शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘अंनिस’च्या संमेलनाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 00:15 IST

दुसरे संमेलन : देशातील नामवंत विचारवंतांचे १४ मेपासून विचारमंथन

सांगली : ‘संघर्ष चालूच राहील... निर्धार अखंड राहील...!’ या प्रेरणादायी वाक्यासह चालविण्यात येणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या दुसऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. आज (बुधवार)पासून मंडप उभारणीच्या कामास सुरुवात झाली असून शहरात ठिकठिकाणी संमेलनाच्या जाहिराती लावण्यात आल्याने वातावरण संमेलनमय झाले आहे. देशभरातील ख्यातनाम पुरोगामी विचारवंतांच्या सहवासात होणाऱ्या या संमेलनाची सांगलीकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. दि. १४ आणि १५ मे रोजी वैचारिक मंथन होणार आहेच, त्याचबरोबर सांगलीकरांना पुरोगामी साहित्य संग्रहित ठेवता यावे, याकरिता पुस्तकांची पंधराहून अधिक दालने उभारण्यात येणार आहेत. राज्यात पुरोगामी विचारांचा प्राधान्याने पुरस्कार करणारी भूमी म्हणून सांगलीची ओळख आहे. या सांगलीत दोन दिवस अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांच्या विचारांचे विचारधन वेचण्याची संधी सांगलीकरांना मिळणार आहे. दोन दिवस वैचारिक खाद्य सांगलीकरांना मिळणार आहेच, त्याचबरोबर पुस्तकरूपी वैचारिक खजिनाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रामुख्याने पुरोगामी विचार रुजविण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येणार आहे. संमेलनस्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन, हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्यु.च्या सभागृहात होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीला दोन दिवसांपासून चांगलाच वेग आला आहे. बुधवारी कार्यक्रमस्थळी डिजिटल फलक लावत मंडपाचे काम सुरु झाले आहे. संमेलनाच्या ठिकाणी भोजन कक्ष आणि पुस्तक कक्ष यासाठी दोन प्रशस्त मंडप उभारण्यात येणार आहेत. संमेलनाचा अवधी आता काही तासांवर येऊन ठेपला असल्याने कार्यकर्ते दिवस-रात्र एक करुन तयारीत मग्न असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)संमेलनाच्या अध्यक्षपदी परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक डॉ. आ. ह. साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे, तर ख्यातनाम भाषातज्ज्ञ डॉ. गणेशदेवी यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याबरोबरच डॉ. तारा भवाळकर, डॉ. बाबूराव गुरव, प्रज्ञा दया पवार, डॉ. प्रदीप पाटकर, तुकडोजी महाराजांचे शिष्य सत्यपाल महाराज यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरणार आहे. मॅगसेसे पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांची उपस्थिती संमेलनाचे खास आकर्षण ठरणार आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ यासारख्या पुस्तकातून समाजाच्या दुखऱ्या नसेवर अचूक बोट ठेवणाऱ्या साईनाथ यांचे विचार ऐकण्याची संधी संमेलनाच्या माध्यमातून सांगलीकरांना मिळणार आहे.