शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

सभा गुंडाळल्याचा विरोधकांचा आरोप

By admin | Updated: August 31, 2014 23:37 IST

शिक्षक बँक सभा : संघानेच गोंधळ घातल्याची सत्ताधाऱ्यांची टीका

सांगली : शिक्षक बँकेची सभा सत्ताधारी समितीनेच गुंडाळून पळ काढल्याचा आरोप शि. द. पाटील व संभाजी थोरात गटाने केला आहे, तर सभेचे कामकाज शांततेने करण्याचे आवाहन करूनही विरोधकांनी गोंधळ घालून गालबोट लावल्याची टीका समितीचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड यांनी केली आहे. शिक्षक बँकेची सभा प्रचंड गोंधळात अवघ्या दहा मिनिटातच संपली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तीनही संघटनांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. सत्ताधारी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड म्हणाले की, बँकेचे अध्यक्ष धानाप्पा माळी यांनी सुरुवातीलाच सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले होते. तसेच सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची तयारीही दर्शविली होती. तरीही विरोधकांनी गोंधळ घातला. शि. द. पाटील व संभाजी थोरात या दोन्ही गटाचे जिल्ह्यातील अस्तित्व संपुष्टात आले आहे. हे अस्तित्व दाखविण्यासाठी गोंधळ माजविला गेला. पण त्यांना सभासद जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष व संचालक विनायक शिंदे म्हणाले की, गेल्या सभेच्या इतिवृत्तात बेकायदेशीररित्या नोकरभरतीचा आकृतीबंध वाढविण्यात आला होता. त्याचा जाब विचारण्याचा निर्धार संघाने केला होता. सत्ताधारी व त्यांच्या नेत्यांची घरे भरण्यासाठी हा उपद्व्याप केला गेला आहे. तसेच लाभांश वाटपातही विश्वासघात केला आहे. या साऱ्यावर समितीकडे कोणतेच उत्तर नव्हते. सभासदांनी आकृतीबंध नामंजूर केला, तेव्हा त्यांनी सभेतून पळ काढला. सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घालून गालबोट लावले आहे. त्यामुळे ही सभा झालेली नाही, असा दावा केला. संघप्रणित तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास शिंदे म्हणाले की, बँकेत भ्रष्टाचार व बेकायदेशीर कामे सुरू आहेत. संचालकांना अपात्र ठरविण्याचे कटकारस्थान सुरू आहे. ते व्याजदर कमी करू शकलेले नाहीत. लाभांशही कमी दिला आहे. या अन्यायाविरोधात पाटील गटाने जोरदार आक्षेप घेतला. संचालकांना दहा प्रश्नही विचारले होते. पण त्यांचे साधे उत्तरही त्यांनी दिलेले नाही. त्यामुळेच आम्ही समांतर सभा घेऊन निषेध केला आहे. (प्रतिनिधी)पदवीधर प्राथमिक शिक्षक सभेचा बहिष्कारअनावश्यक नोकरभरती, संचालकांची उधळपट्टी याच्या निषेधार्थ पदवीधर प्राथमिक शिक्षक सभेने आजच्या वार्षिक सभेवर बहिष्कार टाकला होता. सभेत विद्यमान संचालकांनीच गोंधळ घालणे अशोभनीय आहे. या प्रकारामुळे शिक्षकांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. समितीने व्याजदर कमी करण्याचे आश्वासनही पाळलेले नाही. या साऱ्या गोष्टींचा पदवीधर संघटना निषेध करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव भोसले यांनी सांगितले.