शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

अलमट्टी ७४ टक्केच भरलेय, तरीही सांगली, शिरोळमध्ये पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पूरस्थिती ओढवली आहे. विशेषत: धरणक्षेत्रातील संततधारेने नद्यांनी पात्र सोडले आहे. ...

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पूरस्थिती ओढवली आहे. विशेषत: धरणक्षेत्रातील संततधारेने नद्यांनी पात्र सोडले आहे. विशेष म्हणजे या स्थितीत कर्नाटकातील अलमट्टी धरण अद्याप ७४ टक्केच भरले आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरासाठी अलमट्टी धरणावर खापर फोडले जात असल्याच्या स्थितीत ही स्थिती लक्षात घेण्यासारखी आहे. महापुराचा अभ्यास करणाऱ्या वडनेरे समितीने अलमट्टीचा मुद्दा खोडून काढला आहे, शिवाय कर्नाटक सरकारनेही तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे मान्य केलेला नाही. गेल्या चार दिवसांपासून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पुराचे थैमान सुरू असताना अलमट्टी धरण मात्र अजूनही भरलेले नाही याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. राजापूूर बंधाऱ्याची धोकापातळी ५८ फूट आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता ती ४१.३ फूट होती, त्यावेळीही कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू होते. अर्थात, राजापुरातील पाणीस्थिती पूर्णत: नियंत्रणात असतानाही कोल्हापूरला पुराचा तडाखा बसला होता, त्यामुळे स्थानिक स्तरावरील धुवाधार पावसामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्हे पुराने वेढले जातात हे स्पष्ट झाल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. शुक्रवारी सांगली, कोल्हापूर शहरांत पूरस्थिती असताना राजापूर व अलमट्टीची पाणीपातळी पूर्णत: नियंत्रणात होती याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राच्या जलसंपदाचे पथक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटले, तेव्हादेखील अलमट्टीचा दावा तांत्रिक मुद्द्यांसह फेटाळण्यात आला होता.

दक्षिण महाराष्ट्रातील सध्याचा पाऊस विक्रमी आहे. चांदोली धरणात २४ तासांत ५०२ मिलीमीटर पाऊस झाला. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात नवजा येथे २४ तासांत ७३१ मिमी पाऊस झाला, त्यामुळे कोयनेचा पाणीसाठा शुक्रवारी पहाटे तीनपर्यंतच्या २४ तासांत १२ टीएमसीने वाढला. हा विक्रमी पाऊस धरणात साठवता येत नाही, तो थेट सांगलीला पुराच्या रूपाने कवेत घेतो.

चौकट

शिरोळला धोका, पण अतिवृष्टीमुळेच

सांगली जिल्ह्यात सांगली शहर वगळता पुढे कोठेही कृष्णेने पात्र सोडलेले नाही. अलमट्टीचा फुगवटा सांगलीपर्यंत पोहोचत असता तर राजापूरपासून म्हैसाळपर्यंतच्या अनेक गावांत आतापर्यंत पाणी शिरले असते. पात्र दुथडी भरले असले तरी तेथे पूरस्थिती नाही. सांगलीतील पूरस्थितीला कोयना व चांदोेलीतील विक्रमी पाऊसच कारणीभूत ठरला आहे. शिरोळमध्येही २०१९ पेक्षा गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता तहसीलदारांनी व्यक्त केली आहे. अलमट्टी भरलेले नसतानाही शिरोळ पुरात जातेय, याचे कारण अतिवृष्टीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.