शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

Lok Sabha Election 2019 शहरी मतदारांचा कौल मिळविण्यास तिन्ही उमेदवारांमध्ये लागली स्पर्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:42 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात विस्ताराने ग्रामीण भाग मोठा असल्याने उमेदवारांची येथे ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली लोकसभा मतदार संघात विस्ताराने ग्रामीण भाग मोठा असल्याने उमेदवारांची येथे प्रचार करताना दमछाक होत आहे. दुसरीकडे विस्ताराने कमी, पण लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या शहरी भागातील मतदारांवर उमेदवारांची विशेष नजर आहे. त्यामुळे भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका प्रमुख शहरांमध्ये अधिक दिसत आहे.सांगली लोकसभा मतदार संघातील शहरी भागांचा विचार केला, तर सर्वाधिक मतदान हे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात आहे. ४ लाख १0 हजार ५१0 इतकी मतदार संख्या आहे. महापालिका क्षेत्र वगळता तासगाव, विटा, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव या शहरी भागात १ लाख ४९ हजार ९६८ मतदार आहेत. म्हणजे अन्य शहरांच्या तुलनेत महापालिका क्षेत्रातील मतदारांची संख्या अधिक आहे. ग्रामीण व शहरी भागातील मतदारसंख्येची तुलना केल्यास, ग्रामीण मतदारसंख्या ६८.७३ टक्के, तर शहरी मतदारसंख्या ही ३१.२७ टक्के इतकी होते. तरीही शहरी भागातील मतदारांचा कौल मिळविण्यासाठी आता येथील उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी प्रचाराची सर्वाधिक यंत्रणा ही शहरी भागात राबविली आहे. ग्रामीण भागात भेटीगाठी, सभा, बैठका असे कार्यक्रम घेतले जात आहेत. दुसरीकडे प्रचाराचे नवनवे फंडे शोधून शहरी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवाराला जास्त कसरत करावी लागत आहे. तरीही शहरातील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत शहरात प्रचार यंत्रणा राबविणे उमेदवारांना तितके अडचणीचे ठरत नाही.कोणत्या भागातकोणाचा आहे होल्ड?मुस्लिमबहुल असलेल्या मिरज शहरात काँग्रेसचा सर्वाधिक प्रभाव राहिला आहे. त्यामुळेच गत लोकसभा निवडणुकीत याठिकाणी अन्य शहरांपेक्षा मिरजेत काँग्रेसला अधिक मते मिळाली होती.महापालिका निवडणुकीत याठिकाणी भाजपला ३५.१३, तर काँग्रेस व राष्टÑवादीला मिळून ३६.२७ टक्के मतदान मिळाले होते. म्हणजेच हे दोन्ही गट तुल्यबळ आहेत. त्यामुळे येथे जोरदार रस्सीखेच होत आहे.विटा येथे काँग्रेसचे, आटपाडीत महायुतीचे, पलूस व कडेगाव येथे काँग्रेसचे, तर जत, तासगाव, कवठेमहांकाळ या शहरात महायुती व महाआघाडी तुल्यबळ आहे.शहर भाजप काँग्रेससांगली ७९,६१0 ६६१२0मिरज ४८३७२ २९९२८कुपवाड १९३२0 ११५0८तासगाव १0४२१ ५११४विटा ९,४२५ ६५५१आटपाडी ३६५७ ३0१३जत ७९१७ ३७१२कवठेमहांकाळ ३६२५ २३0८पलूस ६0३८ २८0७कडेगाव २८५६ २१७९एकूण १९४७३0 १३५३८२

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक