शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावविरोधात सगळे एकत्र?

By admin | Updated: November 11, 2015 23:38 IST

सर्वपक्षीय आघाडी शक्य : शिवाजीराव नाईक बांधणार मोट

अशोक पाटील-- इस्लामपूर -वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दलित संघटना, शेतकरी संघटना यांसह एमआयएम आदी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा असून, त्यामुळे सर्व छोट्या—मोठ्या विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे.वाळवा-शिराळ्यात सहकारी संस्थांच्या जाळ्यामुळे राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत बनला आहे. राष्ट्रवादीला टक्कर देणाऱ्यांत काँग्रेसचा वाटा मोठा आहे. परंतु या पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद आहेत. शिराळ्यात शिवाजीराव देशमुख आणि त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. परंतु ते सध्या जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी करीत आहेत. वाळवा तालुक्यात तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पवार हे राष्ट्रवादीच्या विरोधात कार्यरत आहेत. परंतु त्यांच्यामध्ये एकसूत्रता नाही. त्यातील काही नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवाजीराव नाईक यांच्या गटाशी सोयीनुसार साटेलोटे करतात. येथे भाजपचीही ताकद आहे. प्रत्येक निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसशी हातमिळवणी करीत राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवला आहे. शिराळा मतदारसंघात शिवसेना नावालाही नाही. केवळ इस्लामपूर शहरापुरती शिवसेना जिवंत आहे. तानाजी सावंत यांच्यारूपाने शिराळा मतदारसंघातील काही गावांत मनसेची धुगधुगी आहे. आरपीआय आणि दलित संघटनांच्या नेत्यांची संख्या मोठी असली तरी, त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची ताकद अत्यल्प आहे. त्यातच आता एमआयएम पक्षाच्या बांधणीसाठी राष्ट्रवादीतील काही मुस्लिम नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. परंतु इस्लामपूर शहरातील बहुतांशी मुस्लिम नेत्यांचे हात जयंत पाटील यांच्या वजनाखाली सापडले आहेत.आमदार शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रीपद किंवा त्या दर्जाचे महामंडळ मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे साहजिकच विरोधकांचा आवाज वाढणार आहे. राष्ट्रवादीच्या विरोधातील सर्व छोटे-मोठे पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी नाईक आणि खोत यांच्यावर येणार आहे.' गुलाल तिकडं चांगभलंराष्ट्रवादीच्या समर्थकांची भूमिका नेहमीच आत-बाहेर राहिली आहे. वाळवा तालुक्यात जयंत पाटील, तर शिराळा मतदारसंघात ‘गुलाल तिकडं चांगभलं’ या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला शिराळा मतदारसंघात फटका बसतो. शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, तर वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील राष्ट्रवादीचे बहुतांशी कार्यकर्ते त्यांच्या गोटात जाण्याची शक्यता आहे.