शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात सत्ताधाऱ्यांच्या तहकुबीच्या चर्चेेनंतर अर्थसंकल्पाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:38 IST

तासगाव : नगरपालिकेच्या प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प ऐनवेळी हातात मिळाला आहे. त्यावर अभ्यास करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे ही ...

तासगाव : नगरपालिकेच्या प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प ऐनवेळी हातात मिळाला आहे. त्यावर अभ्यास करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे ही सभा तहकूब करावी, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केल्यानंतर चक्क सत्ताधारी नगरसेवकांनीही सभा तहकुबीची मागणी केली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती सांगितल्यानंतर १११ कोटी ४३ लाख ८८ हजार २७५ रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

तासगाव नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी अर्थसंकल्पीय सभा झाली. नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, उपनगराध्यक्ष दत्तात्रय रेंदाळकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित माळी, बाळासाहेब सावंत यांनी हरकत घेतली. अर्थसंकल्पाचे प्रोसीडिंग वेळेत हातात मिळाले नाही. त्यावर सखोल अभ्यास करून अपेक्षित बदल सुचवायला हवेत. त्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे ही सभा तहकूब करावी, अशी मागणी केली.

एरव्ही राष्ट्रवादीला विरोध करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनीही सुरात सूर मिसळून सभा तहकूब करण्याची मागणी केली. मात्र अर्थसंकल्पीय सभा तहकूब केल्यास दुसऱ्यांदा सभा घेऊन अर्थसंकल्प मंजूर करता येणार नाही, अशी माहिती मुख्याधिकारी पाटील यांनी दिली. त्यानंतर नगराध्यक्ष डॉ. सावंत यांनी नगरसेवकांनी सुचविलेले बदल पुढील सभेत स्वीकारण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर अर्थसंकल्प एकमताने मंजूर करण्यात आला.

कोणतीही करवाढ नसलेला, वास्तवदर्शी अर्थसंकल्प सादर केल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. १११ कोटी ४३ लाख ८८ हजार २७५ रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. महिला-बालकल्याण, आरोग्य, रस्ते, शाळा यांसह बहुतांश विभागांसाठी निधीची तरतूद करीत, समतोल राखत अर्थसंकल्प मंजूर झाला.

मुख्याधिकाऱ्यांमुळे टळली सभा रद्दची नामुष्की

भाजपमधील काही सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पाबाबत प्रश्‍न उपस्थित करून या सभेत सुचविलेले बदल दाखवा, असे आव्हान दिले. ‘स्थायी’च्या सभेत अर्थसंकल्प सादर केला असेल तर नगरसेवकांना आधीच प्रोसीडिंग का दिले नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून सभा रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडूनच सभा रद्द होण्याची नामुष्की दिसून येत होती. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी नियमांची माहिती दिल्यानंतर सभा रद्दची नामुष्की टळली.