शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून यंदा अमरसिंह देशमुख रिंगणात

By admin | Updated: June 21, 2014 00:21 IST

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघ : शरद पवारांनी बोलावणे धाडले

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा उमेदवार ठरविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असताना, माजी आमदार अनिल बाबर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना आज (शुक्रवारी) बोलावणे धाडले आहे. विश्वसनीय माहितीनुसार, यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्यावतीने अमरसिंह देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मतदारसंघ काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे आला आहे. खानापूर आणि आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असताना, विधानसभा निवडणुकीत सलग दोनवेळा विजयाच्या गुलालापासून राष्ट्रवादी वंचित राहिली. याचे शल्य गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यापासून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केले आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सगळे नेते एकत्रित येऊनही निसटता पराभव झाला. आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाल्याने, ही मंडळी ताकसुध्दा फुंकून पिण्याची काळजी घेताना दिसत आहेत. या मतदारसंघातील राष्ट्रवादीपुरता विचार केला, तर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना, राष्ट्रवादीने येथे अपक्ष म्हणून का असेना, उमेदवार उभा केलेलाच आहे. राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या कमी नाही, पण आजपर्यंत आटपाडीतून राजेंद्रअण्णा देशमुख आणि खानापुरातून अनिल बाबर हेच नेते विधानसभेचे प्रमुख दावेदार राहिले आहेत. देशमुखांनी बाबर यांना दोनवेळा पाठिंबा दिला आहे, मात्र बाबर यांनी आजपर्यंत एकाही विधानसभा निवडणुकीत देशमुख यांना पाठिंबा दिलेला नाही. अशा परिस्थितीत मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत, एकदिलाने काम केले आणि नवीन चेहरा दिला, तर नक्की जिंकू, अशी मते दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी मांडल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे माजी आमदार अनिल बाबर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. बाबर यांनी ही बाब नाकारली असली तरी, चर्चेला उधाण आले आहे. तसे झाले तर राष्ट्रवादीकडे राजेंद्रअण्णा देशमुख किंवा अमरसिंह देशमुख यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय सध्यातरी उपलब्ध नाही. आज (शुक्रवारी) सकाळी अकराच्या सुमारास पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना, अमरसिंह देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून थेट शरद पवार यांनी संपर्क साधला. विशेष म्हणजे देशमुख यांचा मोबाईल ‘सायलेंट मोड’वर असल्याने बराचवेळ त्यांना मुंबईतून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा दस्तुरखद्द शरद पवार संपर्क साधत असल्याचे लवकर कळले नाही. नंतर राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयातून सांगली जिल्हा परिषदेत संपर्क साधून देशमुख यांना तात्काळ मुंबईशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. देशमुख यांनीही तातडीने संपर्क साधला. वास्तविक देशमुख यांनी सोमवारी शेतकऱ्यांसोबत आदर्श शेती पाहण्याचे नियोजन केले होते. मात्र मुंबईचा दूरध्वनी ठेवताच त्यांनी गंभीर होत सोमवारचा येथील कार्यक्रम रद्द केला.