याने, लॉजेससह काही रुग्णालयांचे फलकही अरबी भाषेत झळकत होते. अरब पर्यटकांमुळे मिरजेतील व्यवसाय, उद्योगांना आधार मिळाला. मात्र त्यातून गैरप्रकार सुरू झाल्यामुळे, मौजमजेसाठी येणाऱ्या अरब पर्यटकांच्या गैरवर्तणुकीविरूध्द ३० वर्षांपूर्वी मिरजेत ‘अरब हटाव’ आंदोलन झाले होते. त्यामुळे मिरजेकडे येणाऱ्या अरबांची संख्या कमी होऊन, अरब पर्यटक हैदराबाद व बेंगलोरकडे वळले. मात्र गेल्या दोन वर्षात मिरजेत पुन्हा अरब पर्यटक येऊ लागल्याने, येथील लॉजसह, रुग्णालये व एजंटांची कमाई सुरू होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यामुळे ऐन हंगामात अरबांचे आगमन बंद झाले आहे. मिरजेतील लॉजवर सध्या हाताच्या बोटावर मोजण्याऐवढेच अरब वास्तव्यास आहेत. (वार्ताहर)पोलिसांकडे नोंदणीअरबांच्या आगमनाची स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करून, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या अरबांची मुख्यालयात जिल्हा विशेष शाखेत नोंद करण्यात येते. अरब येताना सोबत सोने व परदेशी चलन घेऊन येत असल्याने, या कारणावरून संघर्ष होऊन मिरजेत यापूर्वी एजंटांच्या खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. पर्यटक म्हणून येणाऱ्या काही अरबांमार्फत आखाती देशांतून भारतात रोख रक्कम पाठविण्याचा उद्योग हवाला एजंटांमार्फत होत असल्याची चर्चा आहे. मात्र नोटा बंदीमुळे हवाला कारभार थंडावला आहे. संख्या रोडावली...मध्य पूर्वेतील दहशतवादामुळे लॉजवर येणाऱ्या व आता एजंटांकडे किंवा उपचारासाठी रुग्णालयात वास्तव्य करणाऱ्या अरबांचीही जिल्हा विशेष शाखेकडे नोंद करणे सक्तीचे करण्यात आले आहे. व्हिसा संपलेल्या अरबांची रवानगी त्यांच्या देशात करण्यात येत आहे. त्यामुळेही अरबांची संख्या रोडावली आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे.