शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सांगली : मंत्राने पाणी गोड करणाऱ्या गुजरातच्या डॉक्टरांना अंनिसचे आव्हान

By संतोष भिसे | Updated: April 14, 2023 18:14 IST

मंत्रांच्या प्रभावाने पाणी गोड करण्याचा दावा करणाऱ्या डॉ. अमरेश मेहता यांना अंनिसने आव्हान दिले आहे.

सांगली : मंत्रांच्या प्रभावाने पाणी गोड करण्याचा दावा करणाऱ्या डॉ. अमरेश मेहता यांना अंनिसने आव्हान दिले आहे. अशा आधुनिक मांत्रिकांचा शासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

गुजरातमधील डॉ. मेहता रविवारी (दि. १६) इनाम धामणी (ता. मिरज) येथे मंत्रांच्या सामर्थ्याने विविध प्रयोग दाखवणार आहेत. पॉवर ऑफ मंत्रा असे कार्यक्रमाचे नाव आहे. मंत्राद्वारे साधे पाणी गोड करणे, दूर अंतरावरी पापड मोडणे असे प्रयोग करणार आहेत. मंत्रांच्या शक्तीने अनेक आजारही बरे होतात असा त्यांचा दावा आहे.त्यांना अंनिसने आक्षेप घेतला आहे. हे दावे अवैज्ञानिक दावे असून मंत्र-तंत्र विद्या ही अवैज्ञानिक संकल्पना आहे असे अंनिसने स्पष्ट केले. डाॅ. प्रदीप पाटील म्हणाले की, मंत्रांत कोणतेही सामर्थ्य नसते. डॉ. मेहता यांनी मंत्रांचे सामर्थ्य सिद्ध करावे. मानवी देहाभोवती आभामंडळ असते हा दावाही सिद्ध करुन दाखवावा. मंत्रसामर्थ्याने अपत्यप्राप्ती होते हेदेखील सिद्ध करावे. मंत्रांच्या सामर्थ्यावर खुली चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात आम्हाला संधी द्यावी.

राहुल थोरात  म्हणाले, कोणत्याही धर्माला आमचा विरोध नसून धर्माच्या नावाने अवैज्ञानिकता पसरविणास विरोध आहे. डाॅ. संजय निटवे म्हणाले, शरीरात सात चक्रे असतात याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.ॲड. धनंजय मद्वान्ना, ॲड. अजित सूर्यवंशी म्हणाले, अशा आधुनिक मांत्रिकांवर शासनाने कठोर कारवाई करावी. रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवावा.

यावेळी बाळासाहेब पाटील, जगदीश काबरे, ज्योती आदाटे, त्रिशला शहा, आशा धनाले, तेजस्विनी सूर्यवंशी, प्रियांका तुपलोंढे, फारुख गवंडी आदी उपस्थित होते.

टक्केवारी वाढते, आवडती व्यक्ती जवळ येते

डॉ. मेहता यांनी चित्रफितींद्वारे मंत्रसामर्थ्याचे अनेक दावे केले आहेत. प्रजनन समस्या, नि:संतानता, त्वचारोग, गर्भरक्षा, काळी जादू व नजर लागणे आदी कारणांसाठी मंत्रांची ताकद वापरता येते असा त्यांचा दावा आहे. आवडत्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीचा मंत्रही त्यांच्याकडे आहे. मंत्र म्हंटल्याने परीक्षेची टक्केवारी वाढते, ५० टक्के गुण मिळविणारे ९० टक्क्यांपर्यंत जातात, स्मरणशक्ती वाढते, मतिमंदांची बुद्धी ८० टक्के सुधारते, उच्च रक्तदाब नियंत्रित होतो, थायरॉईड ठिक होतो असेही अनेक दावे त्यांनी केले आहेत.