शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

ऐन दुष्काळात ‘पोखर्णी’करांना स्वखर्चाने पाण्याचे वाटप

By admin | Updated: April 8, 2016 00:02 IST

पाटील-पाटोळे यांचा उपक्रम : गावकऱ्यांची तहान भागविली

आष्टा : राज्यात सर्वत्र दुष्काळ आहे. सांगली जिल्ह्यातील काही भागाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पोखर्णी येथील महिला व ग्रामस्थांना गावविहिरीला पाणी कमी झाल्याने दुष्काळाचे चटके बसत असताना नागाव-पोखर्णीसह पाणी पुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार पाटील व संचालक दत्तात्रय दादू पाटोळे यांनी स्वखर्चाने गावकऱ्यांना पाणी देत आदर्श घालून दिला आहे.वाळवा तालुक्यातील पोखर्णी छोटेसे खेडेगाव. या गावाला मागील अनेक वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागत होती. गावातील शेतीला पाण्यासाठी दोन सहकारी व दोन खासगी पाणी संस्था आहेत. मात्र गावात पाणी नसल्याने गावाजवळूनच जाणाऱ्या नागाव-पोखर्णी पाणी पुरवठा संस्थेच्या पोखर्णी येथील सभासदांची बैठक झाली. या बैठकीत सामाजिक बांधिलकीतून गावाला पाणी देण्याचे ठरवण्यात आले. गाव विहिरीत पाणी सोडण्याऐवजी गावात विविध ठिकाणी पाईपलाईनद्वरे नळ काढून पाणी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्य पाईपलाईनपासून सुमारे २ हजार फूट पाईपलाईन करण्याचे ठरले. संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, दत्तात्रय पाटोळे यांनी स्वखर्चातून पाईपलाईन पूर्ण केली. अध्यक्ष धोंडीराम जासूद, कुमार पाटील, रघुनाथ जासुद, रघुनाथ मंडले, भानुदास पाटील, संभाजी पाटील, बाळासाहेब बादटे, नागनाथ जाधव, रमेश आवळे, अरविंद पाटील, पोपट पाटोळे, रघुनाथ सुतार, रघुनाथ जाधव, शामराव जाधव उपस्थित होते. पाणी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमाचे आ. जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे. (वार्ताहर)