शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST

इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) गावचे माजी सरपंच, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आणि प्रतीक उद्योग समूहाचे प्रमुख, उद्योगपती आनंदराव ...

इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) गावचे माजी सरपंच, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आणि प्रतीक उद्योग समूहाचे प्रमुख, उद्योगपती आनंदराव दत्तू पाटील (वय ५९) यांचे साेमवारी भरधाव मोटारीची धडक बसल्याने निधन झाले. ते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय होते. हा अपघात दुपारी १२.३० च्या सुमारास झाला. या घटनेने रेठरेधरण गाव शोकसागरात बुडाले होते.

याबाबत अरविंद भगवान कुऱ्हाडे (रा. इस्लामपूर) यांनी पोलिसात मोटार चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यावरून शामराव आनंदराव जगताप (रा. शास्त्रीनगर, इस्लामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीसांनी जगताप याला ताब्यात घेतले आहे.

येथील कोल्हापूर रस्त्यावर आनंदराव पाटील यांचा पेट्रोलपंप आहे. पंपासमोर त्यांचे निवासस्थान आहे. सकाळी ते पंपावर आले होते. तेथील कामकाज आटोपून दुपारी १२.३० च्या सुमारास ते चालत घराकडे निघाले होते. रस्ता ओलांडत असताना शामराव जगताप हा मोटार (क्र. एमएच १३ एझेड ११३५) चालवत वाघवाडीच्या दिशेने इस्लामपूरकडे भरधाव वेगात येत होता. त्याच्या मोटारीची धडक आनंदराव पाटील यांना बसली.

या धडकेत पाटील हे उडून डांबरी रस्त्यावर पडले. डोक्याला जबर मार बसून ते रक्तबंबाळ झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जगताप हा न थांबता सुसाट वेगाने वाघवाडीच्या दिशेने मोटारीसह पळून जात होता. त्यावेळी कुऱ्हाडे आणि वाहतूक पोलिसांनी थरारक पाठलाग करत त्याला वाघवाडी फाट्यावर ताब्यात घेतले.

आनंदराव पाटील हे गेल्या ३० वर्षांपासून सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय होते. उद्यमशील व्यक्तिमत्त्व आणि सर्वांना मदतीचा हात देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. सायंकाळी रेठरेधरण या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सदाभाऊ खोत, आमदार मानसिंगराव नाईक, युवा नेते प्रतीक पाटील यांच्यासह मान्यवर, नातेवाईक, ग्रामस्थ अंत्ययात्रेत सहभागी होते.

आनंदराव पाटील हे २००० पासून गेली २१ वर्षे राजारामबापू कारखान्याचे संचालक होते. त्यांनी रेठरेधरणचे सरपंचपदही भूषविले आहे. त्यांच्या पत्नी संध्याताई पाटील या वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते माजी सभापती जनार्दनकाका पाटील यांचे मेहुणे, उद्योजक दादासाहेब पाटील यांचे ज्येष्ठ बंधू, सरपंच लतिका पाटील यांचे दीर, महानंदचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांचे साडू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, दोन बहिणी, भावजय, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि.२८ जुलै २०२१ रोजी सकाळी रेठरेधरण येथे होणार आहे.

फोटो : २६ आनंदराव पाटील