शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अलमट्टी ७४ टक्केच भरलेय, तरीही सांगली, शिरोळमध्ये पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पूरस्थिती ओढवली आहे. विशेषत: धरणक्षेत्रातील संततधारेने नद्यांनी पात्र सोडले आहे. ...

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पूरस्थिती ओढवली आहे. विशेषत: धरणक्षेत्रातील संततधारेने नद्यांनी पात्र सोडले आहे. विशेष म्हणजे या स्थितीत कर्नाटकातील अलमट्टी धरण अद्याप ७४ टक्केच भरले आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरासाठी अलमट्टी धरणावर खापर फोडले जात असल्याच्या स्थितीत ही स्थिती लक्षात घेण्यासारखी आहे. महापुराचा अभ्यास करणाऱ्या वडनेरे समितीने अलमट्टीचा मुद्दा खोडून काढला आहे, शिवाय कर्नाटक सरकारनेही तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे मान्य केलेला नाही. गेल्या चार दिवसांपासून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पुराचे थैमान सुरू असताना अलमट्टी धरण मात्र अजूनही भरलेले नाही याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. राजापूूर बंधाऱ्याची धोकापातळी ५८ फूट आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता ती ४१.३ फूट होती, त्यावेळीही कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू होते. अर्थात, राजापुरातील पाणीस्थिती पूर्णत: नियंत्रणात असतानाही कोल्हापूरला पुराचा तडाखा बसला होता, त्यामुळे स्थानिक स्तरावरील धुवाधार पावसामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्हे पुराने वेढले जातात हे स्पष्ट झाल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. शुक्रवारी सांगली, कोल्हापूर शहरांत पूरस्थिती असताना राजापूर व अलमट्टीची पाणीपातळी पूर्णत: नियंत्रणात होती याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राच्या जलसंपदाचे पथक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटले, तेव्हादेखील अलमट्टीचा दावा तांत्रिक मुद्द्यांसह फेटाळण्यात आला होता.

दक्षिण महाराष्ट्रातील सध्याचा पाऊस विक्रमी आहे. चांदोली धरणात २४ तासांत ५०२ मिलीमीटर पाऊस झाला. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात नवजा येथे २४ तासांत ७३१ मिमी पाऊस झाला, त्यामुळे कोयनेचा पाणीसाठा शुक्रवारी पहाटे तीनपर्यंतच्या २४ तासांत १२ टीएमसीने वाढला. हा विक्रमी पाऊस धरणात साठवता येत नाही, तो थेट सांगलीला पुराच्या रूपाने कवेत घेतो.

चौकट

शिरोळला धोका, पण अतिवृष्टीमुळेच

सांगली जिल्ह्यात सांगली शहर वगळता पुढे कोठेही कृष्णेने पात्र सोडलेले नाही. अलमट्टीचा फुगवटा सांगलीपर्यंत पोहोचत असता तर राजापूरपासून म्हैसाळपर्यंतच्या अनेक गावांत आतापर्यंत पाणी शिरले असते. पात्र दुथडी भरले असले तरी तेथे पूरस्थिती नाही. सांगलीतील पूरस्थितीला कोयना व चांदोेलीतील विक्रमी पाऊसच कारणीभूत ठरला आहे. शिरोळमध्येही २०१९ पेक्षा गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता तहसीलदारांनी व्यक्त केली आहे. अलमट्टी भरलेले नसतानाही शिरोळ पुरात जातेय, याचे कारण अतिवृष्टीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.