शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

विद्यापीठ उपकेंद्र खानापूरला मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST

फोटो ओळ : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर करण्याबाबतचे पत्र आमदार अनिल बाबर यांनी उच्च व तंत्र शिक्षण ...

फोटो ओळ : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर करण्याबाबतचे पत्र आमदार अनिल बाबर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : सांगली जिल्ह्यातील खानापूर हे शहर खानापूर, आटपाडी, जत व तासगाव या तालुक्यांच्या मध्यभागी आहे. या शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने तसेच मुबलक जमीन व पाणी येथे उपलब्ध आहे. त्यामुळे या सर्व भौगोलिक स्थितीचा विचार करून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच मंजूर करावे, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. याबाबतचे पत्र आमदार बाबर यांनी मंत्र्यांना सुपुर्द केले.

आमदार बाबर म्हणाले, पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूर, सातारा, सोलापूर येथे जावे लागत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील मुख्यत्वे अवर्षणप्रवण भागातील विद्यार्थ्यांना हे आर्थिक दृष्ट्या गैरसोयीचे होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलने खानापूर येथे उपकेंद्र होण्याबाबतचा ठराव करून सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. परंतु शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र बस्तवडे (ता. तासगाव) येथे करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असल्याचे समजते. मात्र, या ठिकाणची जागा विद्यापीठ उपकेंद्रासाठी अयोग्य असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे खानापूर परिसरातील नागरिकांतून असंतोष निर्माण झालेला आहे. तरी सर्व कागदपत्रांचे अवलोकन करून सदर निर्णयाचा फेरविचार व्हावा व शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे करण्यास मंजुरी मिळावी त्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी केली.