शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST

सांगली : जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. कंपनीकडून ग्राहकांना विविध प्रकारची माहिती ...

सांगली : जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. कंपनीकडून ग्राहकांना विविध प्रकारची माहिती एसएमएसद्वारे दिली जात असल्याने मोबाईल क्रमांक आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

जिल्ह्यात घरगुती, वाणिज्य, अैाद्योगिक व कृषी गटातील ८ लाख २३ हजार ८४ ग्राहकांनी मोबाईल क्रमांक नोंदवला आहे. वीजपुरवठा, बिलिंग व अन्य माहिती त्यांना एसएमएसद्वारे नियमित दिली जाते. मीटरचे रिडींग, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस, देखभाल व दुरुस्ती आदींचीही माहिती दिली जाते. मोबाईल नोंदणी न केलेल्या ग्राहकांपर्यंत माहिती पोहचत नाही. त्यामुळे सर्वांनी मोबाईल क्रमांक नोंदवावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

७६ हजार ५६१ ग्राहकांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. यामध्ये ३९ हजार ४५३ घरगुती व ३७ हजार १०८ शेतकरी ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर, १९१२ या कॉल सेंटरवर किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर नोंदणी करता येईल.

चौकट

भाडेकरुंचे मोबाईल क्रमांक द्यावेत

अनेक घरमालकांनी भाडेकरुंसाठी स्वतंत्र मीटर घेतली आहेत. त्यासाठी मोबाईल क्रमांक मात्र भाडेकरुंचा न देता स्वत:चा नोंदवला आहे. वीज वापरणाऱ्या भाडेकरुला त्यासंदर्भात कोणतीही माहिती महावितरणकडून मिळत नाही. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरुचा मोबाईल क्रमांक देण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे.