शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

अरब पर्यटकांची मिरजेकडे पाठ...

By admin | Updated: December 25, 2016 23:49 IST

नोटा बंदीचा परिणाम : लॉजसह इतर व्यावसायिकांना फटका

मिरज : नोटा बंदीमुळे आखाती देशांतून मिरजेत येणाऱ्या अरब नागरिकांची संख्या घटली आहे. वैद्यकीय उपचाराच्या कारणासाठी मिरजेत येणारे अरब सध्या नोटा बंदीमुळे येत नसल्याने, लॉजसह रुग्णालये व एजंटांच्या व्यवसायास फटका बसला आहे. मिरजेत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांमुळे आखाती देशातील कतार, मस्कत, ओमान, बहारीन, सौदी, दुबई या देशांतील अरब मिरजेत येतात. तृतीय व चतुर्थश्रेणी कामगार किवा छोटे व्यावसायिक अरब मिरजेत येतात व श्रीमंत अरब मुंबई, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरात जातात. १९८० पासून पर्यटन व उपचाराच्या कारणासाठी अरब मिरजेत येतात. मिरजेत केवळ अरबांसाठी काही लॉजेस सुरू आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हंगामात मिरजेत येणाऱ्या अरबांना सर्व सुविधा पुरविणारे एजंट प्रत्येक लॉजवर आहेत. लॉजवरील वेटरपासून रिक्षावाल्यांपर्यंत सर्वांचीच या अरबांमुळे चांगली कमाई होते. मिरजेत यापूर्वी हजारो अरब येत असल्याने, लॉजेससह काही रुग्णालयांचे फलकही अरबी भाषेत झळकत होते. अरब पर्यटकांमुळे मिरजेतील व्यवसाय, उद्योगांना आधार मिळाला. मात्र त्यातून गैरप्रकार सुरू झाल्यामुळे, मौजमजेसाठी येणाऱ्या अरब पर्यटकांच्या गैरवर्तणुकीविरूध्द ३० वर्षांपूर्वी मिरजेत ‘अरब हटाव’ आंदोलन झाले होते. त्यामुळे मिरजेकडे येणाऱ्या अरबांची संख्या कमी होऊन, अरब पर्यटक हैदराबाद व बेंगलोरकडे वळले. मात्र गेल्या दोन वर्षात मिरजेत पुन्हा अरब पर्यटक येऊ लागल्याने, येथील लॉजसह, रुग्णालये व एजंटांची कमाई सुरू होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यामुळे ऐन हंगामात अरबांचे आगमन बंद झाले आहे. मिरजेतील लॉजवर सध्या हाताच्या बोटावर मोजण्याऐवढेच अरब वास्तव्यास आहेत. (वार्ताहर)पोलिसांकडे नोंदणीअरबांच्या आगमनाची स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करून, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या अरबांची मुख्यालयात जिल्हा विशेष शाखेत नोंद करण्यात येते. अरब येताना सोबत सोने व परदेशी चलन घेऊन येत असल्याने, या कारणावरून संघर्ष होऊन मिरजेत यापूर्वी एजंटांच्या खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. पर्यटक म्हणून येणाऱ्या काही अरबांमार्फत आखाती देशांतून भारतात रोख रक्कम पाठविण्याचा उद्योग हवाला एजंटांमार्फत होत असल्याची चर्चा आहे. मात्र नोटा बंदीमुळे हवाला कारभार थंडावला आहे. संख्या रोडावली...मध्य पूर्वेतील दहशतवादामुळे लॉजवर येणाऱ्या व आता एजंटांकडे किंवा उपचारासाठी रुग्णालयात वास्तव्य करणाऱ्या अरबांचीही जिल्हा विशेष शाखेकडे नोंद करणे सक्तीचे करण्यात आले आहे. व्हिसा संपलेल्या अरबांची रवानगी त्यांच्या देशात करण्यात येत आहे. त्यामुळेही अरबांची संख्या रोडावली आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे.