शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

‘आयर्विन’चा पर्यायी पूल लिंगायत स्मशानभूमीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:23 IST

सांगली : आयर्विन पुलाला पर्याय म्हणून नवा पूल उभारण्याबाबत अनेक वाद झाल्यानंतर आता महापालिकेने विकास आराखड्यात तरतूद केलेल्या पुलासाठी ...

सांगली : आयर्विन पुलाला पर्याय म्हणून नवा पूल उभारण्याबाबत अनेक वाद झाल्यानंतर आता महापालिकेने विकास आराखड्यात तरतूद केलेल्या पुलासाठी भूसंपादन व आनुषंगिक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. लिंगायत स्मशानभूमीपासून सांगलीवाडीपर्यंत या पुलाचा मार्ग आहे.

आयर्विन पुलावरील अवजड वाहतूक बंद केली आहे. या पुलाची वयोमर्यादा पाहून त्यास बायपास पूल यापूर्वीच उभारला गेला आहे. मात्र, तो शहराबाहेरून असल्याने अनेकांकडून तो शहरातून व्हावा, अशी मागणी केली गेली. शहराला वळसा घालून वाहनांना जावे लागत असल्याने तो फारसा उपयोगी पडत नसल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे आ. सुधीर गाडगीळ यांनी आयर्विन पुलाजवळच पांजरपोळ येथून सांगलीवाडीच्या क्रीडांगणातून नव्या पुलाचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेतला होता. शहरातील व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून त्याविषयी वादविवाद सुरू आहे.

अखेर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेच्या विकास आराखड्यातील प्रस्तावित पुलासाठी अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले. विकास आराखड्यातील तरतुदीनुसार सांगलीवाडीतून हा रस्ता नदीतील बंधाऱ्यापलीकडून हरिपूर रोडवरील लिंगायत स्मशानभूमीजवळून शंभरफुटी रस्त्याला जाऊन मिळणार आहे. त्यामुळे या पुलासाठी व रस्त्यासाठी बाधित होणाऱ्या मालमत्तांची तपासणी, आवश्यकतेनुसार भूसंपादन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांचे पथक नियुक्त केले आहे. त्यात नगररचनाकार शिवप्रसाद धुपकर, सहायक नगररचनाकार प्रतीक डोळे, कनिष्ठ अभियंता कलीम धावडे, शाहबाज शेख यांचा समावेश आहे. या पथकास कार्यवाही करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चौकट

राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट

पेठ, सांगली, मिरज, म्हैसाळ हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये येतो. याच मार्गात हा पूल समाविष्ट आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने २० ऑक्टोबर रोजी महापालिकेला त्यांच्या हद्दीतील या कामाबाबतचे पत्र दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही सुरू आहे.

कोट

सांगलीतील व्यापाऱ्यांच्या मागणीची दखल घेत आयर्विनलगत होणारा पूल रद्द करून विकास आराखड्यानुसार तो होत आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. व्यापारी पेठा यामुळे सुरक्षित राहतील. नव्या पुलामुळे व महामार्गामुळे बाजारपेठा व शहराचा विकास होईल.

-शेखर माने, नेते, शिवसेना