शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : मंत्राने पाणी गोड करणाऱ्या गुजरातच्या डॉक्टरांना अंनिसचे आव्हान

By संतोष भिसे | Updated: April 14, 2023 18:14 IST

मंत्रांच्या प्रभावाने पाणी गोड करण्याचा दावा करणाऱ्या डॉ. अमरेश मेहता यांना अंनिसने आव्हान दिले आहे.

सांगली : मंत्रांच्या प्रभावाने पाणी गोड करण्याचा दावा करणाऱ्या डॉ. अमरेश मेहता यांना अंनिसने आव्हान दिले आहे. अशा आधुनिक मांत्रिकांचा शासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

गुजरातमधील डॉ. मेहता रविवारी (दि. १६) इनाम धामणी (ता. मिरज) येथे मंत्रांच्या सामर्थ्याने विविध प्रयोग दाखवणार आहेत. पॉवर ऑफ मंत्रा असे कार्यक्रमाचे नाव आहे. मंत्राद्वारे साधे पाणी गोड करणे, दूर अंतरावरी पापड मोडणे असे प्रयोग करणार आहेत. मंत्रांच्या शक्तीने अनेक आजारही बरे होतात असा त्यांचा दावा आहे.त्यांना अंनिसने आक्षेप घेतला आहे. हे दावे अवैज्ञानिक दावे असून मंत्र-तंत्र विद्या ही अवैज्ञानिक संकल्पना आहे असे अंनिसने स्पष्ट केले. डाॅ. प्रदीप पाटील म्हणाले की, मंत्रांत कोणतेही सामर्थ्य नसते. डॉ. मेहता यांनी मंत्रांचे सामर्थ्य सिद्ध करावे. मानवी देहाभोवती आभामंडळ असते हा दावाही सिद्ध करुन दाखवावा. मंत्रसामर्थ्याने अपत्यप्राप्ती होते हेदेखील सिद्ध करावे. मंत्रांच्या सामर्थ्यावर खुली चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात आम्हाला संधी द्यावी.

राहुल थोरात  म्हणाले, कोणत्याही धर्माला आमचा विरोध नसून धर्माच्या नावाने अवैज्ञानिकता पसरविणास विरोध आहे. डाॅ. संजय निटवे म्हणाले, शरीरात सात चक्रे असतात याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.ॲड. धनंजय मद्वान्ना, ॲड. अजित सूर्यवंशी म्हणाले, अशा आधुनिक मांत्रिकांवर शासनाने कठोर कारवाई करावी. रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवावा.

यावेळी बाळासाहेब पाटील, जगदीश काबरे, ज्योती आदाटे, त्रिशला शहा, आशा धनाले, तेजस्विनी सूर्यवंशी, प्रियांका तुपलोंढे, फारुख गवंडी आदी उपस्थित होते.

टक्केवारी वाढते, आवडती व्यक्ती जवळ येते

डॉ. मेहता यांनी चित्रफितींद्वारे मंत्रसामर्थ्याचे अनेक दावे केले आहेत. प्रजनन समस्या, नि:संतानता, त्वचारोग, गर्भरक्षा, काळी जादू व नजर लागणे आदी कारणांसाठी मंत्रांची ताकद वापरता येते असा त्यांचा दावा आहे. आवडत्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीचा मंत्रही त्यांच्याकडे आहे. मंत्र म्हंटल्याने परीक्षेची टक्केवारी वाढते, ५० टक्के गुण मिळविणारे ९० टक्क्यांपर्यंत जातात, स्मरणशक्ती वाढते, मतिमंदांची बुद्धी ८० टक्के सुधारते, उच्च रक्तदाब नियंत्रित होतो, थायरॉईड ठिक होतो असेही अनेक दावे त्यांनी केले आहेत.