शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

खानापूरजवळ टेंभूचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:48 IST

पांडुरंग डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क खानापूर : तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘कृष्णामाई’ खानापूर घाटमाथ्यावर अवतरली आणि संपूर्ण घाटमाथ्यावर ...

पांडुरंग डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कखानापूर : तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘कृष्णामाई’ खानापूर घाटमाथ्यावर अवतरली आणि संपूर्ण घाटमाथ्यावर उत्साही व आनंदी वातावरण पसरले. गेल्या पाच वर्षांपासून घाटमाथ्यावरील सर्वच गावांत भीषण पाणीटंचाई जाणवत असताना ‘कृष्णामाई’चे झालेले आगमन घाटमाथ्यावरील ‘दुष्काळ’ कायमचा संपविणार असल्याची भावना लोकांमधून व्यक्त होत आहे.खानापूर घाटमाथ्यावर टेंभू योजनेच्या भूड येथील पाचवा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कृष्णेचे पाणी येणार होते. त्यामुळे पाचव्या टप्प्याकडे संपूर्ण खानापूर पूर्व भागाचे लक्ष लागून राहिले होते. १९९७ मध्ये स्थापन झालेल्या टेंभू योजनेच्या भूड येथील पाचव्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास २०१९ उजाडले. पाचव्या टप्प्याचे काम पूर्ण होणार का? घाटमाथ्यावर पाणी येणार का? अशी साशंकता व्यक्त होत होती. मात्र पाचव्या टप्प्याच्या कामास गेल्या सात-आठ महिन्यांपासून गती आली आणि प्रत्यक्ष पाचव्या टप्प्यावर कार्यरत यंत्रणेच्या अथक् प्रयत्नाने पाचवा टप्पा पूर्ण होऊन यशस्वी झाला.गेली पाच वर्षे खानापूर घाटमाथा भीषण दुष्काळास तोंड देत आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्व स्रोत आटल्याने अत्यंत गंभीर बनला आहे. तलाव, विहिरींबरोबर कूपनलिकांचे पाणी संपल्याने सर्व गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टॅँकर भरण्यासाठी जवळपास पाणी नाही. यामुळे खानापूर घाटमाथा टेंभूच्या पाण्याकडे डोळे लावून बसला होता. पाचवा टप्पा जिव्हाळ्याचा व जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता.गेल्या आठवड्यापासून पाचवा टप्पा आज सुरू होणार, उद्या सुरू होणार, अशा बातम्यांमुळे लोकांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. मागील दोन दिवसांत दोनवेळा पाचवा टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु काही अडचणींमुळे यशस्वी झाला नाही. अखेर रविवारी सकाळी भूडच्या पाचव्या टप्प्याची एक मोटर सुरू झाली.बलवडी (खा.) च्या मुख्य टाकीत पाणी आले, अशी बातमी घाटमाथ्यावर पसरली आणि लोकांनी बलवडी (खा.)कडे धाव घेतली. वाहते पाणी पाहून लोकांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.