शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

जयंतरावविरोधात सगळे एकत्र?

By admin | Updated: November 11, 2015 23:38 IST

सर्वपक्षीय आघाडी शक्य : शिवाजीराव नाईक बांधणार मोट

अशोक पाटील-- इस्लामपूर -वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दलित संघटना, शेतकरी संघटना यांसह एमआयएम आदी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा असून, त्यामुळे सर्व छोट्या—मोठ्या विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे.वाळवा-शिराळ्यात सहकारी संस्थांच्या जाळ्यामुळे राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत बनला आहे. राष्ट्रवादीला टक्कर देणाऱ्यांत काँग्रेसचा वाटा मोठा आहे. परंतु या पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद आहेत. शिराळ्यात शिवाजीराव देशमुख आणि त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. परंतु ते सध्या जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी करीत आहेत. वाळवा तालुक्यात तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पवार हे राष्ट्रवादीच्या विरोधात कार्यरत आहेत. परंतु त्यांच्यामध्ये एकसूत्रता नाही. त्यातील काही नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवाजीराव नाईक यांच्या गटाशी सोयीनुसार साटेलोटे करतात. येथे भाजपचीही ताकद आहे. प्रत्येक निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसशी हातमिळवणी करीत राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवला आहे. शिराळा मतदारसंघात शिवसेना नावालाही नाही. केवळ इस्लामपूर शहरापुरती शिवसेना जिवंत आहे. तानाजी सावंत यांच्यारूपाने शिराळा मतदारसंघातील काही गावांत मनसेची धुगधुगी आहे. आरपीआय आणि दलित संघटनांच्या नेत्यांची संख्या मोठी असली तरी, त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची ताकद अत्यल्प आहे. त्यातच आता एमआयएम पक्षाच्या बांधणीसाठी राष्ट्रवादीतील काही मुस्लिम नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. परंतु इस्लामपूर शहरातील बहुतांशी मुस्लिम नेत्यांचे हात जयंत पाटील यांच्या वजनाखाली सापडले आहेत.आमदार शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रीपद किंवा त्या दर्जाचे महामंडळ मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे साहजिकच विरोधकांचा आवाज वाढणार आहे. राष्ट्रवादीच्या विरोधातील सर्व छोटे-मोठे पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी नाईक आणि खोत यांच्यावर येणार आहे.' गुलाल तिकडं चांगभलंराष्ट्रवादीच्या समर्थकांची भूमिका नेहमीच आत-बाहेर राहिली आहे. वाळवा तालुक्यात जयंत पाटील, तर शिराळा मतदारसंघात ‘गुलाल तिकडं चांगभलं’ या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला शिराळा मतदारसंघात फटका बसतो. शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, तर वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील राष्ट्रवादीचे बहुतांशी कार्यकर्ते त्यांच्या गोटात जाण्याची शक्यता आहे.