शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राष्ट्रवादीकडून यंदा अमरसिंह देशमुख रिंगणात

By admin | Updated: June 21, 2014 00:21 IST

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघ : शरद पवारांनी बोलावणे धाडले

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा उमेदवार ठरविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असताना, माजी आमदार अनिल बाबर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना आज (शुक्रवारी) बोलावणे धाडले आहे. विश्वसनीय माहितीनुसार, यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्यावतीने अमरसिंह देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मतदारसंघ काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे आला आहे. खानापूर आणि आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असताना, विधानसभा निवडणुकीत सलग दोनवेळा विजयाच्या गुलालापासून राष्ट्रवादी वंचित राहिली. याचे शल्य गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यापासून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केले आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सगळे नेते एकत्रित येऊनही निसटता पराभव झाला. आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाल्याने, ही मंडळी ताकसुध्दा फुंकून पिण्याची काळजी घेताना दिसत आहेत. या मतदारसंघातील राष्ट्रवादीपुरता विचार केला, तर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना, राष्ट्रवादीने येथे अपक्ष म्हणून का असेना, उमेदवार उभा केलेलाच आहे. राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या कमी नाही, पण आजपर्यंत आटपाडीतून राजेंद्रअण्णा देशमुख आणि खानापुरातून अनिल बाबर हेच नेते विधानसभेचे प्रमुख दावेदार राहिले आहेत. देशमुखांनी बाबर यांना दोनवेळा पाठिंबा दिला आहे, मात्र बाबर यांनी आजपर्यंत एकाही विधानसभा निवडणुकीत देशमुख यांना पाठिंबा दिलेला नाही. अशा परिस्थितीत मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत, एकदिलाने काम केले आणि नवीन चेहरा दिला, तर नक्की जिंकू, अशी मते दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी मांडल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे माजी आमदार अनिल बाबर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. बाबर यांनी ही बाब नाकारली असली तरी, चर्चेला उधाण आले आहे. तसे झाले तर राष्ट्रवादीकडे राजेंद्रअण्णा देशमुख किंवा अमरसिंह देशमुख यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय सध्यातरी उपलब्ध नाही. आज (शुक्रवारी) सकाळी अकराच्या सुमारास पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना, अमरसिंह देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून थेट शरद पवार यांनी संपर्क साधला. विशेष म्हणजे देशमुख यांचा मोबाईल ‘सायलेंट मोड’वर असल्याने बराचवेळ त्यांना मुंबईतून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दस्तुरखद्द शरद पवार संपर्क साधत असल्याचे लवकर कळले नाही. नंतर राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयातून सांगली जिल्हा परिषदेत संपर्क साधून देशमुख यांना तात्काळ मुंबईशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. देशमुख यांनीही तातडीने संपर्क साधला. वास्तविक देशमुख यांनी सोमवारी शेतकऱ्यांसोबत आदर्श शेती पाहण्याचे नियोजन केले होते. मात्र मुंबईचा दूरध्वनी ठेवताच त्यांनी गंभीर होत सोमवारचा येथील कार्यक्रम रद्द केला.