शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

बाहेरून येणाऱ्या उद्योजकांमध्ये सांगलीबद्दल नकारात्मकताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:32 IST

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : औद्योगिक वसाहतींमधील घटलेले कारखाने, कामगारांची संख्या, नव्याने उद्योग निर्मितीचा अभाव, पायाभूत ...

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : औद्योगिक वसाहतींमधील घटलेले कारखाने, कामगारांची संख्या, नव्याने उद्योग निर्मितीचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने बाहेरील उद्योजकांमध्ये सांगलीबद्दल असलेली नकारात्मकता अशा अनेक कारणांनी सांगलीतील औद्योगिक विकासासमोर मोठी लक्ष्मणरेषा तयार झाली आहे. त्यामुळे सांगलीतील युवा पिढी रोजगारासाठी पुणे, मुंबईत स्थिरावताना दिसत आहे.राजकीय उदासीनताही येथील औद्योगिक क्षेत्राच्या अधोगतीस तितकीच कारणीभूत आहे. केंद्र शासनाने कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात प्रयत्न चालू केले असले तरी, प्रशिक्षित मुलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, अशी बाजारपेठ विकसित झालेली नाही. सांगली जिल्ह्यातील १९६० पासूनची आकडेवारी पाहिली, तर कारखाने आणि त्यातील कामगारांची संख्या ही काही काळ वाढल्यानंतर गेल्या दहा वर्षांत त्यात घट झाल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात सध्या ९ औद्योगिक वसाहती, संस्था असून, २0११-१२ या आर्थिक वर्षात ८0 कोटींचे एकूण १ हजार १९२ प्रकल्प कार्यान्वित होते. गेल्या पंधरा वर्षांत सांगली जिल्ह्यात एकही नवा मोठा उद्योग आला नाही. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल, अशा पद्धतीचे उद्योग आणण्याचा प्रयत्नही झालेला नाही. सांगली जिल्ह्यातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारी हजारो मुले आज पुणे, मुंबई व अन्य राज्यातील मोठ्या शहरांकडे रोजगारासाठी धावत आहेत. सांगलीच्या औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पायाभूत सुविधा आजही मागासलेल्या आहेत. व्यापारी पेठांमधील परिस्थितीसुद्धा फार वेगळी नाही. त्यामुळे व्यापार, उद्योगाची प्रगती होण्याऐवजी अधोगती दिसत आहे. ही परिस्थिती कधी बदलणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.आतापर्यंत काय झाले उपाय?1सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या उद्योजकांनीच प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला.2महापालिकेच्या निर्मितीनंतर जकात अस्तित्वात असेपर्यंत येथील उद्योजकांना चालना देण्यासाठी ५0 टक्के करसवलत देण्यात आली.3सांगलीत नव्याने उद्योग यावेत, गुंतवणूक व्हावी म्हणून याठिकाणी प्रदर्शन व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जागा, कामगारांची उपलब्धता याबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न झाले.तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1कौशल्य विकास योजना राबविताना स्थानिक परिस्थिती व गरजांचा विचार होणे आवश्यक2राज्य महामार्गाला जोडणारे रस्ते, विमानसेवा यांचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मदत करायला हवी.3निर्यातक्षम कृषी मालासाठी आवश्यक सुविधा देताना या मालाच्या उपपदार्थ निर्मितीचे शिक्षण, उद्योगासाठी चालना, आर्थिक साहाय्य यांची उपलब्धता जिल्ह्यात होण्यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न आवश्यक.