शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

अंबकचे ‘जेसीबी मामा’ खुदाईकामात पारंगत

By admin | Updated: March 13, 2015 23:54 IST

काबाडकष्टातून कमाई : कुटुंबात समाधान; तासाभरात काढतात जलवाहिनीची गळती

प्रताप महाडिक - कडेगाव  जलवाहिनीची गळती काढण्याचे काम जेसीबी यंत्रापेक्षा कमी वेळात फत्ते करणारे अंबक येथील मलकाप्पा नाटेकर (वय ४५) हे ‘जेसीबी मामा’ म्हणून सोनहिरा खोऱ्यात परिचित आहेत. परिसरातील पाणीपुरवठा योजनेला किंवा शेतकऱ्यांच्या जलवाहिनीला गळती लागली की, ‘जेसीबी मामां’चा भ्रमणध्वनी वाजतो. ते तात्काळ सायकलवर खोरे, टिकाव, पाटी घेऊन संबंधित ठिकाणी पोहोचतात. एका तासात गळती काढून पुढील कामास रवाना होतात! खुदाई कामात पारंगत असलेल्या जेसीबी मामांनी दोन मुलांचे शिक्षण व मुलीचे लग्न करून पुणे आणि विजापूर येथे स्वत:चे घर बांधले आहे.मलकाप्पा नाटेकर यांचे मूळ गाव विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील गोडीआळ. मलकाप्पांच्या वडिलांनी दारूच्या व्यसनात सर्व शेतजमीन विकून टाकली. २० वर्षांपूर्वी मलकाप्पा मोलमजुरीसाठी अंबक येथे आले. त्यानंतर काही काळ पुण्यात मोलमजुरीचे, खुदाईचे काम केले. सोनहिरा कारखान्याच्या पायाभरणीवेळी सातत्याने पाच वर्षे खुदाईचे काम केले. प्रामाणिकपणे आणि जलद काम केल्यामुळे कष्टाचा योग्य मोबदलाही मिळत गेला. पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब पुण्यात ठेवले आणि एकटे मलकाप्पा काबाडकष्ट करीत राहिले. जलवाहिनीची गळती काढणे हे काम त्यांचा हातखंडा ठरू लागले. दिवसातून पाच ते आठ ठिकाणी ते गळती काढतात. आजच्या दराने दररोज दोन ते तीन हजार रुपये मिळतात. जेथे गळती काढली, तेथे पुन्हा गळती लागली, तर मलकाप्पा ती मोफत काढून देतात. एका मजुराकडून कामाची ‘गॅरंटी’ मिळते, याचे शेतकऱ्यांना कुतूहल वाटते.वीस ते पंचवीस वर्षांपासून सातत्याने खुदाई काम करणारे सहा फूट उंचीचे मलक्काप्पा टिकावाने १० ते १५ मिनिटात गळती शोधतात. गळती लागलेल्या ठिकाणचा भाग कापून त्या ठिकाणी नवीन जलवाहिनीचा जोड ठेवून, रस्ता पुन्हा बुजवून एका तासात काम फत्ते करतात. हे काम जेसीबी यंत्राच्या साहाय्यानेही इतके जलद होत नाही, म्हणूनच ते ‘जेसीबी मामा’ म्हणून परिचित झाले आहेत.सोनहिरा खोऱ्यातील १५ गावांमधून जेसीबी मामांना जलवाहिनीची गळती काढण्यासाठी बोलावणे येते. सायकलस्वारी करीत ते कामाच्या ठिकाणी पोहोचतात. सायकलच्या ‘डिकी’वरही ‘जेसीबी मामा’ असा फलक त्यांनी लावला आहे. पुढे यल्लम्मादेवीचे छायाचित्र आहे. अमावास्येच्या दिवशी जेसीबी मामांचे काम बंद असते. त्यावेळी ते देवदर्शनाला जातात. खुदाई-गळतीचे काम करताना ते मोबाईलवर देवाची गाणी लावतात. बॅटरी डिसचार्ज झाली की तात्काळ दुसरी बॅटरी टाकतात, परंतु मोबाईल सदैव सुरू असतो. ‘प्रामाणिक माणसाला मोबाईल बंद ठेवायची गरज नसते. ज्यांना आपली गरज आहे, ते बोलावून घेतात,’ हा त्यांचा आत्मविश्वास खूप काही सांगून जातो.मामांचे अन्नदान जेसीबी मामा दरवर्षी कष्टातून मिळालेल्या कमाईतून अन्नदान करतात. कमाईतील काही हिस्सा दान करावा, यामुळे मानसिक समाधान मिळते. अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, म्हणून मी दरवर्षी अन्नदान करतो, असे ते सांगतात.