शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

पानसरेंवरील हल्ला दहशतवादी कृत्य घोषित करा

By admin | Updated: May 1, 2015 00:16 IST

भालचंद्र कांगो : भूसंपादन कायद्याविरोधात १४ मे रोजी आंदोलन

सांगली : सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला शासनाने दहशतवादी कृत्य म्हणून घोषित करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केली. शासनाच्या भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करण्याकरिता दि. १४ मे रोजी देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉ. कांगो म्हणाले की, पानसरे यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने दीडशे टीम तयार केल्या आहेत, परंतु तरीही मारेकऱ्यांना अटक करण्यात यश आलेले नाही. आता त्यांनी एसआयटीकडे तपास सोपवून तपासात अपयशी ठरल्याचीच कबुली दिली आहे. वास्तविक पानसरे आणि दाभोलकर यांच्या विचारांची भीती वाटणाऱ्या संघटनांनीच त्यांचा पध्दतशीरपणे खून केला आहे. शासनाने दोन्ही खुनांच्या घटना या दहशतवादी कृत्य असल्याचे मान्य करणे गरजेचे आहे.ते म्हणाले की, गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी काढून त्या उद्योगपतींच्या ताब्यात देण्याचा शासनाचा डाव आहे. शासन हे उद्योगपतींच्या लाभासाठी दलालाचे काम करीत आहे. भूमी अधिग्रहण कायदा करण्याचा अट्टाहास केंद्र शासन करीत आहे. त्याला सर्वच स्तरातून विरोध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाकपतर्फे दि. १४ मे रोजी देशपातळीवर रास्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)धार्मिक उन्मादासाठी गोहत्याबंदी समाजातील धार्मिक उन्माद वाढविण्यासाठीच शासनाने गोहत्या बंदी कायदा अंमलात आणला आहे. भाकड गाई सांभाळणे हे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने उन्हाळ्यात भाकड गाई भाजप कार्यालयासमोर बांधून त्यांचा सांभाळ कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन लवकरच करण्यात येणार असल्याचे डॉ. कांगो यांनी सांगितले.