शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

‘म्हैसाळ, ताकारी’च्या सुधारित खर्चास मंजुरी

By admin | Updated: July 4, 2017 00:36 IST

‘म्हैसाळ, ताकारी’च्या सुधारित खर्चास मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ, ताकारी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ४ हजार ९५९ कोटी ९१ लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास मुंबई येथे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दोन्ही जिल्ह्यातील २८८ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे, अशी माहिती खा. संजयकाका पाटील यांनी कवठेमहांकाळ येथील पत्रकार परिषदेमध्ये सोमवारी दिली.ते म्हणाले की, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प हा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळअंतर्गत आहे. प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा योजना आहेत. या योजनेद्वारे एकूण ४ टप्प्यांमध्ये ९.३४ अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांतील एकूण २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे एकूण ६ टप्प्यांमध्ये १७.४४ अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील एकूण ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. दोन्ही योजना समाविष्ट असलेल्या कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेतून एकूण १ लाख ९ हजार १२७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. चौदा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर या योजनांचे काम अखेर मार्गी लागणार असून, शेतकऱ्यांच्या पाणीसाठ्यापर्यंत पाणी पोहोचविण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण होणार असल्याचेही खा. पाटील यांनी सांगितले. जत तालुक्यातील ४२ गावांचा पाणीप्रश्नही यामुळे कायमचा निकालात निघणार असून, तुबची-बबलेश्वर योजना मार्गी लागणार आहे. गेली सहा महिने आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे यासाठी पाठपुरावा करीत होतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या कामात आपण सांगितल्यावर लक्ष घालून हा प्रश्न अखेर सोडवला आहे. त्यामुळे फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे तारणहार आहे. तबब्ल २५ बैठका या प्रश्नावर आपण घेण्यास भाग पाडले व हा प्रश्न अखेर निकालात काढला आहे, असे सांगून, जून २०१९ पर्यंत या योजना पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या पाणीसाठ्यापर्यंत पाणी जाईल आणि बळीराजा कायमचा सुखी होईल, असे खा. पाटील म्हणाले.१४ वर्षांनंतर प्रश्न निकालातराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या या पाणीप्रश्नाला प्राधान्य दिल्यानेच १४ वर्षांनंतर हा प्रश्न निकालात निघाल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. दुष्काळी भागातील बळिराजाची व भूमातेची तहान कायमची भागविणे हे माझे ध्येय होते. ते आज पूर्णत्वाकडे जात आहे, याचा आपल्याला आनंद होत असल्याचेही खा. पाटील यांनी यावेळी सांगितले.