शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विट्याच्या वादग्रस्त बांधकामांना मंजुरी

By admin | Updated: February 13, 2016 00:25 IST

जिल्हा परिषद सभा : बांधकामांना पूर्वी विरोध करणारे सभेमध्ये गप्पच कसे?

सांगली : खानापूर पंचायत समितीकडून विटा येथे मोक्याच्या जागेत १८ दुकान गाळे बांधले आहेत. येथील विटा तालुका नगरवाचनालय आणि जीवनप्रबोधिनी संस्थेने बांधकाम परवाना न घेताच पहिल्या मजल्यावर बेकायदेशीर बांधकाम केले आहे. या प्रश्नावर काँग्रेस सदस्यांनी अनेक सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच दोन्ही संस्थांकडूनही परस्पर तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. परंतु, वरील दोन्ही वादग्रस्त विषय शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आल्यानंतर कुणीच त्यास विरोध केला नाही. एका मिनिटात विषय मंजूर झालेला सदस्यांना कळलाच नाही. यामागचे नक्की कारण काय, असा प्रश्न सभा संपल्यानंतर काही सदस्यांनी उपस्थित केला. तसेच पूर्वी विरोध करणाऱ्यांनीही सभेत विषय आल्यानंतर चर्चाच का केली नाही, अशीही चर्चा रंगली आहे.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी एक ते २७ विषयांना अर्ध्या तासामध्ये मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेत गेल्या सहा महिन्यांपासून विटा येथील पंचायत समितीच्या गाळ्यांचा विषय गाजत आहे. येथील १८ गाळ्यांवर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी कोणताही परवाना न घेताच बांधकाम केले होते. यामध्ये विटा तालुका नगरवाचनालय यांनी १८ दुकान गाळ्यांच्या संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील १२८ चौरस मीटर रिकाम्या जागेत बांधकाम केले आहे. येथील पहिल्या मजल्यावरीलच रिकाम्या मोकळ्या जागेत जीवनप्रबोधिनी यांनी ३५२.१८ चौरस मीटर रिकाम्या जागेत बांधकाम केले आहे. या संस्थांनी बांधकाम केलेले जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कोणतीही कल्पना नव्हती. शिवाय, त्यांच्याकडून भाडेही वसूल झाले नाही. याशिवाय १८ गाळ्यांचेही नियमित भाडे वसूल नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. या प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेबरोबरच बांधकाम समिती सभेतही मुद्दा उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. याच ठिकाणी सामान्य जनता असती, तर लगेच अधिकाऱ्यांनीही कारवाई केली असती. परंतु, या दोन्ही संस्थांच्या बांधकामाबाबत अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही मौन बाळगले. शेवटी शुक्रवार, दि. १२ फेब्रुवारीला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या विषयास मंजुरी देण्यात आली. यावेळी एकाही सदस्याने चर्चेची विनंती केली नाही. यामुळे वादग्रस्त मुद्दा एकदम शांततेत मंजूर होण्याचे नक्की कारण काय, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला.या सभेस उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, पपाली कचरे, मनीषा पाटील, उज्ज्वला लांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)विट्याच्या वादग्रस्त बांधकामांना मंजुरीजिल्हा परिषद सभा : बांधकामांना पूर्वी विरोध करणारे सभेमध्ये गप्पच कसे?सांगली : खानापूर पंचायत समितीकडून विटा येथे मोक्याच्या जागेत १८ दुकान गाळे बांधले आहेत. येथील विटा तालुका नगरवाचनालय आणि जीवनप्रबोधिनी संस्थेने बांधकाम परवाना न घेताच पहिल्या मजल्यावर बेकायदेशीर बांधकाम केले आहे. या प्रश्नावर काँग्रेस सदस्यांनी अनेक सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच दोन्ही संस्थांकडूनही परस्पर तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. परंतु, वरील दोन्ही वादग्रस्त विषय शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आल्यानंतर कुणीच त्यास विरोध केला नाही. एका मिनिटात विषय मंजूर झालेला सदस्यांना कळलाच नाही. यामागचे नक्की कारण काय, असा प्रश्न सभा संपल्यानंतर काही सदस्यांनी उपस्थित केला. तसेच पूर्वी विरोध करणाऱ्यांनीही सभेत विषय आल्यानंतर चर्चाच का केली नाही, अशीही चर्चा रंगली आहे.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी एक ते २७ विषयांना अर्ध्या तासामध्ये मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेत गेल्या सहा महिन्यांपासून विटा येथील पंचायत समितीच्या गाळ्यांचा विषय गाजत आहे. येथील १८ गाळ्यांवर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी कोणताही परवाना न घेताच बांधकाम केले होते. यामध्ये विटा तालुका नगरवाचनालय यांनी १८ दुकान गाळ्यांच्या संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील १२८ चौरस मीटर रिकाम्या जागेत बांधकाम केले आहे. येथील पहिल्या मजल्यावरीलच रिकाम्या मोकळ्या जागेत जीवनप्रबोधिनी यांनी ३५२.१८ चौरस मीटर रिकाम्या जागेत बांधकाम केले आहे. या संस्थांनी बांधकाम केलेले जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कोणतीही कल्पना नव्हती. शिवाय, त्यांच्याकडून भाडेही वसूल झाले नाही. याशिवाय १८ गाळ्यांचेही नियमित भाडे वसूल नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. या प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेबरोबरच बांधकाम समिती सभेतही मुद्दा उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. याच ठिकाणी सामान्य जनता असती, तर लगेच अधिकाऱ्यांनीही कारवाई केली असती. परंतु, या दोन्ही संस्थांच्या बांधकामाबाबत अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही मौन बाळगले. शेवटी शुक्रवार, दि. १२ फेब्रुवारीला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या विषयास मंजुरी देण्यात आली. यावेळी एकाही सदस्याने चर्चेची विनंती केली नाही. यामुळे वादग्रस्त मुद्दा एकदम शांततेत मंजूर होण्याचे नक्की कारण काय, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला.या सभेस उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, पपाली कचरे, मनीषा पाटील, उज्ज्वला लांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद स्वीय निधीतील एक कोटी पंचवीस लाखांच्या यशवंत घरकुल योजना राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ही योजना केवळ २०१५-१६ या वित्तीय वर्षापुरतीच मर्यादित देत असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनास या वर्षात योजनेचा निधी खर्च करताना कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे. याच धर्तीवर ग्रामीण भागातील केशकर्तनालयांना ७५ टक्के अनुदानावर अद्ययावत खुर्ची पुरविण्यासाठीही मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना राबविण्यास अडचण निर्माण होईल, असे अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले आहे. ही योजना कशापध्दतीने राबवायची, याचे धोरणच निश्चित झाले नाही.