शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

चाऱ्यासाठी पशुधनाचा हंबरडा..!

By admin | Updated: April 27, 2016 00:44 IST

टंचाईची तीव्रता वाढली : लाल फितीत अडकला छावण्यांचा प्रस्ताव

सांगली : जिल्ह्यातील ७३४ गावांपैकी १३१ गावे आणि ९४९ वाड्या-वस्त्यांवरील ३ लाख १३ हजार २१२ नागरिक दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. लाखो पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असून, चाऱ्यासाठी उजाड माळरानावर पशुधन हंबरडा फोडत असूनही, त्यांची हाक शासन आणि राज्य सरकारपर्यंत अद्यापही पोहोचलेली नाही. प्रशासकीय लाल फितीत चारा छावण्यांचे प्रस्ताव अकडल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मुक्या जनावरांना जगवण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. सध्या विहिरी, तलाव आणि कूपनलिका कोरड्या पडल्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेषत: जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज पूर्व तालुक्यातील पशुधनासाठी शेतकऱ्यांकडे चाराच उपलब्ध नाही. शेतकरी उघड्या माळावर पशुधन सोडून देत आहेत. पशुधन चाऱ्याचा शोध घेत हंबरडा फोडत आहेत. पण, या मुक्या पशुधनाचा हंबरडा राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनापर्यंत अजूनही पोहोचलेला नाही. म्हणूनच शासनाने पशुधनाच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरू कराव्यात अथवा थेट चाऱ्याचे वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. जत तालुक्यातील पाच गावांसाठी तीन ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी झाली आहे. याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल असूनही त्याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय अद्याप झाला नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. येत्या दोन दिवसात छावण्यांबाबत निर्णय होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. चारा छावणी सम्राटांना पोसण्यापेक्षा चारा डेपो करून शेतकऱ्यांना थेट चारा देण्याचीही मागणी होत आहे. यापैकी कोणताही निर्णय घ्या आणि पशुधनासाठी चारा त्वरित देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. प्रशासनाने पशुधनासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था केली नाही, तर उपाशीपोटी पशुधनाचा बळी जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मोठ्या पशुधनाबरोबर शेळ्या, मेंढ्यांच्या चाऱ्याचाही प्रश्न सोडवावा, अशी शेतकरी मागणी करीत आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी, पशुधनाच्या चाऱ्याची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)जतमधील तीन प्रस्तावांना मंजुरी मिळणारजिल्ह्यातील जत तालुक्यातील पाच गावांनी तीन ठिकाणी चारा छावण्या सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार होती. परंतु, या बैठकीत काय निर्णय झाला, याची आमदार आणि जिल्हा प्रशासनाला कोणतीच कल्पना नाही. येत्या दोन दिवसात शासनाकडून रितसर आदेश आल्यानंतरच चारा छावण्या सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यात चारा छावण्या त्वरित सुरु होतील, अशी फारशी अपेक्षा दिसत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.सव्वातीन लाख जनतेला टँकरने पाणीजिल्ह्यातील १२२ गावे आणि ९४६ वाड्या-वस्त्यांवरील तीन लाख १३ हजार २१२ नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून येथील जनतेला १२८ खासगी आणि सात शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. येथील नागरिकांना टँकरनेही वेळेवर आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या जत, तासगाव तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.