शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

आघाडीचा पराभव होईल: चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:04 IST

सांगली : बारामती, माढा, हातकणंगलेसह पश्चिम महाराष्टÑातील सर्व जागांवर युती विजयी होणार असून, आघाडीचा पराभव निश्चित आहे. महाराष्टÑात ४८ ...

सांगली : बारामती, माढा, हातकणंगलेसह पश्चिम महाराष्टÑातील सर्व जागांवर युती विजयी होणार असून, आघाडीचा पराभव निश्चित आहे. महाराष्टÑात ४८ पैकी ४५ जागा आम्हाला मिळतील, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपला शिष्य मोठा होत असल्याबद्दल शरद पवारांना दु:ख वाटत आहे, अशी टीकाही केली.चंद्रकांत पाटील म्हणाले , बरेच कायदे आम्हाला करायचे असल्यामुळे देशभरात दोन तृतीयांश जागा मिळविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला काही कायदे करताना अडचणी येत असल्याने उद्दिष्टपूर्ती झाल्यास बरेच कायदे आम्ही या देशात आणू शकतो. सध्या पन्नास टक्क्यांवर हे कायदे करता येत नाहीत. एका एजन्सीने युतीला ३७५ जागा मिळतील, असे सांगितले आहे. त्यामुळे आमचे ध्येय या माध्यमातून पूर्ण करू शकतो. बारामती, माढा, हातकणंगलेत आघाडीच्या उमेदवारांचा पराभव निश्चित आहे. ज्यांनी आपल्याला काहीतरी शिकविले त्यांना गुरूस्थानी मानावे, ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्याचदृष्टीने मोदींनी शरद पवारांना गुरू म्हटले होते. कोणत्याही गुरूला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झाल्याचा आनंद होत असतो, मात्र शरद पवारांना त्याचे दु:ख होत आहे. हे त्यांच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध आहे. मी त्यांना आदरस्थानी मानतो, पण ते असे का वागत आहेत, हे कळत नाही.सांगलीत लढत रंगतदार... मला येथे यावे लागले.चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सुरुवातीला इतकी एकतर्फी वाटत होती की, मला याठिकाणी यावे लागणार नाही, असे वाटत होते, मात्र फिल्मी स्टाईलने येथील लढत रंगतदार स्थितीत पोहोचली. लढतसुद्धा रंगतदार झाली पाहिजे. आता तशी दिसत आहे. त्यामुळे मला येथे यावे लागले.वसंतदादा गटाने अपक्ष लढायला हवे होते!वसंतदादांच्या वारसदारांनी दुसऱ्या पक्षामार्फत निवडणूक लढविणे हे लोकांना फारसे रूचलेले नाही. दादा गट म्हणून निवडणूक लढविताना पूर्वी एक शान होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली असती, तर कदाचित लोकांनी त्यांना सहानुभूती दाखविली असती, असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.देशाच्या सुरक्षिततेसाठी निवडणूक महत्त्वाचीदेशाची सुरक्षा कोणता पक्ष करणार, कोणामध्ये ती कुवत आहे, याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे. सुरक्षेच्या विषयावर भाजपनेच सर्वाधिक काम केले आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेसाठी जनता पुन्हा भाजपला साथ देईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चितसुप्रिया सुळे यांचा लोकसभा निवडणुकीतील पराभव निश्चित आहे. किती मताने त्यांचा पराभव होणार, हे येत्या पंधरा दिवसात स्पष्ट होईल. त्यामुळे शरद पवारांना त्यांच्या मुलीसाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे. उरलेल्या उमेदवारांना ते नंतर वेळ देतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.राज ठाकरे आघाडीला चांगले कसे म्हणत आहेत?राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल पाटील म्हणाले की, ते माझे चांगले मित्र आहेत. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट अशी त्यांची भूमिका असते. तरीही मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की, आयुष्यभर ज्या कॉँग्रेस-राष्टÑवादीला आपण नावे ठेवण्याचे काम केले, त्याच आघाडीला आता ते चांगले कसे म्हणत आहेत?