शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

कर्नाटकसाठी कोयनेतून आणखी एक टीएमसी पाणी

By admin | Updated: May 1, 2016 00:27 IST

विसर्ग वाढविला : कर्नाटकातील भाजप नेत्यांच्या दबावामुळे निर्णय

मिरज : कोयनेतून एक टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर कर्नाटकातील भाजप नेत्यांच्या दबावामुळे आणखी एक टीएमसी पाणी कर्नाटकसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकसाठी शनिवारपासून कोयनेतून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयनेतून दोन टीएमसी पाणी देण्यात येत असताना कर्नाटकातून अद्याप अक्कलकोटला पाणी सोडण्यात आलेले नाही. कर्नाटक सीमा भागात तीव्र पाणी टंचाईमुळे बुधवारपासून कोयना व वारणा धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यात आले. कर्नाटकातील जमखंडीजवळ हिप्परगी धरणापर्यंत हे पाणी पोहोचले. शनिवारी कोयना धरणातून विसर्ग बंद करण्यात येणार होता. मात्र एक टीएमसी पाणी अपुरे असल्याने आणखी एक टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने केली. जलसंपदा विभागाने कोयना व वारणा धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने व जूनमध्ये पाऊस पडला नाही तर उर्वरित पाणीसाठा आवश्यक असल्याने कर्नाटकला आणखी पाणी देण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र आणखी पाण्याच्या मागणीसाठी चिकोडीचे खा. प्रकाश हुक्केरी यांच्यासह कर्नाटकातील शिष्टमंडळाने मुंबईत तळ ठोकला होता. कर्नाटकसाठी आणखी पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे शनिवारपासून कोयनेतून पुन्हा प्रतिसेकंद चार हजार क्युसेक्स वेगाने सोडण्यात येत आहे. आणखी पाणी उपलब्ध झाल्याने कर्नाटकातील सीमाभागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाणी देताना कर्नाटकातील सिंचन योजनेतून अक्कलकोटला पाणी सोडण्याचे ठरले आहे. मात्र कर्नाटकातून अक्कलकोटला अद्याप पाणी सोडण्यात आले नाही.