शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

अनिल बाबर यांच्या भूमिकेने तासगावच्या २१ गावांत त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:31 IST

दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : आमदार अनिल बाबर यांनी लोकसभा निवडणुकीला भाजपला सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट ...

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : आमदार अनिल बाबर यांनी लोकसभा निवडणुकीला भाजपला सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश असणाऱ्या तासगाव तालुक्यातील २१ गावांत राजकारणाचे मोठे त्रांगडे निर्माण झाले आहे. या गावांतील राष्टÑवादीच्या कारभाºयांचे आमदार बाबरांशी सख्य आहे. मात्र भाजपशी तितकेच वितुष्ट आहे. आमदार बाबरांच्या निर्णयाने राष्टÑवादीचे कारभारी कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.तासगाव तालुक्यातील विसापूर आणि मांजर्डे जिल्हा परिषद गटातील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. गतवेळच्या निवडणुकीचा अपवाद वगळता, या २१ गावांतील राष्टÑवादीचा किंबहुना आबाप्रेमींचा आमदार अनिल बाबर यांना भक्कम पाठिंबा राहिला आहे. गतवेळच्या निवडणुकीत राष्टÑवादीच्या काही कारभाºयांनी आर. आर. पाटील यांच्या आदेशानुसार राष्टÑवादीचे उमेदवार अमरसिंह देशमुख यांचे काम केले होते. मात्र त्यानंतर या सर्कलमधील राष्टÑवादीच्या सर्वच कारभाºयांनी आमदार बाबर यांच्याशी जुळवून घेतले. किंबहुना गेल्या चार वर्षात आमदार बाबर यांनीही पाठबळ देत कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली.आमदार बाबर यांची तासगाव तालुक्यातील २१ गावांशी सलगी असतानाच, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात भाजपकडून खासदार संजयकाका पाटील यांची लोकसभेसाठीची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे बाबरांच्या भूमिकेनुसार खासदार संजयकाकांनाच पाठिंबा दिला जाईल हे स्पष्ट आहे.नेमकी हीच भूमिका विसापूर सर्कलच्या राष्टÑवादीच्या कारभाºयांचे त्रांगडे करणारी ठरली आहे. तासगाव तालुक्यात आबा गट आणि काका गट यांचे परंपरागत विळ्या-भोपळ्याचे सख्य राहिले आहे. प्रत्येक निवडणुकीत दोन्ही गोटात टोकाचा संघर्ष आणि कुरघोडीचे राजकारण सुरुच असते. त्यामुळे आमदार बाबरांच्या भूमिकेने लोकसभेपुरती २१ गावांतील राष्टÑवादीची भूमिका काय राहणार, याची उत्सुकता आहे.मर्जी विधानसभेपुरतीच?आमदार अनिल बाबर यांच्यावर २१ गावांतील राष्टÑवादीच्या कारभाºयांची मर्जी आहे. मात्र ही मर्जी विधानसभा निवडणुकीपुरतीच असेल अशी चर्चा आहे. राष्टÑवादीकडून किंबहुना आमदार सुमनतार्इंकडून जो आदेश येईल, त्यानुसारच लोकसभा निवडणुकीची भूमिका अवलंबून असेल असे बोलले जात आहे. मात्र लोकसभेला आमदार बाबर आणि खासदार संजयकाकांची सलगी झाल्यास, पुढची वाटचाल कशी असेल, यावरच या २१ गावांची राजकीय दिशा ठरणार आहे.