शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ, ताकारी’च्या सुधारित खर्चास मंजुरी

By admin | Updated: July 4, 2017 00:36 IST

‘म्हैसाळ, ताकारी’च्या सुधारित खर्चास मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ, ताकारी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ४ हजार ९५९ कोटी ९१ लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास मुंबई येथे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दोन्ही जिल्ह्यातील २८८ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे, अशी माहिती खा. संजयकाका पाटील यांनी कवठेमहांकाळ येथील पत्रकार परिषदेमध्ये सोमवारी दिली.ते म्हणाले की, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प हा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळअंतर्गत आहे. प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा योजना आहेत. या योजनेद्वारे एकूण ४ टप्प्यांमध्ये ९.३४ अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांतील एकूण २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे एकूण ६ टप्प्यांमध्ये १७.४४ अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील एकूण ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. दोन्ही योजना समाविष्ट असलेल्या कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेतून एकूण १ लाख ९ हजार १२७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. चौदा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर या योजनांचे काम अखेर मार्गी लागणार असून, शेतकऱ्यांच्या पाणीसाठ्यापर्यंत पाणी पोहोचविण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण होणार असल्याचेही खा. पाटील यांनी सांगितले. जत तालुक्यातील ४२ गावांचा पाणीप्रश्नही यामुळे कायमचा निकालात निघणार असून, तुबची-बबलेश्वर योजना मार्गी लागणार आहे. गेली सहा महिने आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे यासाठी पाठपुरावा करीत होतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या कामात आपण सांगितल्यावर लक्ष घालून हा प्रश्न अखेर सोडवला आहे. त्यामुळे फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे तारणहार आहे. तबब्ल २५ बैठका या प्रश्नावर आपण घेण्यास भाग पाडले व हा प्रश्न अखेर निकालात काढला आहे, असे सांगून, जून २०१९ पर्यंत या योजना पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या पाणीसाठ्यापर्यंत पाणी जाईल आणि बळीराजा कायमचा सुखी होईल, असे खा. पाटील म्हणाले.१४ वर्षांनंतर प्रश्न निकालातराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या या पाणीप्रश्नाला प्राधान्य दिल्यानेच १४ वर्षांनंतर हा प्रश्न निकालात निघाल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. दुष्काळी भागातील बळिराजाची व भूमातेची तहान कायमची भागविणे हे माझे ध्येय होते. ते आज पूर्णत्वाकडे जात आहे, याचा आपल्याला आनंद होत असल्याचेही खा. पाटील यांनी यावेळी सांगितले.