शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी ७४ टक्केच भरलेय, तरीही सांगली, शिरोळमध्ये पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पूरस्थिती ओढवली आहे. विशेषत: धरणक्षेत्रातील संततधारेने नद्यांनी पात्र सोडले आहे. ...

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पूरस्थिती ओढवली आहे. विशेषत: धरणक्षेत्रातील संततधारेने नद्यांनी पात्र सोडले आहे. विशेष म्हणजे या स्थितीत कर्नाटकातील अलमट्टी धरण अद्याप ७४ टक्केच भरले आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरासाठी अलमट्टी धरणावर खापर फोडले जात असल्याच्या स्थितीत ही स्थिती लक्षात घेण्यासारखी आहे. महापुराचा अभ्यास करणाऱ्या वडनेरे समितीने अलमट्टीचा मुद्दा खोडून काढला आहे, शिवाय कर्नाटक सरकारनेही तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे मान्य केलेला नाही. गेल्या चार दिवसांपासून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पुराचे थैमान सुरू असताना अलमट्टी धरण मात्र अजूनही भरलेले नाही याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. राजापूूर बंधाऱ्याची धोकापातळी ५८ फूट आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता ती ४१.३ फूट होती, त्यावेळीही कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू होते. अर्थात, राजापुरातील पाणीस्थिती पूर्णत: नियंत्रणात असतानाही कोल्हापूरला पुराचा तडाखा बसला होता, त्यामुळे स्थानिक स्तरावरील धुवाधार पावसामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्हे पुराने वेढले जातात हे स्पष्ट झाल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. शुक्रवारी सांगली, कोल्हापूर शहरांत पूरस्थिती असताना राजापूर व अलमट्टीची पाणीपातळी पूर्णत: नियंत्रणात होती याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राच्या जलसंपदाचे पथक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटले, तेव्हादेखील अलमट्टीचा दावा तांत्रिक मुद्द्यांसह फेटाळण्यात आला होता.

दक्षिण महाराष्ट्रातील सध्याचा पाऊस विक्रमी आहे. चांदोली धरणात २४ तासांत ५०२ मिलीमीटर पाऊस झाला. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात नवजा येथे २४ तासांत ७३१ मिमी पाऊस झाला, त्यामुळे कोयनेचा पाणीसाठा शुक्रवारी पहाटे तीनपर्यंतच्या २४ तासांत १२ टीएमसीने वाढला. हा विक्रमी पाऊस धरणात साठवता येत नाही, तो थेट सांगलीला पुराच्या रूपाने कवेत घेतो.

चौकट

शिरोळला धोका, पण अतिवृष्टीमुळेच

सांगली जिल्ह्यात सांगली शहर वगळता पुढे कोठेही कृष्णेने पात्र सोडलेले नाही. अलमट्टीचा फुगवटा सांगलीपर्यंत पोहोचत असता तर राजापूरपासून म्हैसाळपर्यंतच्या अनेक गावांत आतापर्यंत पाणी शिरले असते. पात्र दुथडी भरले असले तरी तेथे पूरस्थिती नाही. सांगलीतील पूरस्थितीला कोयना व चांदोेलीतील विक्रमी पाऊसच कारणीभूत ठरला आहे. शिरोळमध्येही २०१९ पेक्षा गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता तहसीलदारांनी व्यक्त केली आहे. अलमट्टी भरलेले नसतानाही शिरोळ पुरात जातेय, याचे कारण अतिवृष्टीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.