शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

अनिलभाऊ आमचं काय चुकलं?

By admin | Updated: July 20, 2014 23:42 IST

अमरसिंह देशमुख : महिन्याभरात आम्ही शत्रू कसे झालो?

आटपाडी : माजी आमदार अनिल बाबर यांना विधानसभेसाठी आम्ही तीनवेळा जिवाचे रान करुन मदत केली. दोनवेळा ते आमदार झाले. ज्यावेळी आम्ही त्यांना मदत केली, तेव्हा गोड वाटले आणि महिन्याभरात अचानक मी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना शत्रू कसा वाटू लागलो? अनिलभाऊंनी वेगळ्या वाटेचा विचार करताना, आमचं काय चुकलं हे एकदा जाहीर करावं, असे आवाहन जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.देशमुख म्हणाले की, अनिलभाऊंच्या विजयासाठी आम्ही अनेकदा प्रामाणिकपणे त्यांना मदत केली आहे. माध्यमांमध्ये त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा आहे. राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घ्यायचा असेल, तर त्यापूर्वी सर्व कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी आम्हालाही बोलावून घ्यायला हवे होते. या चर्चेपूर्वी त्यांनी आमचा विचार केला नाही. तीनवेळा मदत करुनही आमच्यावर त्यांची किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी कशासाठी? आम्ही कुठे कमी पडलो असेन, तर त्यांनी आमच्या पदरात आमचे माप टाकावे, अन्यथा भगव्या वादळाच्या चर्चेला ठामपणे नकार देऊन या चर्चेला पूर्णविराम द्यावा. औरंगाबादच्या एकाच कंपनीकडून दोन नेत्यांनी सर्वेक्षण केले आहे. त्या कंपनीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्हीही नेत्यांना एकाला सर्वाधिक मते मिळतील, तर दुसऱ्या नेत्याला पहिल्या क्रमांकाची मते मिळतील, असा अजब निष्कर्ष काढला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ५० हजारांनी मताधिक्य मिळेल, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला होता. पण प्रत्यक्षात पराभव झाला. आताही सर्वेक्षणातून फसवणूक सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्ही निवडणूक लढविली तर बाबर यांचा पाठिंबा मिळण्यासाठी प्रयत्न करणार काय? असे विचारता ते म्हणाले की, ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेले तरी पाठिंबा मागणार नाही. मात्र राष्ट्रवादीत राहिले, तर त्यांचाच काय, मतदार संघातील सर्वत्र नेत्यांचा पाठिंबा मिळण्यासाठी प्रयत्न करेन, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)दोन महिन्यांपर्यंत मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सगळे नेते विशेषत: खानापूर तालुक्यातील सगळेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यंदाच्या निवडणुकीत विद्यमान आमदारांचा (सदाशिवराव पाटील) काहीही करुन कार्यक्रम करायचाच, असे म्हणत होते. महिन्याभरापासून वेगळीच चर्चा सुरू झालीय. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना नेमका कुणाचा कार्यक्रम करायचा आहे? असा प्रश्न अमरसिंह देशमुख यांनी उपस्थित केला.