शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी लवादाची नियुक्ती तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST

मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना लवाद नियुक्तीसाठी निवेदन दिले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...

मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना लवाद नियुक्तीसाठी निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील भूसंपादनासाठी लवादाची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून, त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ हा मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतून जातो. त्यासाठी अनेक एकर शेतजमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीचे मुल्यांकन चुकीचे झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. दोन्ही तालुक्यांमधील काही शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला अद्याप स्वीकारलेला नाही तर काहींनी सशर्त स्वीकारला आहे. काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ही कोंडी फुटण्यासाठी लवादाची नियुक्ती होण्याची आवश्यकता आहे. सांगलीच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांची लवाद म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यासंदर्भात महेश सलगरे, रवींद्र पाटील, महादेव कौलापुरे, प्रमोद कबाडे, सचिन पाटील, अरविंद गुळवणे यांच्यासह शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात शेतीचे मुल्यांकन करताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. मोबदल्याचा निवाडा एकतर्फी केला. जमिनींचे बाजारमूल्य मनमानीपणाने निश्चित केले. तसेच भूसंपादन कायद्यातील तरतुदींचा विचार न करता मोघम किमती निश्चित केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. याविषयी दाद मागण्यासाठी लवादाची नियुक्ती तातडीने होणे गरजेचे आहे. भूसंपादन होऊन दोन-तीन वर्षे झाली तरी तो अद्याप नेमला गेलेला नाही, असे म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी स्वीकारले.

-------------