शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

संतप्त शेतकऱ्यांनी सांगलीत बेदाणा सौदे बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : योग्य दर मिळत नाही, सौद्यात बेदाण्याची उधळण करून नुकसान केले जाते, व्यापारी आणि दलाल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : योग्य दर मिळत नाही, सौद्यात बेदाण्याची उधळण करून नुकसान केले जाते, व्यापारी आणि दलाल संगनमताने दर पाडतात, आदी आरोप करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी येथील मार्केट यार्डातील बेदाण्याचे सौदे बंद पाडले. योग्य दर मिळत नाही, तोपर्यंत सौदे बंद ठेवण्याची मागणीही केली.

सांगली मार्केट यार्डात बुधवारी बेदाणा सौदे सुरू होते. जतमधील शेतकऱ्याच्या मालाला किलोला ११० रुपयांचा दर मिळाला. दर्जेदार बेदाणा असतानाही कमी दर मिळत असून, किलोला किमान २०० रुपये दर मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्याने केली. त्यावर एवढा दर मिळत नाही, असे सांगून व्यापाऱ्यांनी सौद्यातून तो माल बाहेर काढला. त्यावर उमदी, बिळूर, जाडरबोबलाद, संख येथील शेतकऱ्यांनी आक्रमक होत सौदेच बंद पाडले. व्यापारी आणि दलाल संगनमताने दर पाडतात, सौद्यात तीन ते पाच किलो बेदाण्याची उधळण करून नुकसान केले जाते, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मणगोंडा रवी-पाटील, संजय तेली, नारायण मोहिते, संगू माळी, दशरथ चव्हाण, शैलेंद्र जगताप आदींनी आक्रमक पवित्रा घेत योग्य दर मिळेपर्यंत सौदे बंद ठेवण्याची भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे, नंदकुमार कोरे यांनी तेथे भेट देऊन चर्चा केली. दलाल, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करू नये, अशी सूचना प्राजक्ता कोरे यांनी केली. त्यानंतर बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, संचालक बाळासाहेब बंडगर, सचिव महेश चव्हाण यांनीही आंदोलकांशी चर्चा केली. व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक घेऊन मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

चौकट

बेदाण्याची उधळण केल्यास कारवाई : दिनकर पाटील

बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील म्हणाले की, बेदाण्याचा हमीभाव कायद्यात समावेश नाही. आधीच उधळणीत नुकसान होते, त्यात दोन टक्के कर शेतकऱ्यांकडूनच वसूल होत आहे. याबाबत व्यापाऱ्यांना कठोर सूचना दिल्या आहेत. यापुढे बेदाण्याची उधळण केल्यास कडक कारवाई करू.