शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

अरब पर्यटकांची मिरजेकडे पाठ...

By admin | Updated: December 25, 2016 23:49 IST

नोटा बंदीचा परिणाम : लॉजसह इतर व्यावसायिकांना फटका

मिरज : नोटा बंदीमुळे आखाती देशांतून मिरजेत येणाऱ्या अरब नागरिकांची संख्या घटली आहे. वैद्यकीय उपचाराच्या कारणासाठी मिरजेत येणारे अरब सध्या नोटा बंदीमुळे येत नसल्याने, लॉजसह रुग्णालये व एजंटांच्या व्यवसायास फटका बसला आहे. मिरजेत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांमुळे आखाती देशातील कतार, मस्कत, ओमान, बहारीन, सौदी, दुबई या देशांतील अरब मिरजेत येतात. तृतीय व चतुर्थश्रेणी कामगार किवा छोटे व्यावसायिक अरब मिरजेत येतात व श्रीमंत अरब मुंबई, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरात जातात. १९८० पासून पर्यटन व उपचाराच्या कारणासाठी अरब मिरजेत येतात. मिरजेत केवळ अरबांसाठी काही लॉजेस सुरू आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हंगामात मिरजेत येणाऱ्या अरबांना सर्व सुविधा पुरविणारे एजंट प्रत्येक लॉजवर आहेत. लॉजवरील वेटरपासून रिक्षावाल्यांपर्यंत सर्वांचीच या अरबांमुळे चांगली कमाई होते. मिरजेत यापूर्वी हजारो अरब येत असल्याने, लॉजेससह काही रुग्णालयांचे फलकही अरबी भाषेत झळकत होते. अरब पर्यटकांमुळे मिरजेतील व्यवसाय, उद्योगांना आधार मिळाला. मात्र त्यातून गैरप्रकार सुरू झाल्यामुळे, मौजमजेसाठी येणाऱ्या अरब पर्यटकांच्या गैरवर्तणुकीविरूध्द ३० वर्षांपूर्वी मिरजेत ‘अरब हटाव’ आंदोलन झाले होते. त्यामुळे मिरजेकडे येणाऱ्या अरबांची संख्या कमी होऊन, अरब पर्यटक हैदराबाद व बेंगलोरकडे वळले. मात्र गेल्या दोन वर्षात मिरजेत पुन्हा अरब पर्यटक येऊ लागल्याने, येथील लॉजसह, रुग्णालये व एजंटांची कमाई सुरू होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यामुळे ऐन हंगामात अरबांचे आगमन बंद झाले आहे. मिरजेतील लॉजवर सध्या हाताच्या बोटावर मोजण्याऐवढेच अरब वास्तव्यास आहेत. (वार्ताहर)पोलिसांकडे नोंदणीअरबांच्या आगमनाची स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करून, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या अरबांची मुख्यालयात जिल्हा विशेष शाखेत नोंद करण्यात येते. अरब येताना सोबत सोने व परदेशी चलन घेऊन येत असल्याने, या कारणावरून संघर्ष होऊन मिरजेत यापूर्वी एजंटांच्या खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. पर्यटक म्हणून येणाऱ्या काही अरबांमार्फत आखाती देशांतून भारतात रोख रक्कम पाठविण्याचा उद्योग हवाला एजंटांमार्फत होत असल्याची चर्चा आहे. मात्र नोटा बंदीमुळे हवाला कारभार थंडावला आहे. संख्या रोडावली...मध्य पूर्वेतील दहशतवादामुळे लॉजवर येणाऱ्या व आता एजंटांकडे किंवा उपचारासाठी रुग्णालयात वास्तव्य करणाऱ्या अरबांचीही जिल्हा विशेष शाखेकडे नोंद करणे सक्तीचे करण्यात आले आहे. व्हिसा संपलेल्या अरबांची रवानगी त्यांच्या देशात करण्यात येत आहे. त्यामुळेही अरबांची संख्या रोडावली आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे.