शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती कार्यक्रमांसाठी परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:49 IST

संख : सरकारने यावर्षी गर्दीचे कारण देऊन ‘शिवजयंती’ कार्यक्रमाला घातलेली बंदी तत्काळ मागे घ्यावी व सरसकट परवानगी द्यावी, ...

संख : सरकारने यावर्षी गर्दीचे कारण देऊन ‘शिवजयंती’ कार्यक्रमाला घातलेली बंदी तत्काळ मागे घ्यावी व सरसकट परवानगी द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुंबईला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या स्वागतासाठी व मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागताला परळी येथे हजारोंच्या संख्येने लोक आले होते. मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर संवाद दौरा चालू आहे. पदवीधर व ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. भाजपचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह देशभर फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांना हे कसे चालते?

पोलीस त्यांना परवानगी देतात. मात्र, शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घातली जाते. शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, शाहिरी, पोवाडे, व्याख्यान, रक्तदान शिबिर कार्यक्रमातून समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित केली जाते. सरकारने बंदी तत्काळ मागे घेऊन शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सरसकट परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.