शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंवरील हल्ला दहशतवादी कृत्य घोषित करा

By admin | Updated: May 1, 2015 00:16 IST

भालचंद्र कांगो : भूसंपादन कायद्याविरोधात १४ मे रोजी आंदोलन

सांगली : सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला शासनाने दहशतवादी कृत्य म्हणून घोषित करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केली. शासनाच्या भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करण्याकरिता दि. १४ मे रोजी देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉ. कांगो म्हणाले की, पानसरे यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने दीडशे टीम तयार केल्या आहेत, परंतु तरीही मारेकऱ्यांना अटक करण्यात यश आलेले नाही. आता त्यांनी एसआयटीकडे तपास सोपवून तपासात अपयशी ठरल्याचीच कबुली दिली आहे. वास्तविक पानसरे आणि दाभोलकर यांच्या विचारांची भीती वाटणाऱ्या संघटनांनीच त्यांचा पध्दतशीरपणे खून केला आहे. शासनाने दोन्ही खुनांच्या घटना या दहशतवादी कृत्य असल्याचे मान्य करणे गरजेचे आहे.ते म्हणाले की, गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी काढून त्या उद्योगपतींच्या ताब्यात देण्याचा शासनाचा डाव आहे. शासन हे उद्योगपतींच्या लाभासाठी दलालाचे काम करीत आहे. भूमी अधिग्रहण कायदा करण्याचा अट्टाहास केंद्र शासन करीत आहे. त्याला सर्वच स्तरातून विरोध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाकपतर्फे दि. १४ मे रोजी देशपातळीवर रास्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)धार्मिक उन्मादासाठी गोहत्याबंदी समाजातील धार्मिक उन्माद वाढविण्यासाठीच शासनाने गोहत्या बंदी कायदा अंमलात आणला आहे. भाकड गाई सांभाळणे हे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने उन्हाळ्यात भाकड गाई भाजप कार्यालयासमोर बांधून त्यांचा सांभाळ कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन लवकरच करण्यात येणार असल्याचे डॉ. कांगो यांनी सांगितले.