शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

‘म्हैसाळ, ताकारी’च्या सुधारित खर्चास मंजुरी

By admin | Updated: July 4, 2017 00:36 IST

‘म्हैसाळ, ताकारी’च्या सुधारित खर्चास मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ, ताकारी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ४ हजार ९५९ कोटी ९१ लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास मुंबई येथे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दोन्ही जिल्ह्यातील २८८ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे, अशी माहिती खा. संजयकाका पाटील यांनी कवठेमहांकाळ येथील पत्रकार परिषदेमध्ये सोमवारी दिली.ते म्हणाले की, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प हा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळअंतर्गत आहे. प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा योजना आहेत. या योजनेद्वारे एकूण ४ टप्प्यांमध्ये ९.३४ अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांतील एकूण २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे एकूण ६ टप्प्यांमध्ये १७.४४ अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील एकूण ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. दोन्ही योजना समाविष्ट असलेल्या कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेतून एकूण १ लाख ९ हजार १२७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. चौदा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर या योजनांचे काम अखेर मार्गी लागणार असून, शेतकऱ्यांच्या पाणीसाठ्यापर्यंत पाणी पोहोचविण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण होणार असल्याचेही खा. पाटील यांनी सांगितले. जत तालुक्यातील ४२ गावांचा पाणीप्रश्नही यामुळे कायमचा निकालात निघणार असून, तुबची-बबलेश्वर योजना मार्गी लागणार आहे. गेली सहा महिने आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे यासाठी पाठपुरावा करीत होतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या कामात आपण सांगितल्यावर लक्ष घालून हा प्रश्न अखेर सोडवला आहे. त्यामुळे फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे तारणहार आहे. तबब्ल २५ बैठका या प्रश्नावर आपण घेण्यास भाग पाडले व हा प्रश्न अखेर निकालात काढला आहे, असे सांगून, जून २०१९ पर्यंत या योजना पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या पाणीसाठ्यापर्यंत पाणी जाईल आणि बळीराजा कायमचा सुखी होईल, असे खा. पाटील म्हणाले.१४ वर्षांनंतर प्रश्न निकालातराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या या पाणीप्रश्नाला प्राधान्य दिल्यानेच १४ वर्षांनंतर हा प्रश्न निकालात निघाल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. दुष्काळी भागातील बळिराजाची व भूमातेची तहान कायमची भागविणे हे माझे ध्येय होते. ते आज पूर्णत्वाकडे जात आहे, याचा आपल्याला आनंद होत असल्याचेही खा. पाटील यांनी यावेळी सांगितले.