शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जप्त केलेली वाहने परत नेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

सांगली : वाहतूक शाखा सांगलीच्यावतीने विविध कारवायांवेळी जप्त केलेली वाहने वाहनधारकांनी परत नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहनधारक आवश्यक ...

सांगली : वाहतूक शाखा सांगलीच्यावतीने विविध कारवायांवेळी जप्त केलेली वाहने वाहनधारकांनी परत नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहनधारक आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आपली वाहने घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे दंड झालेली अथवा जप्त केलेली वाहने मूळ मालकांनी ताब्यात घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--------

बँकांमधील गर्दी पुन्हा वाढू लागली

सांगली : कोरोना निर्बंधांमुळे पन्नास टक्के क्षमतेत सुरू असलेले बँक कामकाज आता पूर्ववत करण्यात आल्याने ग्राहकांची बँकांमध्ये गर्दी वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांना निर्बंध लागू केले होते. त्यात बँकांमध्ये ५० टक्के उपस्थितीमध्ये कामकाजास परवानगी होती. आता निर्बंध शिथिल करताना पूर्ण कामकाज सुरू झाल्याने गर्दी वाढत असून अनेक बँकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला आहे.

----------

सह्याद्रीनगर परिसरातील पथदिवे बंद

सांगली : शहरातील अध्यक्ष बंगला ते मंगळवार बाजार चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. या मार्गावरून कुपवाडकडे अवजड वाहनांची वाहतूक नेहमीच सुरू असते. त्यामुळे पथदिवे बंद असल्याने रस्त्यावरील वाहनांचा व पादचाऱ्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे महापालिकेने या मार्गावरील सर्व पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

-----

वाहतूक पोलिसांकडून कडक तपासणी

सांगली : निर्बंधात शिथिलता देण्यात आल्यानंतर शहरातील गर्दीमध्ये पुन्हा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेट्स लावून वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे. मास्कचा वापर न करणे यासह ट्रीपल सीट फिरणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, यापुढेही अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----

औद्योगिक वसाहतीत रस्त्यांची दुरवस्था

सांगली : शहरात माधवनगर रोडवर असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या परिसरात अनेक कारखाने असल्याने मालवाहतूक वाहनांची नेहमीच ये-जा सुरू असते. शिवाय याच परिसरात आरटीओ कार्यालयही असल्याने गर्दी कायम असते. त्यामुळे प्रमुख मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. सध्या पाणी साचून राहिल्याने अपघात घडत असून रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.