शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेली वाहने परत नेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

सांगली : वाहतूक शाखा सांगलीच्यावतीने विविध कारवायांवेळी जप्त केलेली वाहने वाहनधारकांनी परत नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहनधारक आवश्यक ...

सांगली : वाहतूक शाखा सांगलीच्यावतीने विविध कारवायांवेळी जप्त केलेली वाहने वाहनधारकांनी परत नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहनधारक आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आपली वाहने घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे दंड झालेली अथवा जप्त केलेली वाहने मूळ मालकांनी ताब्यात घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--------

बँकांमधील गर्दी पुन्हा वाढू लागली

सांगली : कोरोना निर्बंधांमुळे पन्नास टक्के क्षमतेत सुरू असलेले बँक कामकाज आता पूर्ववत करण्यात आल्याने ग्राहकांची बँकांमध्ये गर्दी वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांना निर्बंध लागू केले होते. त्यात बँकांमध्ये ५० टक्के उपस्थितीमध्ये कामकाजास परवानगी होती. आता निर्बंध शिथिल करताना पूर्ण कामकाज सुरू झाल्याने गर्दी वाढत असून अनेक बँकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला आहे.

----------

सह्याद्रीनगर परिसरातील पथदिवे बंद

सांगली : शहरातील अध्यक्ष बंगला ते मंगळवार बाजार चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. या मार्गावरून कुपवाडकडे अवजड वाहनांची वाहतूक नेहमीच सुरू असते. त्यामुळे पथदिवे बंद असल्याने रस्त्यावरील वाहनांचा व पादचाऱ्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे महापालिकेने या मार्गावरील सर्व पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

-----

वाहतूक पोलिसांकडून कडक तपासणी

सांगली : निर्बंधात शिथिलता देण्यात आल्यानंतर शहरातील गर्दीमध्ये पुन्हा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेट्स लावून वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे. मास्कचा वापर न करणे यासह ट्रीपल सीट फिरणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, यापुढेही अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----

औद्योगिक वसाहतीत रस्त्यांची दुरवस्था

सांगली : शहरात माधवनगर रोडवर असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या परिसरात अनेक कारखाने असल्याने मालवाहतूक वाहनांची नेहमीच ये-जा सुरू असते. शिवाय याच परिसरात आरटीओ कार्यालयही असल्याने गर्दी कायम असते. त्यामुळे प्रमुख मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. सध्या पाणी साचून राहिल्याने अपघात घडत असून रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.