शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

पालिका क्षेत्रात कृषी योजना लागू करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : नगरपालिका आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शेतकºयांना कृषी खात्याच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय आपण घेत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.कडेगाव येथे लिबर्टी गणेश मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षपदी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : नगरपालिका आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शेतकºयांना कृषी खात्याच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय आपण घेत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.कडेगाव येथे लिबर्टी गणेश मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, तहसीलदार अर्चना शेटे, आरोग्य अधिकारी डॉ. पत्की, तालुका कृषी अधिकारी पिंजारी, मुख्याधिकारी चरण कोल्हे, भाजप माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख प्रमुख उपस्थित होते.सदाभाऊ खोत म्हणाले की, मुख्यमंत्री पेयजल योजनेचे राज्याचे ५०० कोटींचे बजेट आहे. त्यापैकी आपण आणि संग्रामसिंह देशमुख दोघांनी प्रयत्न करून २५० कोटी रुपये सांगली जिल्ह्यासाठी आणले आहेत.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कडेगाव शहराचा आणि तालुक्याचा भरघोस विकास केला जाईल. शासनाच्या विविध योजना या ठिकाणी राबविल्या जातील. कडेगाव दारूबंदीसाठी राज्यपातळीवर याबाबत सदाभाऊ खोत यांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.यावेळी शासनाच्या विविध योजनांचे पत्रक राज्य कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते महिला व ग्रामस्थांना देण्यात आले. तसेच कडेगाव दारूबंदीसाठी अधिकारी वर्ग जुमानत नसल्याच्या तक्रारी महिला वर्गाकडून करण्यात आल्या. त्याबाबतचे निवेदन महिलांच्यावतीने मंत्री खोत यांना देण्यात आले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, डॉ. पत्की यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख, नगरसेवक हाजी शौकत पटेल, नगरसेविका शांता घाडगे, अश्विनी वेल्हाळ, सिंधू रास्कर, युवा नेते धनंजय देशमुख, सुरेश यादव, श्रीजय देशमुख, रवी पालकर, हनीफ आत्तार, अश्रफ तांबोळी, संदीप गायकवाड उपस्थित होते.दारुबंदीचा प्रश्न मार्गी लावणारयावेळी खोत म्हणाले की, कर्जमाफी देण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि त्यानंतर आणखी शेतकरी कर्जमाफी अर्ज भरण्यास वंचित राहिले, तर शेवटचा शेतकरी अर्ज भरेपर्यंत १५ सप्टेंबरनंतरही आणखी मुदतवाढ देण्यात येईल. कडेगावातील महिलांनी समाजाला व्यसनापासून दूर ठेवण्याचा स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला आहे. महिलांचा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे. दारूबंदीसाठी संबंधित अधिकाºयांशी चर्चा करू आणि दारूबंदीबाबत आदेश देऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे ते म्हणाले.