शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी सर्व क्षेत्रांतील अंधश्रद्धाना भिडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

इस्लामपूर : ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रांतील अंधश्रद्धांना भिडले पाहिजे. अंधश्रद्धा या ऐतखाऊ लोकांचे अर्थशास्त्र आहे. ...

इस्लामपूर : ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रांतील अंधश्रद्धांना भिडले पाहिजे. अंधश्रद्धा या ऐतखाऊ लोकांचे अर्थशास्त्र आहे. अंधश्रद्धांनी जागतिक पातळीवरही मानवी बुद्धीवर आक्रमण केलेले आहे. अंधश्रद्धा या बुद्धीचुकार लोकांचे विश्रामगृह आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' या ई मासिकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते.

डॉ. मनोहर म्हणाले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्धाराने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ ही सामाजिक परिवर्तनासाठी, विवेक विचार रुजविण्यासाठी उपयुक्त ठरेल. भयमुक्त समाज करण्याचे काम ही पत्रिका करेल. ही पत्रिका चालवताना अनेक अडचणी येतील मात्र या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य लोकच तुम्हाला देतील.

अविनाश पाटील म्हणाले, विवेकी विचाराचा खुला संवाद या पत्रिकेच्या माध्यमातून घडेल. जनजागृतीसाठी हे मासिक निश्चितच पथदर्शी काम करेल.

डॉ. दीपक बाविस्कर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उत्तम जोगदंड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मासिकाचे संपादक डॉ. नितीन शिंदे यांनी संपादकीय भूमिका मांडली. डॉ. मांतेश हिरेमठ यांनी सूत्रसंचलन केले. राजेंद्र फेगडे यांनी आभार मानले.

यावेळी राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर, प्रा. शामराव पाटील, प्रधान सचिव संजय बनसोडे, माधव बावगे, सुशीला मुंडे, नंदकिशोर तळाशीकर, गजेंद्र सरकार, ठकसेन गोराणे, अवधूत कांबळे उपस्थित होते.

चौकट

श्रद्धा - अंधश्रद्धेत फरक नाही..!

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काहीही फरक करता येत नाही. तर्काला मूठमाती दिल्यावर श्रद्धा जन्माला येते आणि तर्काची हत्या केल्यावर अंधश्रद्धा जन्माला येते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा तर्क, विज्ञान, बुद्धीप्रामाण्याला मानत नाहीत. त्यामुळे हे दोन्हीही एकच आहेत, असे मत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.