शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आघाडीचा पराभव होईल: चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:04 IST

सांगली : बारामती, माढा, हातकणंगलेसह पश्चिम महाराष्टÑातील सर्व जागांवर युती विजयी होणार असून, आघाडीचा पराभव निश्चित आहे. महाराष्टÑात ४८ ...

सांगली : बारामती, माढा, हातकणंगलेसह पश्चिम महाराष्टÑातील सर्व जागांवर युती विजयी होणार असून, आघाडीचा पराभव निश्चित आहे. महाराष्टÑात ४८ पैकी ४५ जागा आम्हाला मिळतील, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपला शिष्य मोठा होत असल्याबद्दल शरद पवारांना दु:ख वाटत आहे, अशी टीकाही केली.चंद्रकांत पाटील म्हणाले , बरेच कायदे आम्हाला करायचे असल्यामुळे देशभरात दोन तृतीयांश जागा मिळविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला काही कायदे करताना अडचणी येत असल्याने उद्दिष्टपूर्ती झाल्यास बरेच कायदे आम्ही या देशात आणू शकतो. सध्या पन्नास टक्क्यांवर हे कायदे करता येत नाहीत. एका एजन्सीने युतीला ३७५ जागा मिळतील, असे सांगितले आहे. त्यामुळे आमचे ध्येय या माध्यमातून पूर्ण करू शकतो. बारामती, माढा, हातकणंगलेत आघाडीच्या उमेदवारांचा पराभव निश्चित आहे. ज्यांनी आपल्याला काहीतरी शिकविले त्यांना गुरूस्थानी मानावे, ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्याचदृष्टीने मोदींनी शरद पवारांना गुरू म्हटले होते. कोणत्याही गुरूला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झाल्याचा आनंद होत असतो, मात्र शरद पवारांना त्याचे दु:ख होत आहे. हे त्यांच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध आहे. मी त्यांना आदरस्थानी मानतो, पण ते असे का वागत आहेत, हे कळत नाही.सांगलीत लढत रंगतदार... मला येथे यावे लागले.चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सुरुवातीला इतकी एकतर्फी वाटत होती की, मला याठिकाणी यावे लागणार नाही, असे वाटत होते, मात्र फिल्मी स्टाईलने येथील लढत रंगतदार स्थितीत पोहोचली. लढतसुद्धा रंगतदार झाली पाहिजे. आता तशी दिसत आहे. त्यामुळे मला येथे यावे लागले.वसंतदादा गटाने अपक्ष लढायला हवे होते!वसंतदादांच्या वारसदारांनी दुसऱ्या पक्षामार्फत निवडणूक लढविणे हे लोकांना फारसे रूचलेले नाही. दादा गट म्हणून निवडणूक लढविताना पूर्वी एक शान होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली असती, तर कदाचित लोकांनी त्यांना सहानुभूती दाखविली असती, असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.देशाच्या सुरक्षिततेसाठी निवडणूक महत्त्वाचीदेशाची सुरक्षा कोणता पक्ष करणार, कोणामध्ये ती कुवत आहे, याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे. सुरक्षेच्या विषयावर भाजपनेच सर्वाधिक काम केले आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेसाठी जनता पुन्हा भाजपला साथ देईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चितसुप्रिया सुळे यांचा लोकसभा निवडणुकीतील पराभव निश्चित आहे. किती मताने त्यांचा पराभव होणार, हे येत्या पंधरा दिवसात स्पष्ट होईल. त्यामुळे शरद पवारांना त्यांच्या मुलीसाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे. उरलेल्या उमेदवारांना ते नंतर वेळ देतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.राज ठाकरे आघाडीला चांगले कसे म्हणत आहेत?राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल पाटील म्हणाले की, ते माझे चांगले मित्र आहेत. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट अशी त्यांची भूमिका असते. तरीही मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की, आयुष्यभर ज्या कॉँग्रेस-राष्टÑवादीला आपण नावे ठेवण्याचे काम केले, त्याच आघाडीला आता ते चांगले कसे म्हणत आहेत?