शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पालिका क्षेत्रात कृषी योजना लागू करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : नगरपालिका आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शेतकºयांना कृषी खात्याच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय आपण घेत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.कडेगाव येथे लिबर्टी गणेश मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षपदी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : नगरपालिका आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शेतकºयांना कृषी खात्याच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय आपण घेत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.कडेगाव येथे लिबर्टी गणेश मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, तहसीलदार अर्चना शेटे, आरोग्य अधिकारी डॉ. पत्की, तालुका कृषी अधिकारी पिंजारी, मुख्याधिकारी चरण कोल्हे, भाजप माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख प्रमुख उपस्थित होते.सदाभाऊ खोत म्हणाले की, मुख्यमंत्री पेयजल योजनेचे राज्याचे ५०० कोटींचे बजेट आहे. त्यापैकी आपण आणि संग्रामसिंह देशमुख दोघांनी प्रयत्न करून २५० कोटी रुपये सांगली जिल्ह्यासाठी आणले आहेत.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कडेगाव शहराचा आणि तालुक्याचा भरघोस विकास केला जाईल. शासनाच्या विविध योजना या ठिकाणी राबविल्या जातील. कडेगाव दारूबंदीसाठी राज्यपातळीवर याबाबत सदाभाऊ खोत यांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.यावेळी शासनाच्या विविध योजनांचे पत्रक राज्य कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते महिला व ग्रामस्थांना देण्यात आले. तसेच कडेगाव दारूबंदीसाठी अधिकारी वर्ग जुमानत नसल्याच्या तक्रारी महिला वर्गाकडून करण्यात आल्या. त्याबाबतचे निवेदन महिलांच्यावतीने मंत्री खोत यांना देण्यात आले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, डॉ. पत्की यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख, नगरसेवक हाजी शौकत पटेल, नगरसेविका शांता घाडगे, अश्विनी वेल्हाळ, सिंधू रास्कर, युवा नेते धनंजय देशमुख, सुरेश यादव, श्रीजय देशमुख, रवी पालकर, हनीफ आत्तार, अश्रफ तांबोळी, संदीप गायकवाड उपस्थित होते.दारुबंदीचा प्रश्न मार्गी लावणारयावेळी खोत म्हणाले की, कर्जमाफी देण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि त्यानंतर आणखी शेतकरी कर्जमाफी अर्ज भरण्यास वंचित राहिले, तर शेवटचा शेतकरी अर्ज भरेपर्यंत १५ सप्टेंबरनंतरही आणखी मुदतवाढ देण्यात येईल. कडेगावातील महिलांनी समाजाला व्यसनापासून दूर ठेवण्याचा स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला आहे. महिलांचा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे. दारूबंदीसाठी संबंधित अधिकाºयांशी चर्चा करू आणि दारूबंदीबाबत आदेश देऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे ते म्हणाले.